adipurush : 'आदिपुरुष' चित्रपटाचा लेखक घाबरला, केली 'ही' मागणी

मुंबई : साऊथचा सुपरस्टार प्रभासच्या नुकताच प्रदर्शित झालेल्या 'आदिपुरुष' (adipurush) चित्रपटावरुन वाद सुरु आहे. एकीकडे या चित्रपटाला विरोध होत आहे तर दुसरीकडे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करताना दिसत आहे.


आदिपुरुष चित्रपटाची कथा आणि त्यामध्ये दाखवण्यात आलेल्या संवादांबाबत देशभरात निदर्शने आणि आंदोलन केली जात आहेत. हा गोंधळ पाहता आदिपुरुष चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशीर यांनी आपल्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. तसेच आपल्या जीवाला धोका असल्याच्या कारणावरुन मनोज यांनी मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे.


त्यानंतर मुंबई पोलिसांनी निर्णय घेत मनोज यांना सुरक्षा पुरवली आहे. याप्रकरणाचा तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान स्टार 'आदिपुरुष' चित्रपट १६ जून रोजी म्हणजेच शुक्रवारी रिलीज झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या संवादावरून वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे या चित्रपटावर टीकादेखील केली जात आहे. यासोबतच चित्रपट निर्मात्यांवर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोपही केला जात आहे. त्यामुळे चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.

Comments
Add Comment

महाविद्यालयीन शुल्कातील गैरप्रकारांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत घोषणा; दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे संकेत मुंबई :

'गॅस तुटवड्याविषयी सरकारने उपाययोजना कराव्यात'

मुंबई : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासह राज्यात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे पडसाद बुधवारी

नागरिकांना विनासायास डिजिटल सेवा मिळण्यासाठी व्यापक धोरण तयार करा; माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय ई-सेवा आणि आधार संबंधित सेवा कोणत्याही अडथळ्याविना मिळाव्यात,

माजी सैनिक आणि भूमिहीनांच्या जमिनी वर्ग १ होणार, महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा

मुंबई : राज्यातील माजी सैनिक, भूमिहीन शेतकरी आणि शेतमजुरांना महाराष्ट्र शेत जमीन (सीलिंग) अधिनियमांतर्गत वाटप

प्रवासी आरक्षण सेवा इतके तास बंद राहणार

मुंबई : मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) दिनांक १२.०३.२०२६ रोजी २३.४५ वाजल्यापासून दिनांक १३.०३.२०२६ रोजी

एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! महामंडळात १७,७४२ पदांची होणार जंगी भरती

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी)