Cyber Crime : वर्धा नागरी सहकारी बँक सायबर हल्ल्यात पाच आरोपींना अटक

तब्बल १ कोटी २१ लाख १६ हजार रुपये विविध खात्यांत वळवले


वर्धा : अकाऊंट हॅकिंग आणि सायबर गुन्ह्यांचे (Cyber crime) प्रमाण वाढले असून वर्ध्यातून आणखी एक सायबर गुन्ह्याची घटना समोर आली होती. या घटनेतील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. वर्ध्यातील वर्धा नागरी सहकारी बँकेचं (Wardha Nagri Sahakari Bank) अकाऊंट हॅक (Account hack) केल्याची ही घटना होती. या घटनेत आरोपांनी शक्कल लढवत येस बँकेची (Yes Bank) युटिलिटी हॅक करुन बँकेत असलेल्या वर्धा नागरी सहकारी अधिकोष बँकेच्या खात्यातून १ कोटी २१ लाख १६ हजार रुपये लंपास केले होते. या प्रकरणी संबंधित पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यात एका नायजेरियन नागरिकाचा समावेश आहे.


येस बॅंकेत वर्धा नागरी सहकारी बॅंकेच्या असलेल्या खात्यातून आरटीजीएस (RTGS) आणि एनईएफटी (NEFT) व्यवहार होत असत. वर्धा बॅंकेला २४ मे रोजी बुधवारी सुट्टी होती. याचाच फायदा घेत सायबर चोरट्यांनी पहाटे ६ ते सकाळी ८ या चार तासांत येस बॅंकेची युटिलीटी (Utility) हॅक करुन सायबर हल्ला केला. यामध्ये वर्धा नागरी बँकेच्या खात्यातून तब्बल १ कोटी २१ लाख १६ हजारांची रक्कम विविध खात्यात वळती केली.


सकाळी बँकेत आलेल्या कर्मचा-यांनी नेहमीप्रमाणे कामासाठी संगणक (Computers) सुरु केले असता हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. या प्रकरणी कांचन अनिल केळकर यांनी या कर्मचा-याने ताबडतोब वर्धा शहर पोलिसात (Wardha Police) गुन्हा दाखल केला. सायबर सेलकडून (Cyber cell) पुढील तपास करण्यात आला. यातील नायजेरियन नागरिक असलेला आरोपीच या हॅक प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याची शक्यता आहे, असा पोलिसांचा अंदाज आहे.



५० ते ६० अकाऊंटमध्ये रक्कम ट्रान्सफर

आरोपींनी ही रक्कम ५० ते ६० वेगवेगळ्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर (Money Transfer) केली होती. मणिपूर, मिझोरम, पश्चिम बंगाल, कर्नाटक, सिक्कीम, तेलंगणा, आसाम, त्रिपुरा, उत्तरप्रदेश आदी ठिकाणच्या २४ ते २५ बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्यात आले होते. यात पोलिसांनी २३ लाख १० हजार रुपये थांबवले आहेत. जवळपास ६० अकाऊंट गोठवले आहेत. १६ एटीएम (ATM), ९ मोबाईल व इतर साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी वर्धा पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.



तपासासाठी आरबीआयची पाच पथके पाच ठिकाणी

या प्रकरणाच्या तपासासाठी आरबीआय टीमची (RBI Team) पाच पथके पाच दिवस वर्ध्यात होती. वर्धा, बंगळुरु, मुंबई, दिल्ली आणि हैदराबाद अशा पाच ठिकाणी ही पथके तैनात होती. वेगवेगळ्या टीमच्या कौशल्यपू्र्ण कामगिरीमुळे घटनेचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं. येस बँकेच्या सर्व्हरचा (Server) आयपी अ‍ॅड्रेस (IP Address) हॅक करणारा बंगळुरुमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तिथून नायजेरियन नागरिकाला ताब्यात घेतलं. तर दिल्ली इथून दोन आणि मुंबई इथून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. पाचही जणांना अटक करण्यात आली आहे.


Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य