suicide : विनयभंगाची तक्रार दाखल असलेल्या 'त्या' रिक्षाचालकाची आत्महत्या

रत्नागिरी : महाविद्यालयीन तरुणीच्या विनयभंगाची तक्रार दाखल असलेला व नुकताच जामीन मंजूर झालेला रिक्षाचालक अविनाश म्हात्रे याने गळफास घेत आत्महत्या (suicide) केल्याची घटना आज शनिवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेने रत्नागिरीत खळबळ उडाली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी एका तरुणीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. आपण दुपारी महाविद्यालयातून घरी जात असताना रिक्षाचालकाने आपल्याशी गैरवर्तन केल्याचे तिने या पोस्टमध्ये नमूद केले. त्याची दखल घेत पोलिसांनी या तरुणीशी संपर्क साधून तिची तक्रार दाखल करुन घेतली व दीड तासात रिक्षाचालक अविनाश म्हात्रे याला शोधून अटक करण्यात आली. दोन दिवसाआधीच त्याला जामीन मिळाला होता.


आज शनिवारी सकाळी ७ वाजता त्याचा मृतदेह तो राहत असलेल्या साईदीप गृहसंकुल, शांतीनगर, नाचणे, या इमारतीच्या टेरेसवर गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आला. तो पत्नी व दोन मुलांसह येथे राहतो. त्याने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला होता.


पोलिसांना माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विनीत चौधरी, प्रभारी पोलिस निरीक्षक मारुती जगताप, पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे व अंमलदार यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठवला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

पाकिस्तानातही धुरंधरची क्रेझ,बंदी असूनही टीव्हीवर झळकतोय धुरंधर २

जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा रणवीर सिंहचा 'धुरंधर २' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

लवकरच 'तुंबाडची मंजुळा' प्रेक्षकांच्या भेटीला येणार

- सिनेमाचं दुसरं पोस्टर रिलीज गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर झी स्टुडिओजनं आपल्या आगामी सिनेमा 'तुंबाडची

विक्रम गोखले यांच्या शेवटच्या सिनेमाचं पोस्टर रिलीज

- निधनाच्या ३ महिन्यांनंतर विक्रम गोखले यांच्या अंतिम सिनेमाचे पोस्टर रिलीज मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज

गिरगावच्या शोभायात्रेत स्वॅग दाखवणं व्हायरल गर्लला पडलं महागात; पोलिसांसह नागरिकही संतापले

गिरगावच्या शोभायात्रेत स्वॅग दाखवणं व्हायरल गर्लला पडलं महागात; पोलिसांसह नागरिकही संतापले मुंबईतील गिरगावसह

मिठीच्या सफाईची घाई; कंत्राटदारांच्या पाया पडणार की खात्यामार्फत करणार?

मुंबई: मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीतील गाळाची सफाई करण्यासाठी आता कंपन्याच पुढे

भारती सिंहच्या काजूला पाहिलं का?

- तीन महिन्यानंतर भारतीनं दाखवला दुसऱ्या मुलाचा चेहरा प्रसिद्ध कॉमेडी क्विन भारती सिंह हिने नुकताच तिच्या