कोल्हापूर जिल्ह्यातील बालिंगा येथे ज्वेलर्सवर दरोडा

  306

दोन दिवसांनंतरही दरोडेखोरांचा पत्ता नाही


बालिंगा : कोल्हापूर जिल्ह्यातील बालिंगा येथे बस स्टॉपजवळ असलेल्या कात्यायनी ज्वेलर्स दुकानावर भरदिवसा दरोडा पडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी, ८ जूनला दुपारी दोन ते सव्वादोन या वेळेत घडली. यात दरोडेखोरांनी ३ किलो सोन्याचे दागिने आणि दीड लाखांची रोकड असा तब्बल १ कोटी ८५ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.


या दरोडेखोरांची काही दृश्ये सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहेत. यात ते सिनेमा स्टाईलने बंदुकीचा धाक दाखवत दागिन्यांची पिशवी घेऊन बाईकवरुन जात असल्याचे दिसले आहे. मात्र या घटनेला दोन दिवस उलटून गेल्यानंतरही या दरोडेखोरांना पकडण्यात तपास यंत्रणेला यश आलेले नाही.



बंदुकीचा धाक दाखवून लूटमार

गुरुवारी दुकान मालक रमेश माळी, त्यांचा मेहुणा जितू आणि मुलगा पियुष हे तिघे दुकानात होते. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास दोन व्यक्ती दुकानात आल्या. यातील एकाच्या डोक्यावर हेल्मेट होते तर दुसऱ्याने रुमालाने आपला चेहरा झाकला होता. बंदुकीचा धाक दाखवून दरोडेखोरांनी लूटमार केली. यात दुकानदाराने विरोध दर्शवल्यानंतर गोळीबारही करण्यात आला. दुकानदारासह त्याचा एक सहकारी यात गंभीर जखमी झाला आहे. दुकानाबाहेर जमलेल्या जमावावरही दरोडेखोरांनी गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे.


आसपासच्या दुकानांमधील नागरिकांनी तातडीने याची माहिती करवीर पोलिसांना देऊन जखमींना उपचारासाठी राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. दोघांचीही प्रकृती गंभीर आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या दोन पथकांकडून दरोडेखोरांचा शोध सुरू आहे.



मुलगा लपून बसल्याने चांदी आणि रोकड सुरक्षित

दरोडेखोरांनी झटापट करताच दुकानातील भेदरलेला मुलगा पीयूष हा कोपऱ्यातील स्ट्राँगरूममध्ये जाऊन लपला. दरोडेखोर दुकानाबाहेर पडल्यानंतरच तो खोलीतून बाहेर आल्याने त्याला कोणतीही इजा झाली नाही. तसेच स्ट्राँगरूममधील चांदी आणि रोकड सुरक्षित राहिली. मात्र, या घटनेने तो प्रचंड घाबरला होता. त्यानेच घटनेची सर्व माहिती पोलिस अधिकाऱ्यांना सांगितली.

Comments
Add Comment

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती