श्रीनगर (वृत्तसंस्था) : श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन बांधण्याचा महाराष्ट्र राज्य सरकारचा प्रस्ताव आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत, या दरम्यान त्यांनी श्रीनगरमध्ये जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेतली आणि महाराष्ट्र भवनासाठी श्रीनगरमध्ये जागा मिळावी, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
जम्मू-काश्मीरमध्ये आता अनेक गोष्टी बदलल्या आहेत आणि महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पर्यटक जम्म-काश्मीरला येत असतात. महाराष्ट्रातून येणाऱ्या पर्यटकांसाठी महाराष्ट भवन हा पर्याय असेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. जम्मृ-काश्मीरच्या लेफ्टनंट गव्हर्नर सिन्हा यांना मुख्यमंत्री शिंदें यांनी त्याबद्दलचे पत्र दिले. पत्रात मुख्यमंत्री म्हणतात की, पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेऊन सांस्कृतिक देवाण-घेवाण वाढवणे आणि पर्यायाने आर्थिक विकास करणे, यासाठी महाराष्ट्र भवनाला जागा मिळाल्यास दोन्ही राज्यांना त्याचा फायदा होईल. श्रीनगरमधील हे महाराष्ट्र भवन केवळ पर्यटकांना निवासाची सुविधा उपलब्ध करून देणारे राहणार नाही, तर या ठिकाणी महाराष्ट्राची समृध्द कला, खाद्य आणि संस्कृतीची झलक देखील पाहता येऊ शकेल. जम्मू आणि काश्मीर समवेत नाते अधिक दृढ करण्यासाठी या महाराष्ट्र भवनाचा उपयोग विद्यार्थी, उद्योजक, वरिष्ठ अधिकारी यांना एक प्रमुख केंद्र म्हणून करता येईल. महाराष्ट्र भवनसाठी योग्य ती जागा मिळाल्यास काश्मीरची संस्कृती, पर्यावरण लक्षात घेऊन एक चांगले भवन या ठिकाणी राज्य सरकारतर्फे बांधण्याची ग्वाही देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या पत्रात केली आहे
मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूर दौरा १३ जून रोजी निश्चित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंगळवारी तपोवन मैदानात जाहीर सभा होणार आहे, याबाबतची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. शासन आपल्या दारी कार्यक्रम कोल्हापुरात येत्या १३ जूनला होणार असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच काही मंत्री यात उपस्थित राहणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…