धुळ्यात हिंदुत्ववादी संघटनांचा जनआक्रोश मोर्चा

  170

मूर्तीची विटंबना केल्याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक


धुळे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी धार्मिक वाद उसळत आहेत. दंगली, हाणामारीचे प्रकार वाढून राज्यात ताणतणाव निर्माण झाला आहे. त्यातच बुधवारी धुळे शहरातील मोगलाई परिसरात एका धार्मिक स्थळातील मूर्तीची विटंबना केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी धुळ्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक होऊन आज मोर्चाचे आयोजन केले आहे.


मूर्तीची विटंबना झाल्यामुळे रामाची नवीन मूर्ती मंदिरात स्थापन करण्यात येणार आहे. या मूर्तीची पूजा पार पडली असून या मोर्चाद्वारे मूर्ती आगरा रोडवरील श्रीराम मंदिरापर्यंत नेली जाईल. या मोर्चाला कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद असून कार्यकर्ते भगव्या टोप्या व भगवे झेंडे घेऊन मोर्चात दाखल झाले आहेत. या मोर्चामध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल अशा विविध संघटनादेखील सहभागी झाल्या आहेत. तसेच खासदार सुभाष भामरे, महापौर प्रतिभा चौधरी, माजी आमदार राजवर्धन कदमपाटील, माजी महापौर जयश्री अहिरराव, भारतीय जनता पार्टीचे महानगरप्रमुख अनुप अग्रवाल, प्रदीप करपे हेदेखील यात सहभागी झाले आहेत.


धुळ्यात कोणतीही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेत पोलिसांनी मोर्चाच्या मार्गावर कडेकोट बंदोबस्त केला आहे. जवळपास ४५० अधिकारी व २०हून अधिक पोलीस कर्मचारी मोर्चाच्या मार्गावर तैनात असणार आहेत. पोलीसांनी कार्यकर्त्यांना शांताता राखण्याचे आवाहन केले आहे.


मोर्चा मंदिरात पोहोचल्यानंतर त्याठिकाणी महाआरती होणार आहे. त्यानंतर हा मोर्चा शिवाजी महाराजांचा पुतळा असलेल्या शिवतीर्थ चौक येथे पोहोचणार आहे व त्या ठिकाणी मोर्चाचा समारोप केला जाणार आहे.



संबंधित बातमी -

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक