Devendra Fadanvis : बंजारा समाजाला भाजपच न्याय देऊ शकतो : देवेंद्र फडणवीस

बंजारा समाजाच्या पदाधिकार्‍यांचा भाजपमध्ये प्रवेश


मुंबई : बंजारा समाजाच्या (Banjara community) पदाधिकार्‍यांनी भाजपमध्ये (BJP) केलेल्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis)यांनी बंजारा समाजाला भाजपच न्याय देऊ शकतो, असं महत्त्वपूर्ण विधान केलं. यावेळी बंजारा समाजाच्या हक्कांमध्ये कोणालाही वाटेकरी होऊ देणार नाही आणि महाराष्ट्र सरकार (Maharashtra government) या समाजाच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहील, असे म्हणत त्यांनी बंजारा समाजाच्या पदाधिकार्‍यांना आश्वस्त केले.


जे बजेट आमच्याकडून देण्यात आलं आहे, त्यात भटक्या विमुक्त समाजाकरता अनेक योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सुरु केलेल्या 'मोदी आवास योजने'मध्ये जास्तीत जास्त बंजारा समाजातील लोकांना कसं समाविष्ट करता येईल, ज्यांना घर नाही त्यांना घर देण्याचं काम हे तुमच्या नेतृत्वाखाली तयार झालं पाहिजे, अशी विनंती देवेंद्र फडणवीसांनी बंजारा समाजाच्या पदाधिकार्‍यांना केली. तसेच जेवढी घरं मागाल तेवढी घरं आम्ही देऊ, असं आश्वासन दिलं.


प्रत्येक तांड्यापर्यंत रस्ता, पिण्याचं पाणी, विकास पोहोचला पाहिजे, यासाठी संत सेवानंद महाराजांच्या नावाने अभियान सुरु केलं आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. तसेच तांड्याला ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात यावा, या मागणीबाबतही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन लवकरच तोडगा काढला जाईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.



तरुणाईच्या हाताला काम देणार

महामंडळाच्या माध्यमातून नवीन योजना तयार करुन, निधी पुरवून बंजारा समाजाच्या तरुणाईच्या हाताला काम दिलं जाईल. कुठेही महामंडळाला पैसा कमी पडू दिला जाणार नाही. तसेच बंजारा समाजाशिवाय भारतीय संस्कृती अपूर्ण आहे, असं महत्त्वपूर्ण विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Latur : लातूरसाठी ‘देवाभाऊ’ आरोग्यदूत, १०० खाटांच्या नवीन जिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन

लातूर : लातूर जिल्ह्याच्या आरोग्य संवर्धनासाठी ऐतिहासिक ठरणाऱ्या १०० खाटांच्या अत्याधुनिक जिल्हा

Chitra Wagh : महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना उद्ध्वस्त करणार, चित्रा वाघ कडाडल्या

नाशिक : महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना उद्ध्वस्त केल्याशिवाय हे सरकार स्वस्थ बसणार नाही. तपास पथक आरोपींविरोधात

Fighter Jet Emergency Landing Pune : पुण्यात लढाऊ विमानाचे अचानक लँडिंग; करावे लागले चक्क विमानतळ बंद; नेमकं काय घडलं त्या रात्री?

पुणे : विमानाचा अपघात आता रस्ते अपघातासारखा सर्वसाधारण झालाय. काल पुण्याच्या धावपट्टीवर रात्री एक लढाऊ विमानाचे

Thane : मेट्रो, टनेल, पॉड टॅक्सी ते परवडणारी घरे; ठाणे बनतंय सुपर सिटी

ठाणे : “पूर्वी ‘पुणे तिथे काय उणे’ म्हटले जायचे; आता ‘ठाणे तिथे काय उणे’ असे आत्मविश्वासाने म्हणण्याची वेळ आली

Jitendra Shelke Death : अशोक खरात यांचे निकटवर्तीयाचा ट्रकखाली चिरडून मृत्यू, पत्नी आणि मुलगा गंभीर

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, शुक्रवारी झालेल्या एका भीषण अपघातात

Heat wave : १३ राज्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा, काळजी घेण्याचे आवाहन

- अकोला देशातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक उष्ण शहर मुंबई : सध्या देशभरातील हवामानात मोठे बदल होत आहेत. काही