Mumbai Crime : वृद्धाश्रमातील मनोरुग्ण महिलांमध्ये मारहाण; एकीचा मृत्यू

नवी मुंबई : मनोरुग्ण असलेल्या दोन वृद्ध महिलांमध्ये झालेल्या हाणामारीत एकीचा मृत्यू झाला. ही घटना नवी मुंबई येथील ऐरोली सेक्टर-४ येथे घडली.


ऐरोली सेक्टर चारमध्ये एका रोहाऊसमध्ये 'श्री स्वामी समर्थ सेवा संस्था' द्वारे चालवला जाणारा वृद्धाश्रम आहे. या वृद्धाश्रमामध्ये मनोरुग्णांची सोय केली जाते. वृद्धाश्रमातील प्रत्येक खोली तीन ते चार मनोरुग्णांना ठेवले जाते. त्याच्या खाण्यापिण्याची आणि झोपण्याचीही सोय तिथेच केली जाते.


दरम्यान, काही कारणांवरुन एका खोलीतील दोन मनोरुग्ण वृद्ध महिलांचे भांडण झाले. त्यातून एका महिलेने जेवणाचे ताड डोक्यात घालून समोरच्या महिलेला जखमी केले. तसेच, तिला जोरात चावा घेऊन रक्तबंबाळही केले. यात पीडित महिलेचा मृत्यू झाला.


वृद्धाश्रमाने दिलेल्या तक्रारीत आरोपी असलेल्या वृद्ध महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, आरोपी महिलाही मनोरुग्णच असल्याने पोलिसांनी अद्याप तीला अटक केली नाही.


मिळालेल्या माहितीनुसार, श्री स्वामी समर्थ सेवा संस्थेच्या वृद्धाश्रमात रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास आरडाओरडा ऐकू आला. खोलीत झोपलेल्या एका ६५ वर्षीय महिलेने रात्रीच्या अंधारात उठत अन्य दोन महिलांवर जोरदार हल्ला चढवला. हल्ला झाल्याचे पाहून एका महिलेने पळ काढत खोलीतील स्वच्छतागृहात आश्रय घेत दरवाजा आतून बंद केला. दरम्यान, दुसरी महिला गाढ झोपल्याने तिला या हल्ल्याचा अंदाज आला नाही. ही महिला उठत असतानाच आरोपी महिलेने तिच्या डोक्यात जेवणाच्या ताटाच्या सहाय्याने एकापाठोपाठ केलेल्या प्रहारामुळे झोपलेली ६० वर्षी महिला गंभीर जखमी झाली. त्यातच पीडितेला कडकडून चावा घेतला. ज्यामुळे ही महिला गंभीर जखमी झाली.


वृद्धाश्रमातील सेविका जेव्हा सकाळी साडेनऊच्या सुमारास वृद्धांच्या खोलीत आल्या तेव्हा घडला प्रकार उघडकीस आला. दरम्यान, खोलीत कोणीतरी बाहेरील व्यक्ती आली असल्याचे समजताच स्वच्छतागृहात लपलेली दुसरी महिलाही बाहेर आली. तिने घडलेला प्रकार सांगितला. पीडित महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिला मृत घोषीत केले.

Comments
Add Comment

Blue Flag Beach : श्रीवर्धन समुद्रकिनारा ‘ब्लू फ्लॅग बीच’ म्हणून विकसित होणार

मुंबई : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याचा शाश्वत विकास साधत त्याला ‘ब्लू फ्लॅग बीच’ म्हणून विकसित

Maharashtra : गोदा ते नर्मदा या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६ उपक्रमाचा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून होणार

मुंबई : "गोदा ते नर्मदा" या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६ चा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून

Maharashtra : उदंचन जलविद्युत प्रकल्पाद्वारे ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्र अग्रेसर ठरणार

मुंबई : राज्यातील वीज निर्मितीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येणार येत उदंचन जलविद्युत प्रकल्पातून एक

Heat Wave : उष्णता लाटेच्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी राज्य शासन सज्ज

मुंबई  : वातावरणीय बदलांमुळे राज्यात हवामानात मोठे आणि अनियमित बदल दिसून येत आहेत. मे महिन्यात पाऊस, एप्रिलमध्ये

Reservation : अनुसूचित जाती उपवर्गीकरणाबाबत निवेदन देण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने निवेदन किंवा अर्ज सादर करण्यासाठी

Nitesh Rane : मत्स्य शेतकऱ्यांच्या उत्पादनांसाठी राज्यात 'क्लस्टर', मूल्यवर्धनासाठी कारखाना उभारण्यावरही चर्चा

मुंबई : राज्यातील मत्स्यव्यवसायाला आधुनिक उद्योगाची जोड देण्यासाठी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे