Ed Raids: ईडीच्या धाडीत संजीव जयस्वाल यांच्या घरी सापडले घबाड! पत्नीची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील

Share

मुंबई: करोना काळात उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरच्या कंत्राटातील घोटाळ्याप्रकरणी ईडीचे कारवाई सत्र जोरदार सुरु आहे. आज महापालिकेचे तत्कालिन अतिरिक्त आयुक्त व वरिष्ठ सनदी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या घरी ईडीने धाड टाकली. ईडीच्या या झाडाझडतीत संजीव जयस्वाल यांच्या पत्नीची डोळे विस्फारायला लावणारी संपत्ती समोर आली आहे.

संजीव जयस्वाल यांच्या पत्नीकडे स्थावर आणि जंगम मालमत्ता मिळून तब्बल ५० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे समोर आले आहे. तसेच जयस्वाल यांच्या पत्नीच्या नावे मढ आयलंडला अर्धा एकर जमीन आणि अनेक फ्लॅटस आहेत. या सगळ्या मालमत्तांची एकूण किंमत जवळपास ३४ कोटी रुपये इतकी आहे. याशिवाय, जयस्वाल यांच्या पत्नीच्या नावे बँकांमध्ये १५ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी आहेत.

दरम्यान, ईडी अधिकाऱ्यांकडून संजीव जयस्वाल आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्या संपत्तीचा तपशील आणि स्रोत विचारण्यात आला. त्यावेळी जयस्वाल यांच्या पत्नीने मढ आयलंड येथील भूखंड हा वडिलांकडून भेट मिळाल्याचे सांगितले. जयस्वाल यांच्या पत्नीचे वडील महसूल खात्यातील माजी अधिकारी होते. आई-वडील आणि आजी-आजोबांनी मढ आयलंड येथील भूखंड आपल्याला दिल्याचे जयस्वाल यांच्या पत्नीने सांगितले.

दरम्यान, ईडीने जयस्वाल यांना गुरुवारी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र ते गैरहजर राहिले. कंत्राट वाटपातील नेमकी भूमिका व कंत्राटाला मंजुरी देण्याच्या दस्तावेजांवर स्वाक्षरी केली अथवा नाही, हे जाणून घेण्यासाठी जयस्वाल यांची चौकशी होणार असल्याचे ईडीतील सूत्रांचे म्हणणे आहे.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

3 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

4 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

4 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

5 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

5 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

6 hours ago