Free Firing: बीडमध्ये अंदाधुंद गोळीबार, एकाची प्रकृती चिंताजनक!

  145

बीड: शहरातील कालिका नगर ते सराटा फाटा या परिसरात  काल  रात्री झालेल्या गोळीबारात दोन जण जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. दोन्ही जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, दोन गटांमध्ये झालेल्या वादातून गोळीबार करण्यात आल्याचे समजते आहे. पोलीस घटनास्थळी तळ ठोकून आहेत.

बीड शहरात आणि जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याच चित्र आहे. अशातच शुक्रवारी रात्री उशिरा शहरातील कालिका नगर ते सराटा फाटा या दरम्यान दोन गटांमध्ये अज्ञात कारणावरून हाणामारी झाली. या हाणामारीचं रूपांतर नंतर थेट गोळीबारात झालं. गायकवाड नामक व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केल्याने दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येते. या दोघांवरही बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

या दोन गटांमध्ये वाद होण्याचं नेमकं कारण काय होतं, हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र रात्री झालेल्या या गोळीबाराने शहरात काही काळासाठी तळावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने तात्काळ धाव घेत घटनेच्या ठिकाणी तळ ठोकला. त्याचबरोबर या दोन्हीही गटातील लोकांचा प्रशासन शोध घेत आहे.
Comments
Add Comment

आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी होणार- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या

पडळकरांनी सांगितलेलं 'ते' कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे का?

पडळकरांची 'कॉकटेल कुटुंब' टिप्पणी, पवारांना अप्रत्यक्ष

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात प्रथमच डिजिटल क्रांती ; AI तंत्रज्ञानासाठी ऐतिहासिक करार

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा पहिला करार! मंत्री

कल्याण पश्चिम परिसरात ऐन पावसाळ्यात कचऱ्यांचे ढीग, तीन दिवसांपासून घंटागाड्यांची प्रतीक्षा

कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसीने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधींची तरतूद केलेली असताना, कल्याण-डोंबिवली

वारीदरम्यान ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक

11th Admission: अकरावीच्या पहिल्या फेरीत सहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले, कारण...

योग्य कागदपत्रे सादर न केल्याने, तसेच अर्जामध्ये चुका करण्यात आल्याने प्रवेश नाकारला मुंबई: राज्यात अकरावी