Nitesh Rane: वरळीत पेंग्विन आणि पेंग्विनच्या नाईट पार्टनरला जुने-प्रामाणिक कार्यकर्ते कंटाळले!

मुंबई: वरळीतील मतदारसंघात आदित्य ठाकरे (Aditya Thackrey) प्रेझेंटेशन देतील काय? तिकडच्या मच्छिमार बांधवांसाठी काय केले याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? मुळात वरळीचा आगामी विधानसभा निवडणूकीचा उमेदवार कोण आहे याचीच आम्हाला माहिती द्या अशा शब्दांत, भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) उबाठा गटाची पोलखोल केली. वरळीमध्ये पेंग्विनचा नाईट पार्टनर याचे काय धंदे सुरु आहेत हे आम्हाला चांगलच माहिती आहे या शब्दांत नितेश राणे यांनी सचिन आहिर यांच्यावर निशाणा साधला. त्यामुळे २०२४ ची विधानसभा निवडणूक (2024 Assembly Elections) आदित्य ठाकरे शिवडी विधांनसभेतून लढणार आहेत असा गौप्यस्फोट करत नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानंतर त्यांचे किती पोस्टर फाडले गेले याचीही माहिती घ्या असा सल्ला उद्धव ठाकरेंना दिला. त्याचसोबत तेथील सुनील शिंदेसारख्या प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्त्यांची कशी पिळवणूक सुरु आहे. तसेच किशोरीताई पेडणेकर सुद्धा सध्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत हे गौप्यस्फोटही नितेश राणे यांनी केले.



उबाठा गटाच्या झालेल्या शिबिराचा यांनी त्यांच्या खास शैलीत समचार घेतला. ते म्हणाले, मुळ शिवसेना ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदें (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली मोकळा श्वास घेते आहे. ओसाड गावचे पाटील उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊत ज्या शिवसैनिकांनी शिवसेना उभी केली त्यांना हे कचरा म्हणतात. उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूची राऊत, परब, देसाई ही जी कार्टी आहेत त्यांनी आज पक्षाची ही अवस्था करून ठेवलीय. यांच्याकडे नाव नाही. जे मशाल चिन्ह आहे ते केवळ अंधेरी मतदारसंघाच्या निवडणूकीपुरतेच वापरायचे असा निवडणूक आयोगाचा आदेश होता. तो गद्दार दिन साजरा करण्यापेक्षा २८ नोव्हेंबर २०१९ हा धर्मांतर दिन म्हणून साजरा करा. शिवाजीपार्कवर या दिवशी उद्धव ठाकरे यांचा सुन्ता करुन त्यांचे धर्मांतर करण्यात आले. काल झालेल्या शिबिरात टोपी काढून अल्पसंख्यांकांना बसवण्यात आलं होतं. पैसे देऊन कार्यकर्त्यांना आणलं होतं. त्यापैकी जास्त गर्दी ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसची होती.



राजाराम राऊत यांच्या मुलाला किंमत आहे का?


यावेळी नितेश राणे यांनी मोदी आणि शहांवर निशाणा साधणाऱ्या राजाराम राऊत या मुलाला किंमत आहे का असा सवाल विचारत. संजय राऊत यांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून कसा पाणउतारा होतो हे सांगितले. काहीच दिवसांपूर्वी झालेल्या मुलाखतीत राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल हे संजय राऊत यांना किंमत देत नाहीत हे समोर आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच याआधी संजय राऊत यांचा अजित पवार, नाना पटोले खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच कसा पाणउतारा केला याची आठवण राऊत यांना करुन दिली.



प्रकाश आंबेडकर यांच्यावरही निशाणा


प्रकाश आंबेडकर हे औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन पुष्पवर्षाव करुन आले. हिंदूंना सर्वात जास्त त्रास देणारा औरंगजेब होता. शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करता. त्या प्रकाश आंबेडकरांना बोलण्याची तुम्हाला हिम्मत आहे का? बाळासाहेबांचं हिंदूत्व तुमच्यात असल्याचं तुम्ही सांगता. एवढा हिंदुत्वाचा तुम्हाला कळवळा आहे मग प्रकाश आंबेडकर यांना जाब विचारणार का? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.


Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत