suicide : विनयभंगाची तक्रार दाखल असलेल्या 'त्या' रिक्षाचालकाची आत्महत्या

  99

रत्नागिरी : महाविद्यालयीन तरुणीच्या विनयभंगाची तक्रार दाखल असलेला व नुकताच जामीन मंजूर झालेला रिक्षाचालक अविनाश म्हात्रे याने गळफास घेत आत्महत्या (suicide) केल्याची घटना आज शनिवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेने रत्नागिरीत खळबळ उडाली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी एका तरुणीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. आपण दुपारी महाविद्यालयातून घरी जात असताना रिक्षाचालकाने आपल्याशी गैरवर्तन केल्याचे तिने या पोस्टमध्ये नमूद केले. त्याची दखल घेत पोलिसांनी या तरुणीशी संपर्क साधून तिची तक्रार दाखल करुन घेतली व दीड तासात रिक्षाचालक अविनाश म्हात्रे याला शोधून अटक करण्यात आली. दोन दिवसाआधीच त्याला जामीन मिळाला होता.


आज शनिवारी सकाळी ७ वाजता त्याचा मृतदेह तो राहत असलेल्या साईदीप गृहसंकुल, शांतीनगर, नाचणे, या इमारतीच्या टेरेसवर गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आला. तो पत्नी व दोन मुलांसह येथे राहतो. त्याने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला होता.


पोलिसांना माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विनीत चौधरी, प्रभारी पोलिस निरीक्षक मारुती जगताप, पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे व अंमलदार यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठवला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

'हाउसफुल ५' सिनेमाने पहिल्याच दिवशी केली रेकॉर्डब्रेक कमाई

मुंबई : बहुचर्चित आणि मोठ्या बजेटचा चित्रपट 'हाउसफुल ५' ६ जून रोजी प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

डीनो मोरियाच्या ईडी चौकशीत सुशांत–दिशा हत्या प्रकरणाचे धागेदोरे उलगडणार?

मुंबई : बॉलिवूड अभिनेता डिनो मोरिया, एकेकाळचा बॉलीवूड अभिनेता आणि आज एक संशयित घोटाळेबाज! मुंबईच्या मीठी नदी

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

Lavani Gaurav Awards 2025: पडद्यामागील कलाकारांचा होणार सन्मान, यंदाचे लावणी कलावंत महासंघाचे पुरस्कार जाहीर

मुंबई: लावणी कलावंत महासंघ, मुंबई यांचा ११ वा वर्धापनदिन आणि पुरस्कार सोहळा २०२५ मंगळवार, दिनांक २४ जून, २०२५ रोजी

"जय जय स्वामी समर्थ" च्या १५०० भागांच्या निमित्ताने, पुण्यातील धनकवडी मठात दीड हजार लाडूंचे वाटप!

अक्षय मुडावदकर आणि नचिकेत बर्वे यांच्या हस्ते स्वामी भक्तांना १५०० बेसन लाडूचे प्रसादरूप वाटप  पुणे: कलर्स