औरंगजेब आपला होऊच शकत नाही : हसन मुश्रीफ

कागलमधील तणावसदृश वातावरणावर हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया


कागल : सध्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी तरुणांकडून आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. राज्यात दंगली होत असल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. कोल्हापूरमधील कागलमध्येही आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी दोन गटांमध्ये तेढ निर्माण झाल्याची घटना समोर आली होती. यातील संबंधितांना अटक करण्यात आली असून या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी आज माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया मांडली.


हसन मुश्रीफ म्हणाले, भीमराव पानसेंच्या 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकात २२ सरदार आणि सैन्याचे प्रमुख महाराजांकडे होते, असं म्हटलं आहे. ती हिंदवी स्वराज्याची लढाई होती. मग २२ प्रमुख आणि मावळे यात किती मुस्लिम असतील! त्यांच्यावर विश्वास असल्याशिवाय महाराज त्यांना आपल्याकडे ठेवणार नाहीत. या मावळ्यांसोबत औरंगजेबाच्या सैन्याशी आपली लढाई झाली असेल तर औरंगजेब आपला होऊच शकत नाही. त्यामुळे मुस्लिम धर्मीयांनी आपल्या लहान व अल्पवयीन मुलांकडे लक्ष देण्याची आणि हा इतिहास त्यांना समजावून सांगण्याची आवश्यकता आहे.


पुढे ते म्हणाले, भारत - पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर आम्ही भारतामध्ये राहिलो. भारताच्या मातीमध्ये आमची नाळ घट्ट झालेली आहे. त्यामुळे भारतीयांची भक्ती ही आपली भक्ती असली पाहिजे.

Comments
Add Comment

Pune Crime Firing : घायवळ गॅंगचा प्रकाश धुमाळांवर गोळीबार, २०० मीटरवर पोलिस स्टेशन तरी पोलिसांना यायला अर्धा तास का लागला?

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी टोळ्यांचे थैमान थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. नुकतेच टोळीयुद्धाचे प्रकार घडून

Nanded Accident : ब्रेक फेल अन् ट्रकने उडवली जीप! दुचाक्यांचा चेंदामेदा; नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा अपघात

नांदेड : राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यात भर पडली आहे नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध