कोल्हापूर जिल्ह्यातील बालिंगा येथे ज्वेलर्सवर दरोडा

दोन दिवसांनंतरही दरोडेखोरांचा पत्ता नाही


बालिंगा : कोल्हापूर जिल्ह्यातील बालिंगा येथे बस स्टॉपजवळ असलेल्या कात्यायनी ज्वेलर्स दुकानावर भरदिवसा दरोडा पडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी, ८ जूनला दुपारी दोन ते सव्वादोन या वेळेत घडली. यात दरोडेखोरांनी ३ किलो सोन्याचे दागिने आणि दीड लाखांची रोकड असा तब्बल १ कोटी ८५ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.


या दरोडेखोरांची काही दृश्ये सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहेत. यात ते सिनेमा स्टाईलने बंदुकीचा धाक दाखवत दागिन्यांची पिशवी घेऊन बाईकवरुन जात असल्याचे दिसले आहे. मात्र या घटनेला दोन दिवस उलटून गेल्यानंतरही या दरोडेखोरांना पकडण्यात तपास यंत्रणेला यश आलेले नाही.



बंदुकीचा धाक दाखवून लूटमार

गुरुवारी दुकान मालक रमेश माळी, त्यांचा मेहुणा जितू आणि मुलगा पियुष हे तिघे दुकानात होते. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास दोन व्यक्ती दुकानात आल्या. यातील एकाच्या डोक्यावर हेल्मेट होते तर दुसऱ्याने रुमालाने आपला चेहरा झाकला होता. बंदुकीचा धाक दाखवून दरोडेखोरांनी लूटमार केली. यात दुकानदाराने विरोध दर्शवल्यानंतर गोळीबारही करण्यात आला. दुकानदारासह त्याचा एक सहकारी यात गंभीर जखमी झाला आहे. दुकानाबाहेर जमलेल्या जमावावरही दरोडेखोरांनी गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे.


आसपासच्या दुकानांमधील नागरिकांनी तातडीने याची माहिती करवीर पोलिसांना देऊन जखमींना उपचारासाठी राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. दोघांचीही प्रकृती गंभीर आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या दोन पथकांकडून दरोडेखोरांचा शोध सुरू आहे.



मुलगा लपून बसल्याने चांदी आणि रोकड सुरक्षित

दरोडेखोरांनी झटापट करताच दुकानातील भेदरलेला मुलगा पीयूष हा कोपऱ्यातील स्ट्राँगरूममध्ये जाऊन लपला. दरोडेखोर दुकानाबाहेर पडल्यानंतरच तो खोलीतून बाहेर आल्याने त्याला कोणतीही इजा झाली नाही. तसेच स्ट्राँगरूममधील चांदी आणि रोकड सुरक्षित राहिली. मात्र, या घटनेने तो प्रचंड घाबरला होता. त्यानेच घटनेची सर्व माहिती पोलिस अधिकाऱ्यांना सांगितली.

Comments
Add Comment

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय