बाप रे! आता या पोलिसांनी करायचे काय?

मुंबई पोलिसांच्या ११६ कुटुंबीयांना तातडीने घरे खाली करण्याची नोटीस


मुंबई : ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईकरांच्या सुरक्षेची जबाबदारी वाहणा-या मुंबई पोलिसांच्या डी बी मार्ग पोलीस वसाहतीत राहणाऱ्या तब्बल ११६ पोलीस कुटुंबीयांना तातडीने घरे खाली करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या पोलिसांना डी बी मार्गऐवजी माहीम, नायगाव, वरळी येथील पर्यायी घरं दिली आहेत. त्यामुळे मुलांच्या शाळांचे कसे करायचे, हे दुसरे संकटही या पोलिसांसमोर उभे राहिले आहे.


स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये या इमारती धोकादायक असल्याने पोलीस कुटुंबीयांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. त्यातच डी बी मार्गऐवजी इतर ठिकाणी दिलेली घरे सुद्धा अतिशय निकृ्ष्ट दर्जाची असल्याचा पोलीस कुटुंबियांचा दावा आहे.


डी बी मार्ग ऐवजी माहिम, नायगाव, वरळी आदी ठिकाणी पर्यायी घरं दिली. गेल्या ३० ते ३५ वर्षापासून पोलीस कुटुंबिय या वसाहतीत राहत आहेत. आता अचानक घरं कशी खाली करायची? असा सवाल पोलीस कुटुंबियांनी सरकारला केला आहे.



पोलिसांना मोफत घरे नाहीच!


पुनर्विकास प्रकल्पात असणाऱ्या पोलिसांच्या या घरांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. पोलीस वसाहतीची दुरवस्था झाली असून पोलिसांना कुटुंबीयांसह जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे.


मुंबईतील बीडीडी चाळीत वास्तव्य करणाऱ्या पोलिसांना १५ लाख रुपयात घरे देणार असल्याची घोषणा मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे.


देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, पोलिसांना मोफत घरे द्यावी अशी मागणी कालिदास कोळंबकर यांनी केली होती. मीदेखील या मताचा होतो. मात्र, विभागाशी चर्चा केल्यानंतर आपल्याला कर्मचाऱ्यांमध्ये भेद करता येणार नाही. पोलिसांना मोफत घरे दिल्यानंतर शासकीय कर्मचारीदेखील हीच मागणी करतील आणि कर्मचाऱ्यांमध्ये भेद करता येणार नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले होते.


दरम्यान, पोलिसांच्या कुटुंबियांवर निवृत्तीनंतर बिकट परिस्थिती ओढवते. मुंबईत घर घेणे परवडत नाही. त्यामुळेच परवडणाऱ्या घरांच्या योजनेत पोलीस कर्मचाऱ्यांसाठी घरे राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून हक्काची घरे उपलब्ध होणार असल्यामुळे पोलिसांची मोठी चिंता दूर होईल, असेही ते म्हणाले.

Comments
Add Comment

महापालिकेच्या मालमत्ता कराची ऑक्टोबर पहिल्या पंधरवड्यापर्यंत एवढी झाली वसूली, अधिकारी लागले कामाला...

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महानगरपालिकेच्या महसुलाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कराची वसूली १७ ऑक्टोबर

तलाव भरले, तरीही मुंबईत पाण्याची का समस्या, जाणून घ्या कारण!

मुंबई (सचिन धानजी): मुंबईला पाणी पुरवठा करणारे सर्व तलाव आणि धरणे काठोकाठ भरल्यानंतरही पुढील १५ दिवसांमध्येच

आता पावसाळ्यात मध्य रेल्वेच्या रुळावर पाणी साचणार नाही! भुयारी टाकी बसवण्याचा मुंबई पालिकेचा नवा प्रकल्प

मुंबई: पावसाळ्यात दरवर्षी मुंबईत अनेक सखल भागांमध्ये पाणी भरते. तसेच अती पाऊस पडल्यावर मुंबईतील रेल्वेच्या

वंदे भारत एक्स्प्रेसला ६ तास उशीर

मुंबई : वेगवान प्रवासासाठी ओळखली जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस ६ तास विलंबाने धावली. वंदे भारतच्या वेळापत्रकात

भारताने प्राचीन धर्मग्रंथांची िशकवण जोपासावी: मोहन भागवत

सरसंघचालकांच्या हस्ते ‘आर्य युग विषय कोशा’चे लोकार्पण मुंबई : "भारताला प्राचीन विद्या आणि संस्कृतीची मोठी

कफ परेड येथील चाळीत भीषण आग; एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, तीन जण जखमी

मुंबई: मुंबईतील कफ परेड परिसरात पहाटेच्या सुमारास झालेल्या एका भीषण आगीच्या दुर्घटनेत एका १५ वर्षीय मुलाचा