Joining Shivsena : वर्धापन दिनाअगोदर ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के

मनिषा कायंदेंसह आणखी तीन जणांचा शिवसेनेत प्रवेश


मुंबई : शिवसेनेचा वर्धापन दिन (Shivsena Anniversary) उद्यावर येऊन ठेपला असतानाही ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के मिळत आहेत. ठाकरे गटातील (Thackeray gat) अनेक नेते पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश करत आहेत. एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) आधीच्या शिवसेनेत बंड करुन वेगळा गट स्थापन केल्यापासून हे पर्व सुरुच आहे. मात्र शिवसेनेतून कोणीही ठाकरे गटात परतलेले नाही. यात आता वर्धापन दिनादिवशीच विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) ठाकरे गटातून शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.


मनिषा कायंदे या मागच्या काही दिवसांपासून ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा होती. त्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. मनिषा कायंदे या नॉट रिचेबल आहेत. त्यांचा फोन बंद असून त्यांच्याशी संपर्क होत नाही आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या चिंतेत भर पडली आहे.


ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या म्हणून ओळख असलेल्या मनिषा कायंदे यांच्या पक्षप्रवेशामुळे हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का आहे. मूळच्या शिक्षिका असणार्‍या मनिषा कायदेंनी २०१२ साली उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला व एकनाथ शिंदेंच्या बंडानंतरही त्यांनी ठाकरे गटाची बाजू आक्रमकपणे मांडली. ठाकरे गटाच्या महिला नेत्यांमध्ये नाराजी असतानादेखील त्यांना उद्धव ठाकरेंकडून विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र आता त्याच पक्ष सोडून जात असल्याने ठाकरे गट आणखी कमकुवत झाल्याचे दिसून येत आहे.



शिशिर शिंदे व तांडेल पती पत्नीचाही राजीनामा

ठाकरे गटाचं उपनेतेपद सांभाळणा-या शिशिर शिंदेंनी देखील उद्धव ठाकरे यांच्याकडे काल आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. तसेच चुनाभट्टी येथील नगरसेवक असणार्‍या स्वाती तांडेल व विजय तांडेल या जोडप्याने देखील ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे व ते आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

Comments
Add Comment

अवयव प्रत्यारोपणासाठी देशव्यापी एकसमान धोरणाचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

दानकर्त्यांची प्रत्यारोपणानंतर वैद्यकीय काळजी बंधनकारक… मुंबई : देशभर अवयव प्रत्यारोपणासाठी एकसमान व

मालाड, कांदिवली, माटुंगा, परळमधील उद्याने, क्रीडांगणाचा होणार विकास

महापालिकेने मागवली २६ कोटींची निविदा मुंबई (खास प्रतिनिधी) : मालाड (पूर्व), येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे

मुंबईत २०० पेक्षा वायू गुणवत्ता निर्देशांक असल्यास उद्योग आणि बांधकामे बंद करा

महापालिका आयुक्त अश्विनी जोशी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्यांचा गय

मुंबईत निवडणुकीची चाहूल; राज्य सरकारचा पुनर्विकासाला चालना देणारा मोठा निर्णय

मुंबई : मुंबईतील बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच राज्य सरकारने नागरिकांना थेट लाभ

मुंबईकर गारठले; थंडीमुळे पारा १६.२ अंशावर !

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत हिवाळ्याची चाहूल

मुंबईत बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार ; कारमध्ये झाडल्या गोळ्या

मुंबई : मुंबईत भर दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. कांदिवली चारकोप परिसरातील एका व्यावसायिकांवर हल्ला झाला.