Dr Babasaheb Ambedkar Monument: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लंडनमधील स्मारक केंद्र सरकारडे हस्तांतरित होणार

मुंबई: डाॅ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचे वास्तव्य असलेला लंडनमधील बंगला राज्य सरकार आता केंद्र सरकारच्या ताब्यात देणार असल्याचे समजते. सरकारने हा बंगला २०१५ मध्ये खरेदी करून त्याचे संग्रहालयात रूपांतर केले होते. आता ही वास्तू केंद्र सरकार ताब्यात घेणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने त्यासाठी राज्य सरकारला पत्र पाठवले असून लवकरच मुख्यमंत्री कार्यालय संमती पाठवणार असल्याची माहिती सीएमओतील अधिकाऱ्याने दिली.


उत्तर लंडनमधील (London) किंग हेन्री रोडवरील या वास्तूत डॉ. आंबेडकर १९२१-२२ या काळात राहिले होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्य सरकारने हा तीन मजली बंगला ३१ लाख पौंडमध्ये खरेदी केला होता. २०२० मध्ये त्याचे संग्रहालयात रूपांतर करून सर्वांसाठी खुले करण्यात आले होते. आता परराष्ट्र मंत्रालयाने मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र पाठवून ही वास्तू आपल्याकडे हस्तांतरित करण्याची विनंती केली आहे. राज्य सरकारही त्याला सकारात्मक असून लवकरच ही प्रक्रिया पार पडेल.


या स्मारकाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले, ‘आपण ‘भारता’चे प्रतिनिधी म्हणूनच ही वास्तू खरेदी केली होती. आता भविष्यात त्याच्या प्रगतीसाठी केंद्राकडे हस्तांतरित करणे योग्य ठरणार आहे.

Comments
Add Comment

पक्षप्रतिमा जपण्यासाठी अजित पवार संघापासून चार हात दूरच!

मुंबई  : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. हा कार्यक्रम

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेवर दि. २५ ते २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर

Mumbai Megablock : मेगा 'ब्लॉक डे' मुंबईकरांना सतावणार! 'लाईफलाईन' लोकलची दुरुस्ती; कोणत्या मार्गांवर सेवा पूर्णपणे बंद राहणार?

मुंबई : मुंबईची लाईफलाइन (Mumbai Lifeline) असलेली उपनगरीय रेल्वे (Suburban Railway) लाखो प्रवाशांना घेऊन अविरत धावत असते. या लोकलच्या

यंदाच्या छठ पुजेत विरोधही होणार मावळ, काय आहे कारण...

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी यंदा छठ पुजेच्या निमित्ताने

महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी १९,३१७ नवीन टॅबची खरेदी

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेले टॅब आता जुने झाल्याने नव्याने

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा