Nitesh Rane: वरळीत पेंग्विन आणि पेंग्विनच्या नाईट पार्टनरला जुने-प्रामाणिक कार्यकर्ते कंटाळले!

मुंबई: वरळीतील मतदारसंघात आदित्य ठाकरे (Aditya Thackrey) प्रेझेंटेशन देतील काय? तिकडच्या मच्छिमार बांधवांसाठी काय केले याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? मुळात वरळीचा आगामी विधानसभा निवडणूकीचा उमेदवार कोण आहे याचीच आम्हाला माहिती द्या अशा शब्दांत, भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) उबाठा गटाची पोलखोल केली. वरळीमध्ये पेंग्विनचा नाईट पार्टनर याचे काय धंदे सुरु आहेत हे आम्हाला चांगलच माहिती आहे या शब्दांत नितेश राणे यांनी सचिन आहिर यांच्यावर निशाणा साधला. त्यामुळे २०२४ ची विधानसभा निवडणूक (2024 Assembly Elections) आदित्य ठाकरे शिवडी विधांनसभेतून लढणार आहेत असा गौप्यस्फोट करत नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानंतर त्यांचे किती पोस्टर फाडले गेले याचीही माहिती घ्या असा सल्ला उद्धव ठाकरेंना दिला. त्याचसोबत तेथील सुनील शिंदेसारख्या प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्त्यांची कशी पिळवणूक सुरु आहे. तसेच किशोरीताई पेडणेकर सुद्धा सध्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत हे गौप्यस्फोटही नितेश राणे यांनी केले.



उबाठा गटाच्या झालेल्या शिबिराचा यांनी त्यांच्या खास शैलीत समचार घेतला. ते म्हणाले, मुळ शिवसेना ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदें (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली मोकळा श्वास घेते आहे. ओसाड गावचे पाटील उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊत ज्या शिवसैनिकांनी शिवसेना उभी केली त्यांना हे कचरा म्हणतात. उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूची राऊत, परब, देसाई ही जी कार्टी आहेत त्यांनी आज पक्षाची ही अवस्था करून ठेवलीय. यांच्याकडे नाव नाही. जे मशाल चिन्ह आहे ते केवळ अंधेरी मतदारसंघाच्या निवडणूकीपुरतेच वापरायचे असा निवडणूक आयोगाचा आदेश होता. तो गद्दार दिन साजरा करण्यापेक्षा २८ नोव्हेंबर २०१९ हा धर्मांतर दिन म्हणून साजरा करा. शिवाजीपार्कवर या दिवशी उद्धव ठाकरे यांचा सुन्ता करुन त्यांचे धर्मांतर करण्यात आले. काल झालेल्या शिबिरात टोपी काढून अल्पसंख्यांकांना बसवण्यात आलं होतं. पैसे देऊन कार्यकर्त्यांना आणलं होतं. त्यापैकी जास्त गर्दी ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसची होती.



राजाराम राऊत यांच्या मुलाला किंमत आहे का?


यावेळी नितेश राणे यांनी मोदी आणि शहांवर निशाणा साधणाऱ्या राजाराम राऊत या मुलाला किंमत आहे का असा सवाल विचारत. संजय राऊत यांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून कसा पाणउतारा होतो हे सांगितले. काहीच दिवसांपूर्वी झालेल्या मुलाखतीत राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल हे संजय राऊत यांना किंमत देत नाहीत हे समोर आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच याआधी संजय राऊत यांचा अजित पवार, नाना पटोले खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच कसा पाणउतारा केला याची आठवण राऊत यांना करुन दिली.



प्रकाश आंबेडकर यांच्यावरही निशाणा


प्रकाश आंबेडकर हे औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन पुष्पवर्षाव करुन आले. हिंदूंना सर्वात जास्त त्रास देणारा औरंगजेब होता. शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करता. त्या प्रकाश आंबेडकरांना बोलण्याची तुम्हाला हिम्मत आहे का? बाळासाहेबांचं हिंदूत्व तुमच्यात असल्याचं तुम्ही सांगता. एवढा हिंदुत्वाचा तुम्हाला कळवळा आहे मग प्रकाश आंबेडकर यांना जाब विचारणार का? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.


Comments
Add Comment

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात ८ एप्रिलपासून बदल; लाईन ९ व २ बी सेवेत, प्रवाशांसाठी अधिक सुलभ व जलद सेवा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास

Sunetra Pawar: 'बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची'

बारामती: बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती

Chandrashekhar Bawankule: अजित दादांची सावली आता बारामतीत सुनेत्रा माऊली; बावनकुळेंनी जागवल्या ३२ वर्षांच्या ऋणानुबंधांच्या आठवणी

बारामती: "ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत वजन होतं, ज्यांनी उभं आयुष्य