शेतकरी रस्त्यावर उतरल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा

Share

राज्यात निदर्शने आणि आंदोलने सुरु असताना आता शरद पवारांनी शेतक-यांना केले रस्त्यावर उतरण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : राज्यकर्ते आणि त्यांचे सहकारीच रस्त्यावर येऊ लागले व त्यामुळे दोन गटांमध्ये कटुता निर्माण होत असेल तर, ही काही चांगली गोष्ट नाही. सकाळी टीव्हीवर पाहिले कोणीतरी औरंगजेबाचे छायाचित्र दाखविला. त्यावरून पुण्यात व अन्य ठिकाणी पडसाद उमटण्याचे कारण काय आहे? औरंगजेबाचे छायाचित्र दाखविले म्हणून काय परिणाम होतो, हे मला कळत नाही. पाणी, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण आदी पायाभूत सुविधांवर राज्यकर्त्यांचे लक्ष असले पाहिजे. सध्या कांदा, कापूस, सोयाबीन शेतकऱ्यांकडे पडून आहे. अशावेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला तर राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या मागे राहील, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आता शेतक-यांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले आहे.

कोल्हापूरला कुणीतरी मोबाईलवर पाठविलेला मेसेज चुकीचा असेलही, पण म्हणून लगेच रस्त्यावर उतरून धार्मिक स्वरूप देणे योग्य नाही. आज सत्ताधारी पक्ष अशा गोष्टींना प्रोत्साहित करतो. शांतता आणि सुव्यवस्था ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे, असे पवार म्हणाले.

येथे बुधवारी पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षात (बीआरएस) कोण जाते, याचा आढावा घेतला. काहींच्या जाण्यावरून फारशी चिंता करण्याची गरज नाही. ‘केसीआर’ महाराष्ट्रात येणार असतील तर, येऊ देत. सबंध देश त्यांना मोकळा आहे, असेही पवार म्हणाले.

राज्यपाल रमेश बैस यांनी बाजीराव पेशवे यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर पवार म्हणाले, ‘पेशव्यांच्यासंबंधी आस्था असलेला वर्ग आजही आहे. मागचे राज्यपाल फारच बोलके होते, हे आताचे कसे आहेत, ते अजून स्पष्ट झालेले नाही.’ असा चिमटा पवार यांनी काढला.

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

1 hour ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

2 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

2 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

4 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

5 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

5 hours ago