औरंगजेब आपला होऊच शकत नाही : हसन मुश्रीफ

  171

कागलमधील तणावसदृश वातावरणावर हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया


कागल : सध्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी तरुणांकडून आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. राज्यात दंगली होत असल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. कोल्हापूरमधील कागलमध्येही आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी दोन गटांमध्ये तेढ निर्माण झाल्याची घटना समोर आली होती. यातील संबंधितांना अटक करण्यात आली असून या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी आज माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया मांडली.


हसन मुश्रीफ म्हणाले, भीमराव पानसेंच्या 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकात २२ सरदार आणि सैन्याचे प्रमुख महाराजांकडे होते, असं म्हटलं आहे. ती हिंदवी स्वराज्याची लढाई होती. मग २२ प्रमुख आणि मावळे यात किती मुस्लिम असतील! त्यांच्यावर विश्वास असल्याशिवाय महाराज त्यांना आपल्याकडे ठेवणार नाहीत. या मावळ्यांसोबत औरंगजेबाच्या सैन्याशी आपली लढाई झाली असेल तर औरंगजेब आपला होऊच शकत नाही. त्यामुळे मुस्लिम धर्मीयांनी आपल्या लहान व अल्पवयीन मुलांकडे लक्ष देण्याची आणि हा इतिहास त्यांना समजावून सांगण्याची आवश्यकता आहे.


पुढे ते म्हणाले, भारत - पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर आम्ही भारतामध्ये राहिलो. भारताच्या मातीमध्ये आमची नाळ घट्ट झालेली आहे. त्यामुळे भारतीयांची भक्ती ही आपली भक्ती असली पाहिजे.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत