मुंबई : वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये (Vande Bharat) गळती झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी टीकेचा भडीमार सुरु केला असतानाच आता सोशल मीडीयावर मीम्सचाही मुसळधार पाऊस कोसळत आहे. ‘टिप टिप बरसा पानी…’, ‘यापेक्षा आमची एसटी बरी…’ अशा अनेक मीम्स द्वारे मोदी सरकारला ट्रोल केले जात आहे.
देशभरात सध्या १७ मार्गांवर वंदे भारत ट्रेन्स धावत आहेत. येत्या २६ जूनला पंतप्रधान मोदी मुंबई-गोवासह आणखी ५ मार्गांवरील वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. पण अशातच एका व्हायरल व्हिडीओमुळे पंतप्रधान मोदी आणि वंदे भारत एक्स्प्रेसला मोठ्या ट्रोलिंगला सामोर जावे लागत आहे.
काँग्रेसने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये एका ट्रेनच्या बोगीमध्ये पाणी पडताना दिसत आहे. एक कामगार पडणाऱ्या पाण्याखाली प्लास्टिकचे ट्रे ठेवताना दिसत आहे. तर आतमध्ये प्रवासीही बसलेले दिसतात. केरळ काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडीओ वंदे भारत एक्स्प्रेसमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. ८ सेकंदाचा हा व्हिडीओ कोणत्या ट्रेनचा आणि कधीचा आहे, याबाबत मात्र कोणतीही माहिती मिळालेली नाही.
मात्र, काँग्रेसने या व्हिडीओच्या माध्यमातून मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडीओ ट्विटरवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांचे लोक हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. मात्र, व्हिडीओबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.
दरम्यान, दक्षिण रेल्वेने मात्र ट्विट करून हे आरोप फेटाळून लावले आहेत.
“केरळमध्ये सुरू असलेल्या वंदे भारतमध्ये अशी कोणतीही घटना घडलेली नाही. किंवा ही घटना दक्षिण रेल्वेमध्ये चालणाऱ्या इतर दोन वंदे भारत ट्रेन सेवांमध्ये घडलेली नाही,” असे ट्विटमध्ये म्हटले आहे.
यापूर्वीही वंदे भारत ट्रेन अनेकदा वादात सापडली आहे. कधी जनावरे धडकल्याने ट्रेनच्या पुढच्या भागाचे नुकसान झाल्याचे समोर आले होते. तर कधी दगड लागल्याने किंवा पक्षाची धडक बसल्याने काचा फुटल्याचे फोटोही व्हायरल झाले होते. याशिवाय ट्रेनमध्ये देण्यात येणाऱ्या निकृष्ट दर्जाबाबतही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…