Mumbai-Pune Expressway Fire Accident : खंडाळा घाटात केमिकल टँकर अपघातात ४ जणांचा मृत्यू

मदतीसाठी आलेल्या क्रेनला देखील आग, दोन्ही मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा


पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai-Pune Expressway Fire Accident) खंडाळा घाटात ऑईल टँकरला भीषण आग लागली. यामुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरील दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली.


मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळ्यात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या केमिकल टँकरला झालेल्या अपघातात आगीचा भडका उडाल्याने चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. या घटनेत परिसरही आगीने वेढला असून अनेक वाहने आगीत भस्मसात झाली. आज (मंगळवारी) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.



केमिकलमुळे द्रुतगती मार्गावर आगीचे लोट पसरल्याने पुण्या मुंबई दरम्यानची तसेच कुणेगावकडे जाणारी वाहतूक विस्कळित झाली. टँकरने पेट घेतल्यानंतर आगीचे काही लोट पुलावरून खाली पडले.


यावेळी कुणेगाव पुलाखालील काही वाहने जळाली असून एका दिवसाची व आगीचा लोट पडल्याने चौघांचा बळी गेल्याची भीती व्यक्त होत आहे. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. मदतीसाठी आलेल्या क्रेनला देखील आग लागली आहे.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये