मुंबई : ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईकरांच्या सुरक्षेची जबाबदारी वाहणा-या मुंबई पोलिसांच्या डी बी मार्ग पोलीस वसाहतीत राहणाऱ्या तब्बल ११६ पोलीस कुटुंबीयांना तातडीने घरे खाली करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या पोलिसांना डी बी मार्गऐवजी माहीम, नायगाव, वरळी येथील पर्यायी घरं दिली आहेत. त्यामुळे मुलांच्या शाळांचे कसे करायचे, हे दुसरे संकटही या पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये या इमारती धोकादायक असल्याने पोलीस कुटुंबीयांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. त्यातच डी बी मार्गऐवजी इतर ठिकाणी दिलेली घरे सुद्धा अतिशय निकृ्ष्ट दर्जाची असल्याचा पोलीस कुटुंबियांचा दावा आहे.
डी बी मार्ग ऐवजी माहिम, नायगाव, वरळी आदी ठिकाणी पर्यायी घरं दिली. गेल्या ३० ते ३५ वर्षापासून पोलीस कुटुंबिय या वसाहतीत राहत आहेत. आता अचानक घरं कशी खाली करायची? असा सवाल पोलीस कुटुंबियांनी सरकारला केला आहे.
पुनर्विकास प्रकल्पात असणाऱ्या पोलिसांच्या या घरांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. पोलीस वसाहतीची दुरवस्था झाली असून पोलिसांना कुटुंबीयांसह जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे.
मुंबईतील बीडीडी चाळीत वास्तव्य करणाऱ्या पोलिसांना १५ लाख रुपयात घरे देणार असल्याची घोषणा मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, पोलिसांना मोफत घरे द्यावी अशी मागणी कालिदास कोळंबकर यांनी केली होती. मीदेखील या मताचा होतो. मात्र, विभागाशी चर्चा केल्यानंतर आपल्याला कर्मचाऱ्यांमध्ये भेद करता येणार नाही. पोलिसांना मोफत घरे दिल्यानंतर शासकीय कर्मचारीदेखील हीच मागणी करतील आणि कर्मचाऱ्यांमध्ये भेद करता येणार नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले होते.
दरम्यान, पोलिसांच्या कुटुंबियांवर निवृत्तीनंतर बिकट परिस्थिती ओढवते. मुंबईत घर घेणे परवडत नाही. त्यामुळेच परवडणाऱ्या घरांच्या योजनेत पोलीस कर्मचाऱ्यांसाठी घरे राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून हक्काची घरे उपलब्ध होणार असल्यामुळे पोलिसांची मोठी चिंता दूर होईल, असेही ते म्हणाले.
मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…
दिवसभरातील (Prahaar Bulletin) महत्वाच्या बातम्या… टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत काही चाहते आजारी तर काही झाले…
राज्य मंत्रिमंडळाने घेतला मोठा निर्णय मुंबई : सरकारने माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर आता…
प्रश्नपत्रिका तयार करतानाच घेणार 'ही' खास काळजी मुंबई : NEET PG परीक्षा रद्द झाल्यानंतर जवळपास…
यांचा वारीतला सहभाग केवळ राजकीय फायद्यासाठी भाजपाच्या माजी खासदारांची विरोधकांवर बोचरी टीका सोलापूर : आषाढी…
आमदार नितेश राणे यांचा रोहित पवारांना अप्रत्यक्ष टोला कोणाची बुद्धी लहान याबाबत राहुल गांधी आणि…