कोल्हापूर जिल्ह्यातील बालिंगा येथे ज्वेलर्सवर दरोडा

दोन दिवसांनंतरही दरोडेखोरांचा पत्ता नाही


बालिंगा : कोल्हापूर जिल्ह्यातील बालिंगा येथे बस स्टॉपजवळ असलेल्या कात्यायनी ज्वेलर्स दुकानावर भरदिवसा दरोडा पडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी, ८ जूनला दुपारी दोन ते सव्वादोन या वेळेत घडली. यात दरोडेखोरांनी ३ किलो सोन्याचे दागिने आणि दीड लाखांची रोकड असा तब्बल १ कोटी ८५ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.


या दरोडेखोरांची काही दृश्ये सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहेत. यात ते सिनेमा स्टाईलने बंदुकीचा धाक दाखवत दागिन्यांची पिशवी घेऊन बाईकवरुन जात असल्याचे दिसले आहे. मात्र या घटनेला दोन दिवस उलटून गेल्यानंतरही या दरोडेखोरांना पकडण्यात तपास यंत्रणेला यश आलेले नाही.



बंदुकीचा धाक दाखवून लूटमार

गुरुवारी दुकान मालक रमेश माळी, त्यांचा मेहुणा जितू आणि मुलगा पियुष हे तिघे दुकानात होते. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास दोन व्यक्ती दुकानात आल्या. यातील एकाच्या डोक्यावर हेल्मेट होते तर दुसऱ्याने रुमालाने आपला चेहरा झाकला होता. बंदुकीचा धाक दाखवून दरोडेखोरांनी लूटमार केली. यात दुकानदाराने विरोध दर्शवल्यानंतर गोळीबारही करण्यात आला. दुकानदारासह त्याचा एक सहकारी यात गंभीर जखमी झाला आहे. दुकानाबाहेर जमलेल्या जमावावरही दरोडेखोरांनी गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे.


आसपासच्या दुकानांमधील नागरिकांनी तातडीने याची माहिती करवीर पोलिसांना देऊन जखमींना उपचारासाठी राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. दोघांचीही प्रकृती गंभीर आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या दोन पथकांकडून दरोडेखोरांचा शोध सुरू आहे.



मुलगा लपून बसल्याने चांदी आणि रोकड सुरक्षित

दरोडेखोरांनी झटापट करताच दुकानातील भेदरलेला मुलगा पीयूष हा कोपऱ्यातील स्ट्राँगरूममध्ये जाऊन लपला. दरोडेखोर दुकानाबाहेर पडल्यानंतरच तो खोलीतून बाहेर आल्याने त्याला कोणतीही इजा झाली नाही. तसेच स्ट्राँगरूममधील चांदी आणि रोकड सुरक्षित राहिली. मात्र, या घटनेने तो प्रचंड घाबरला होता. त्यानेच घटनेची सर्व माहिती पोलिस अधिकाऱ्यांना सांगितली.

Comments
Add Comment

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

पाणी समजून प्यायलं थिनर; चार वर्षांच्या चिमुकल्याच्या तोंडापासून ते पोटापर्यंत...

ठाणे : ठाण्याच्या इंदिरानगरमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. चार वर्षाच्या चिमुकल्याने चुकून पाणी समजून

मराठमोळ्या मुलीशी लग्न करुन आता पत्नीला बुरख्यातच ठेवतो; म्हणाल्या, पुरुष स्त्रियांकडे...

मुंबई: प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अदनान शेख सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत