काँग्रेसने भाकरी फिरवली!

  137

मुंबईच्या अध्यक्षपदी वर्षा गायकवाड, गुजरातच्या प्रदेशाध्यक्षपदी खासदार शक्तीसिंह गोहील तर पुद्दुचेरी प्रदेशाध्यक्षपदी खासदार वैथिलिंगम यांची नियुक्ती


मुंबई/नवी दिल्ली : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली असून पक्षाचे पदाधिकारी बदलण्यात येत आहेत. त्यानुसार आगामी मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मुंबई अध्यक्षपदावरून भाई जगताप यांना हटवले असून त्यांच्या जागी दलित चेहरा असलेल्या आमदार व माजी मंत्री वर्षा गायकवाड यांची नियुक्ती केली आहे.


काँग्रेसने गुजरातच्या प्रदेशाध्यक्षपदी खासदार शक्तीसिंह गोहील यांची नियुक्ती केली आहे. पुद्दुचेरी प्रदेशाध्यक्षपदी खासदार वैथिलिंगम यांची नियुक्ती केली आहे. तर आमदार वर्षा गायकवाड यांची मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने हा निर्णय घेतला असून, अधिकृतपणे पत्र काढले असून या तिन्ही नियुक्त्या तात्काळ प्रभावाने करण्यात आल्या आहेत.


वर्षा गायकवाड यांचे वडिल एकनाथ गायकवाड हे खासदार राहिले आहेत. तेही मुंबईचे अध्यक्ष होते. वर्षा गायकवाड या धारावी विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आल्या आहेत. गायकवाड या सर्वसमावेशक, सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व आहे. तसेच दलित आणि मुस्लिम मतदारांमध्ये त्यांचा प्रभाव आहे. गायकवाड यांचा मुंबईत चांगला जनसंपर्क आहे.


वर्षा गायकवाड यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करून काँग्रेसकडून अनुसूचित जातींच्या मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न केला असल्याचे म्हटले जात आहे. मागील काही वर्षात अल्पसंख्याक, अनुसूचित जाती-जमाती आदी काँग्रेसचा मतदार घटक पक्षापासून दूर गेला होता.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता