अखेर शरद पवारांना धमकी देणा-या आरोपीला पकडण्यात यश

  118

आयटी इंजिनीअर सागर बर्वेला पुण्यातून अटक


पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ९ जूनला सोशल मीडियावरुन अज्ञात व्यक्तींनी धमकी दिल्याचे समोर आले होते.'नर्मदाबाई पटवर्धन' व 'सौरभ पिंपळकर' या दोन अकाऊंट्सवरुन धमकी देण्यात आली होती. त्या व्यक्तींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अकाऊंट नेमके कोणाचे आहे याबाबत खुलासा होत नव्हता. याबाबत वेगाने हालचाली करत पोलीस प्रशासनाने 'नर्मदाबाई पटवर्धन' हे बनावट अकाऊंट तयार करुन शरद पवारांना धमकी देणार्‍या सागर बर्वे या आयटी इंजिनीअरला पुण्यातून अटक केली आहे. न्यायालयात दाखल केल्यानंतर सागरला १३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारी अध्यक्षा आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळेंनी केलेल्या मागणीनंतर तपासाचा वेग वाढवण्यात आला. या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पुढील तपासासाठी विविध पथकं तयार करण्यात आली होती. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी काही तांत्रिक बाबींचा आधार घेतला. अखेर आरोपीला बेड्या ठोकण्यात मुंबई गुन्हा शाखेला यश आलं. आरोपी सागर बर्वे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असून त्यानंच दोन्ही अकाउंट तयार केल्याचा पोलिसांना संशय आहे. सागरने असे कृत्य का केले, या मागे त्याचा नेमका काय उद्देश होता या सर्व बाजूने पोलिसांचा तपास सुरु आहे.


आरोपी सागर बर्वेने फेसबुकवर 'नर्मदाबाई पटवर्धन' नावाने पेज तयार केले होते. त्याने या फेसबुक पेजवरुन शरद पवार यांना उद्देशून ‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार...’, अशी धमकी दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. यासोबतच सौरभ पिंपळकर नावाच्या ट्विटर हँडलवरुनही आक्षेपार्ह भाषा वापरून पोस्ट करण्यात आली होती. या पोस्टमध्ये शरद पवार यांची तुलना औरंगजेबाशी करणारा मजकूर पोस्ट करण्यात आला होता.



संबंधित बातम्या



Comments
Add Comment

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती