धुळ्यात हिंदुत्ववादी संघटनांचा जनआक्रोश मोर्चा

मूर्तीची विटंबना केल्याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक


धुळे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी धार्मिक वाद उसळत आहेत. दंगली, हाणामारीचे प्रकार वाढून राज्यात ताणतणाव निर्माण झाला आहे. त्यातच बुधवारी धुळे शहरातील मोगलाई परिसरात एका धार्मिक स्थळातील मूर्तीची विटंबना केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी धुळ्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक होऊन आज मोर्चाचे आयोजन केले आहे.


मूर्तीची विटंबना झाल्यामुळे रामाची नवीन मूर्ती मंदिरात स्थापन करण्यात येणार आहे. या मूर्तीची पूजा पार पडली असून या मोर्चाद्वारे मूर्ती आगरा रोडवरील श्रीराम मंदिरापर्यंत नेली जाईल. या मोर्चाला कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद असून कार्यकर्ते भगव्या टोप्या व भगवे झेंडे घेऊन मोर्चात दाखल झाले आहेत. या मोर्चामध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल अशा विविध संघटनादेखील सहभागी झाल्या आहेत. तसेच खासदार सुभाष भामरे, महापौर प्रतिभा चौधरी, माजी आमदार राजवर्धन कदमपाटील, माजी महापौर जयश्री अहिरराव, भारतीय जनता पार्टीचे महानगरप्रमुख अनुप अग्रवाल, प्रदीप करपे हेदेखील यात सहभागी झाले आहेत.


धुळ्यात कोणतीही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेत पोलिसांनी मोर्चाच्या मार्गावर कडेकोट बंदोबस्त केला आहे. जवळपास ४५० अधिकारी व २०हून अधिक पोलीस कर्मचारी मोर्चाच्या मार्गावर तैनात असणार आहेत. पोलीसांनी कार्यकर्त्यांना शांताता राखण्याचे आवाहन केले आहे.


मोर्चा मंदिरात पोहोचल्यानंतर त्याठिकाणी महाआरती होणार आहे. त्यानंतर हा मोर्चा शिवाजी महाराजांचा पुतळा असलेल्या शिवतीर्थ चौक येथे पोहोचणार आहे व त्या ठिकाणी मोर्चाचा समारोप केला जाणार आहे.



संबंधित बातमी -

Comments
Add Comment

Pune Crime : पुण्यात धक्कादायक प्रकार; कामशेतमध्ये दुकानाच्या चेंजिंग रूममध्ये.....

पुणे : पुणे जिल्ह्यातील कामशेत परिसरात दुकानांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी

Intelligence Bureau : पालघरमध्ये 'इंटेलिजन्स ब्युरो'साठी हक्काची जागा

- महसूल विभागाचा मोठा निर्णय; वसईत कार्यालय आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा मुंबई : पालघर जिल्ह्याच्या

Cyclone Shelter Center in Dapoli : दापोली तालुक्यातील चक्रीवादळ निवारा केंद्रासाठी महसूलकडून विनामूल्य जागा

मुंबई : कोकण किनारपट्टीवरील आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला

Onion processing industry: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा प्रक्रिया उद्योगास चालना देणार - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा दरातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळून स्पर्धात्मक दर मिळावा,

Industries Minister Dr. Uday Samant : पांढरकवडा येथे 86 हेक्टरवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापनेला गती - उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी केळापूर तालुक्यातील मौजे

Industries Minister Dr. Uday Samant - 'एमआयडीसी’कडे लवकरच हस्तांतरित करणार : उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरन येथील 250 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित जमिनीपैकी