Joining Shivsena : वर्धापन दिनाअगोदर ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के

मनिषा कायंदेंसह आणखी तीन जणांचा शिवसेनेत प्रवेश


मुंबई : शिवसेनेचा वर्धापन दिन (Shivsena Anniversary) उद्यावर येऊन ठेपला असतानाही ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के मिळत आहेत. ठाकरे गटातील (Thackeray gat) अनेक नेते पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश करत आहेत. एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) आधीच्या शिवसेनेत बंड करुन वेगळा गट स्थापन केल्यापासून हे पर्व सुरुच आहे. मात्र शिवसेनेतून कोणीही ठाकरे गटात परतलेले नाही. यात आता वर्धापन दिनादिवशीच विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) ठाकरे गटातून शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.


मनिषा कायंदे या मागच्या काही दिवसांपासून ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा होती. त्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. मनिषा कायंदे या नॉट रिचेबल आहेत. त्यांचा फोन बंद असून त्यांच्याशी संपर्क होत नाही आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या चिंतेत भर पडली आहे.


ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या म्हणून ओळख असलेल्या मनिषा कायंदे यांच्या पक्षप्रवेशामुळे हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का आहे. मूळच्या शिक्षिका असणार्‍या मनिषा कायदेंनी २०१२ साली उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला व एकनाथ शिंदेंच्या बंडानंतरही त्यांनी ठाकरे गटाची बाजू आक्रमकपणे मांडली. ठाकरे गटाच्या महिला नेत्यांमध्ये नाराजी असतानादेखील त्यांना उद्धव ठाकरेंकडून विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र आता त्याच पक्ष सोडून जात असल्याने ठाकरे गट आणखी कमकुवत झाल्याचे दिसून येत आहे.



शिशिर शिंदे व तांडेल पती पत्नीचाही राजीनामा

ठाकरे गटाचं उपनेतेपद सांभाळणा-या शिशिर शिंदेंनी देखील उद्धव ठाकरे यांच्याकडे काल आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. तसेच चुनाभट्टी येथील नगरसेवक असणार्‍या स्वाती तांडेल व विजय तांडेल या जोडप्याने देखील ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे व ते आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात