औरंगजेब आपला होऊच शकत नाही : हसन मुश्रीफ

कागलमधील तणावसदृश वातावरणावर हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया


कागल : सध्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी तरुणांकडून आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. राज्यात दंगली होत असल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. कोल्हापूरमधील कागलमध्येही आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी दोन गटांमध्ये तेढ निर्माण झाल्याची घटना समोर आली होती. यातील संबंधितांना अटक करण्यात आली असून या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी आज माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया मांडली.


हसन मुश्रीफ म्हणाले, भीमराव पानसेंच्या 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकात २२ सरदार आणि सैन्याचे प्रमुख महाराजांकडे होते, असं म्हटलं आहे. ती हिंदवी स्वराज्याची लढाई होती. मग २२ प्रमुख आणि मावळे यात किती मुस्लिम असतील! त्यांच्यावर विश्वास असल्याशिवाय महाराज त्यांना आपल्याकडे ठेवणार नाहीत. या मावळ्यांसोबत औरंगजेबाच्या सैन्याशी आपली लढाई झाली असेल तर औरंगजेब आपला होऊच शकत नाही. त्यामुळे मुस्लिम धर्मीयांनी आपल्या लहान व अल्पवयीन मुलांकडे लक्ष देण्याची आणि हा इतिहास त्यांना समजावून सांगण्याची आवश्यकता आहे.


पुढे ते म्हणाले, भारत - पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर आम्ही भारतामध्ये राहिलो. भारताच्या मातीमध्ये आमची नाळ घट्ट झालेली आहे. त्यामुळे भारतीयांची भक्ती ही आपली भक्ती असली पाहिजे.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात