Maha RERA: महारेराची पहिल्यांदा मोठी कडक कारवाई! ग्राहकांना फसवणाऱ्या बिल्डरसोबत असे काही केले की...

मुंबई: महारेराकडून (MahaRERA) गृहनिर्माण प्रकल्पांमधील होणारा विलंब, त्यामुळे ग्राहकाला सोसावा लागणारा आर्थिक फटका, कालापव्यय आदींबद्दल बिल्डरांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. अशापैकीच एन. के. गार्डनचे विकासक भूपेश बाबू यांच्या मालमत्तेचा महारेराने लिलाव करून त्या प्रकरणातील ३४ तक्रारदारांना ४ कोटी ७८ लाख रुपयांचे वाटप केले. लिलावातून पैसे वसूल करून तक्रारदारांना नुकसानभरपाई मिळण्याची ही पहिलीच घटना आहे. (Strict action against builder)


राज्यात आणखी काही ठिकाणी मालमत्ता जप्ती आणि लिलाव जाहीर होणार आहेत. महारेराने केलेल्या कारवाई अंतर्गत पनवेल क्षेत्रातील मोरबी ग्रामपंचायतीत २० एप्रिल रोजी हा लिलाव झाला होता. तसेच या लिलावानंतर आता नुकसानभरपाईसह ३४ पैकी ३० तक्रारदारांना तक्रारीचा खर्च म्हणून एकूण ६ लाख रुपये देण्यात आले आहेत. रायगड जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या सक्रियतेमुळे हे शक्य झाले आहे. भूपेश बाबू यांच्या मालमत्तांच्या लिलावात, या प्रकरणातील आधारमूल्य ३.७२ कोटी असताना लिलावात ४.८२ कोटींची बोली लागली. त्यामुळे ३४ तक्रारदारांना नुकसानभरपाईची मुद्दल रक्कम अदा करण्यात आली.

Comments
Add Comment

Schools Open : राज्यातील सर्व शाळा गुरुवारी सुरू राहणार; शाळा बंद ठेवल्यास वेतन कपातीची कारवाई

मुंबई : ९ जुलै २०२६ रोजी प्रस्तावित शाळा बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कोणतीही शाळा बंद राहणार

Central Railway : मुसळधार पावसानंतर रेल्वेची शर्यत! लोणावळा–कर्जत मार्गावर १,१०० हून अधिक कामगारांचे युद्धपातळीवर काम; एक रेल्वे मार्ग सुरू

मुंबई : लोणावळा–कर्जत घाट विभागात मुसळधार पावसामुळे झालेल्या दरडी कोसळण्याच्या घटनेनंतर मध्य रेल्वेने रेल्वे

Hasan Mushrif : राज्यात नर्सिंग शिक्षणाच्या विस्ताराला मान्यता - मंत्री हसन मुश्रीफ

- कमी शुल्कामध्ये दर्जेदार शिक्षण उपलब्ध होणार मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्थेसाठी कुशल परिचारिकांची

Devendra Fadnavis : सावंतवाडीत आता 'राजधानी'सह ३ महत्त्वाच्या गाड्या थांबणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

- रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून मंजुरीचे पत्र मुंबई : कोकण रेल्वेवरील प्रवाशांसाठी आणि विशेषतः

Pratap Sarnaik : एसटी महामंडळाचा कायापालट होणार; जुन्या बसेस बदलून ताफ्यात ई-बसेस येणार

- दुर्गम भागासाठी २००० मिडी बसेस सज्ज; मंत्री प्रताप सरनाईक यांची विधानपरिषदेत घोषणा मुंबई : भविष्यात एसटी

Devendra Fadnavis : मुंबईच्या पूर नियंत्रणासाठी १३ हजार कोटींचा आराखडा; मुख्यमंत्र्यांची घोषणा

- 'फडणवीसांना बदनाम करा, पण महाराष्ट्राला नको', विरोधकांना आवाहन मुंबई : "मुंबईला दरवर्षी भेडसावणाऱ्या