Superstition: नुकत्याच जन्मलेल्या बाळाला होती पोटदुखी म्हणून पोटावर दिले बिब्ब्याचे चटके!

यवतमाळ: पोटदुखीमुळे (Stomach Ache) नवजात बाळ सतत रडत असल्याने त्याच्या पोटावर बिब्याचे (Marking Nut) चटके देऊन उपाय केल्याचा अघोरी प्रकार यवतमाळमध्ये (Yavatmal) उघडकीस आला आहे. पाच दिवसांच्या बाळाला बिब्ब्याचे चटके दिल्याने त्याची प्रकृती आणखी ढासळली असून बाळाला जगवण्याचे शर्थीचे प्रयत्न डॉक्टर करत आहेत. ज्येष्ठ मंडळींच्या सल्ल्यानुसार आईवडिलांनी हा अघोरी प्रकार केल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकारामुळे पुरोगामी महाराष्ट्रात अजूनही अंधश्रद्धेला (Superstition) बळी पडून अघोरी प्रकार होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.


घाटंजी तालुक्यातील पारा पीएचसीमध्ये ६ जून रोजी या बाळाचा जन्म झाला. प्रसुती झाल्यानंतर आई आणि बाळाला डिस्चार्ज मिळाला. बाळाला घरी आणण्यात आलं. मात्र घरी आल्यानंतर बाळ एकसारखं रडत होतं. त्यातच आई-वडिलांनी बाळाला डॉक्टरांकडे न नेता गावातील ज्येष्ठ मंडळींचा सल्ला घेतला. त्यांनी सांगितल्यानुसार आई-वडिलांनी अवघ्या पाच दिवसांच्या बाळाच्या (Newborn Baby) बिब्बा गरम करुन पोटावर त्याचे चटके दिले. या अमानवी आणि अघोरी उपचारामुळे बाळाची प्रकृती आणखीच चिंताजनक बनली.


यानंतर बाळाला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इथे बाळावर उपचार केले जात आहे. बाळाला जगवण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. परंतु मन हेलावणाऱ्या या प्रकारामुळे बाळाच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी

ग्रामीण भागातील घरबांधणी आता होणार सुलभ; बांधकाम परवानगीचे अधिकार तालुका स्तरावर देण्याचे संकेत!

- मंत्री उदय सामंत यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या घराच्या

Jalna: गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडले अन् ११० सिलिंडर चोरले, जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जालना: जालना तालुक्यातील रामनगर परिसरात गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये चक्क गॅस सिलिंडरची मोठी चोरी झाल्याचा

Weather Update: महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना अलर्ट, ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार

मुंबई: महाराष्ट्रावर ऐन उन्हाळ्यात अस्मानी संकट घोंघावत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला उष्णतेच्या लाटेने

लालपरीचा कायापालट, २२ हजार बसेस पूर्णपणे बदलणार; मंत्री सरनाईकांची माहिती

मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राची लाईफलाईन मानली जाणारी लालपरी आता मोठ्या बदलाच्या दिशेने वाटचाल करत आहे. राज्य

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, गॅस बुकींगनंतर ९६ तासांत सिलेंडर घरपोच होणार; जिल्हाधिकाऱ्यांचे एजन्सींना आदेश

पुणे: मराठी नववर्षारंभ म्हणजेच गुढी पाडव्याचा सण अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना गॅस टंचाईमुळे