Dr Babasaheb Ambedkar Monument: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लंडनमधील स्मारक केंद्र सरकारडे हस्तांतरित होणार

मुंबई: डाॅ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचे वास्तव्य असलेला लंडनमधील बंगला राज्य सरकार आता केंद्र सरकारच्या ताब्यात देणार असल्याचे समजते. सरकारने हा बंगला २०१५ मध्ये खरेदी करून त्याचे संग्रहालयात रूपांतर केले होते. आता ही वास्तू केंद्र सरकार ताब्यात घेणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने त्यासाठी राज्य सरकारला पत्र पाठवले असून लवकरच मुख्यमंत्री कार्यालय संमती पाठवणार असल्याची माहिती सीएमओतील अधिकाऱ्याने दिली.


उत्तर लंडनमधील (London) किंग हेन्री रोडवरील या वास्तूत डॉ. आंबेडकर १९२१-२२ या काळात राहिले होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्य सरकारने हा तीन मजली बंगला ३१ लाख पौंडमध्ये खरेदी केला होता. २०२० मध्ये त्याचे संग्रहालयात रूपांतर करून सर्वांसाठी खुले करण्यात आले होते. आता परराष्ट्र मंत्रालयाने मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र पाठवून ही वास्तू आपल्याकडे हस्तांतरित करण्याची विनंती केली आहे. राज्य सरकारही त्याला सकारात्मक असून लवकरच ही प्रक्रिया पार पडेल.


या स्मारकाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले, ‘आपण ‘भारता’चे प्रतिनिधी म्हणूनच ही वास्तू खरेदी केली होती. आता भविष्यात त्याच्या प्रगतीसाठी केंद्राकडे हस्तांतरित करणे योग्य ठरणार आहे.

Comments
Add Comment

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून