Ahmednagar Robbery : अहमदनगरमध्ये भल्या पहाटे व्यापार्‍याच्या घरावर सशस्त्र दरोडा

दोघांचा मृत्यू तर एकजण जखमी


शेवगाव : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात सातत्याने खून, दरोड्याच्या घटना घडत आहेत. त्यातच आज अहमदनगरमधील शेवगाव (Shevgaon) येथील भुसार मालाचे व्यापारी गोपीकिशन गंगाकिशन बलदवा (वय ५५ वर्ष) यांच्या राहत्या घरावर आज २३ जूनला भल्या पहाटे तीन ते चारच्या दरम्यान चोरट्यांनी दरोडा टाकल्याने खळबळ उडाली आहे. यात गंभीर जखमी झाल्याने दोघांचा मृत्यू तर एकजण जखमी झाला. घरातील काही ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन पुढील तपास सुरु केला आहे.


गोपीकिशन बलदवा व त्यांच्या मोठ्या भावजय पुष्पा हरिकिशन बलवा (वय ६५ वर्ष) या दोघांचा या दरोड्यामध्ये झालेल्या मारहाणीदरम्यान मृत्यू झाला, तर गोपीकिशन यांच्या पत्नी सुनिता बलदवा जखमी झाल्या आहेत. दरोडेखोरांनी त्यांच्या डोक्यामध्ये लोखंडी सळईच्या सहाय्याने वार केल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. या दरोड्याच्या निषेधार्थ आज शेवगाव बंद पुकारण्यात आला आहे. व्यापारी आणि ग्रामस्थांनी ही बंदची हाक दिली असून पोलिसांनी तातडीने घटनेचा छडा लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.



भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंडेंनी व्यक्त केली नाराजी

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली तसेच घटनास्थळी व्यापाऱ्यांनी मोठी गर्दी केली. यावेळी व्यापाऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या. भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनीही घटनास्थळी धाव घेतली. यासंदर्भात ते म्हणाले, "शेवगाव शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या भागांमध्ये दरोडा पडणे आणि त्यात दोन जणांचा मृत्यू होणे ही मोठी गंभीर घटना आहे. पोलीस प्रशासनाने या घटनेचा तातडीने तपास करावा आणि आरोपींचा शोध घ्यावा," शहरांमध्ये या पद्धतीने गंभीर गुन्हे होणे होत असल्याने पोलीस प्रशासनाच्या कामावर मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली.



नेमके काय घडले?

दरोडेखोरांनी प्रथम गौरव बदलवा यांच्या घराला बाहेरुन कडी लावली व नंतर वेगळ्या मार्गाने गोपीकिशन बदलवा यांच्या घरात प्रवेश करुन झोपेत असतानाच त्यांच्या डोक्यावर गजाने प्रहार केला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर चोरी करताना पुष्पा बदलवा जाग्या झाल्याने त्यांनाही जीवे मारले. या घटनेत तीन चोरटे दुचाकी वाहनावरुन आल्याचे सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजमध्ये दिसत असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी सुनिल पाटील, सहाय्यक पोलीस अधिक्षक बी. चंद्रकात रेड्डी, पो. नि. विलास पुजारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपासासाठी श्वान पथकही घटनास्थळी दाखल झाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या

Ketan Agrawal Murder Case : "सिया दोषी असेल तर तिलाही त्याच दरीत ढकला!"; आई-वडिलांचा संताप, पोलिसांकडून ९ प्रश्नांची सरबत्ती

पुणे : पुण्याला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन