Mumbai-Pune Expressway Fire Accident : खंडाळा घाटात केमिकल टँकर अपघातात ४ जणांचा मृत्यू

  136

मदतीसाठी आलेल्या क्रेनला देखील आग, दोन्ही मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा


पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai-Pune Expressway Fire Accident) खंडाळा घाटात ऑईल टँकरला भीषण आग लागली. यामुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरील दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली.


मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळ्यात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या केमिकल टँकरला झालेल्या अपघातात आगीचा भडका उडाल्याने चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. या घटनेत परिसरही आगीने वेढला असून अनेक वाहने आगीत भस्मसात झाली. आज (मंगळवारी) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.



केमिकलमुळे द्रुतगती मार्गावर आगीचे लोट पसरल्याने पुण्या मुंबई दरम्यानची तसेच कुणेगावकडे जाणारी वाहतूक विस्कळित झाली. टँकरने पेट घेतल्यानंतर आगीचे काही लोट पुलावरून खाली पडले.


यावेळी कुणेगाव पुलाखालील काही वाहने जळाली असून एका दिवसाची व आगीचा लोट पडल्याने चौघांचा बळी गेल्याची भीती व्यक्त होत आहे. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. मदतीसाठी आलेल्या क्रेनला देखील आग लागली आहे.

Comments
Add Comment

अशोक नगरमधील पालिकेच्या मैदानाला तलावाचे स्वरूप

नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही पालिकेचे दुर्लक्ष कांदिवली : कांदिवली पूर्वेला अशोक नगरमधील एकमेव असलेल्या

पुण्यात भिडे पूल दीड महिना बंद

पुणे : सदाशिवपेठेतून डेक्कन मेट्रो स्थानकात जाण्यासाठी महामेट्रोकडून भिडे पुलावरून लोखंडी पादचारी पूल

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची

आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकलसह शालेय साहित्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली