Mumbai Crime : वृद्धाश्रमातील मनोरुग्ण महिलांमध्ये मारहाण; एकीचा मृत्यू

  240

नवी मुंबई : मनोरुग्ण असलेल्या दोन वृद्ध महिलांमध्ये झालेल्या हाणामारीत एकीचा मृत्यू झाला. ही घटना नवी मुंबई येथील ऐरोली सेक्टर-४ येथे घडली.


ऐरोली सेक्टर चारमध्ये एका रोहाऊसमध्ये 'श्री स्वामी समर्थ सेवा संस्था' द्वारे चालवला जाणारा वृद्धाश्रम आहे. या वृद्धाश्रमामध्ये मनोरुग्णांची सोय केली जाते. वृद्धाश्रमातील प्रत्येक खोली तीन ते चार मनोरुग्णांना ठेवले जाते. त्याच्या खाण्यापिण्याची आणि झोपण्याचीही सोय तिथेच केली जाते.


दरम्यान, काही कारणांवरुन एका खोलीतील दोन मनोरुग्ण वृद्ध महिलांचे भांडण झाले. त्यातून एका महिलेने जेवणाचे ताड डोक्यात घालून समोरच्या महिलेला जखमी केले. तसेच, तिला जोरात चावा घेऊन रक्तबंबाळही केले. यात पीडित महिलेचा मृत्यू झाला.


वृद्धाश्रमाने दिलेल्या तक्रारीत आरोपी असलेल्या वृद्ध महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, आरोपी महिलाही मनोरुग्णच असल्याने पोलिसांनी अद्याप तीला अटक केली नाही.


मिळालेल्या माहितीनुसार, श्री स्वामी समर्थ सेवा संस्थेच्या वृद्धाश्रमात रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास आरडाओरडा ऐकू आला. खोलीत झोपलेल्या एका ६५ वर्षीय महिलेने रात्रीच्या अंधारात उठत अन्य दोन महिलांवर जोरदार हल्ला चढवला. हल्ला झाल्याचे पाहून एका महिलेने पळ काढत खोलीतील स्वच्छतागृहात आश्रय घेत दरवाजा आतून बंद केला. दरम्यान, दुसरी महिला गाढ झोपल्याने तिला या हल्ल्याचा अंदाज आला नाही. ही महिला उठत असतानाच आरोपी महिलेने तिच्या डोक्यात जेवणाच्या ताटाच्या सहाय्याने एकापाठोपाठ केलेल्या प्रहारामुळे झोपलेली ६० वर्षी महिला गंभीर जखमी झाली. त्यातच पीडितेला कडकडून चावा घेतला. ज्यामुळे ही महिला गंभीर जखमी झाली.


वृद्धाश्रमातील सेविका जेव्हा सकाळी साडेनऊच्या सुमारास वृद्धांच्या खोलीत आल्या तेव्हा घडला प्रकार उघडकीस आला. दरम्यान, खोलीत कोणीतरी बाहेरील व्यक्ती आली असल्याचे समजताच स्वच्छतागृहात लपलेली दुसरी महिलाही बाहेर आली. तिने घडलेला प्रकार सांगितला. पीडित महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिला मृत घोषीत केले.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.