Child crime: अडीच महिन्यांच्या बालकाला विक्री करणार होतेच की....इतक्यात...

छत्रपती संभाजीनगर: शिवशंकर कॉलनीतील जिजामाता बालक आश्रमातील एका अडीच महिन्यांच्या बालकाची कॅनॉटमधील व्यापाऱ्याला तब्बल पाच लाखांना विक्री (Child trafficking) करणाऱ्यांचा पर्दाफाश दामिनी पथकाने केला. मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. दिलीप श्रीहरी राऊत (५२, रा. तानाजी चौक, शिवशंकर कॉलनी) व त्याची पत्नी सविता दिलीप राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून आश्रमावर बंदी घातली आहे.


भरोसा सेलच्या (Bharosa Cell) पोलिस निरीक्षक आम्रपाली तायडे यांच्या पथकाला खबऱ्याकडून शिवशंकर कॉलनीतील जिजामाता अनाथाश्रमाचा संस्थाचालक एका अडीच महिन्यांच्या बाळाची विक्री करणार असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यावरून दामिनी पथकाच्या निरीक्षक अनिता फसाटे व त्यांच्या पथकाने जिजामाता बालक आश्रमाची झडती घेतली. तेव्हा एका खोलीत साडीच्या झोळीत अडीच महिन्यांचा मुलगा झोपलेल्या स्थितीत आढळून आला. पोलिसांनी आश्रमचालक राऊतची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने कबुली दिली. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दिलीप राऊतने पोलिसांना हे बाळ आमच्या पैठण येथील नातेवाईक महिलेचे असून त्या आजारी असल्याने बाळ येथे ठेवल्याचे सांगितले. मात्र, त्याचा पुरावा दिला नाही. त्यामुळे पोलिस आता बाळाच्या जन्मदात्रीचा शोध घेत आहेत.


दरम्यान, दिलीप राऊतच्या बालक आश्रमावर सामाजिक न्याय विभागाने बंदी घातली आहे. विशेष म्हणजे या बालक आश्रमाला ६ ते ६ या वयोगटातील मुले ठेवण्याचे अधिकार नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. बंदी असूनही राऊत आश्रम चालवत होता.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये