शेतकरी रस्त्यावर उतरल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा

  105

राज्यात निदर्शने आणि आंदोलने सुरु असताना आता शरद पवारांनी शेतक-यांना केले रस्त्यावर उतरण्याचे आवाहन


छत्रपती संभाजीनगर : राज्यकर्ते आणि त्यांचे सहकारीच रस्त्यावर येऊ लागले व त्यामुळे दोन गटांमध्ये कटुता निर्माण होत असेल तर, ही काही चांगली गोष्ट नाही. सकाळी टीव्हीवर पाहिले कोणीतरी औरंगजेबाचे छायाचित्र दाखविला. त्यावरून पुण्यात व अन्य ठिकाणी पडसाद उमटण्याचे कारण काय आहे? औरंगजेबाचे छायाचित्र दाखविले म्हणून काय परिणाम होतो, हे मला कळत नाही. पाणी, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण आदी पायाभूत सुविधांवर राज्यकर्त्यांचे लक्ष असले पाहिजे. सध्या कांदा, कापूस, सोयाबीन शेतकऱ्यांकडे पडून आहे. अशावेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला तर राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या मागे राहील, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आता शेतक-यांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले आहे.


कोल्हापूरला कुणीतरी मोबाईलवर पाठविलेला मेसेज चुकीचा असेलही, पण म्हणून लगेच रस्त्यावर उतरून धार्मिक स्वरूप देणे योग्य नाही. आज सत्ताधारी पक्ष अशा गोष्टींना प्रोत्साहित करतो. शांतता आणि सुव्यवस्था ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे, असे पवार म्हणाले.


येथे बुधवारी पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षात (बीआरएस) कोण जाते, याचा आढावा घेतला. काहींच्या जाण्यावरून फारशी चिंता करण्याची गरज नाही. ‘केसीआर’ महाराष्ट्रात येणार असतील तर, येऊ देत. सबंध देश त्यांना मोकळा आहे, असेही पवार म्हणाले.


राज्यपाल रमेश बैस यांनी बाजीराव पेशवे यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर पवार म्हणाले, ‘पेशव्यांच्यासंबंधी आस्था असलेला वर्ग आजही आहे. मागचे राज्यपाल फारच बोलके होते, हे आताचे कसे आहेत, ते अजून स्पष्ट झालेले नाही.’ असा चिमटा पवार यांनी काढला.

Comments
Add Comment

बियाणांसोबत शेतकऱ्यांना खतांची व इतर सक्ती नको : मच्छिंद्र मंडलिक

अकोले : अकोले अदिवासी तालुक्यामध्ये मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी राजा मोठ्या प्रमाणात अगोदरच

चेंबर, ड्रेनेज लाईनच्या साफसफाईसाठी दोन नवीन अत्याधुनिक वाहने

आ. संग्राम जगताप : नवीन वाहनांमुळे तक्रारींवर तत्काळ उपाययोजना होतील अहिल्यानगर : दिवसेंदिवस शहराचा विस्तार होत

विद्यार्थ्यांना करिअर घडवताना कॉमर्समधून भरपूर ऑप्शन: दीपक गोंदकर

शिर्डी : १२ वी नंतर आपण काय करू शकतो हे सर्व विद्यार्थ्याच्या जीवनातील सर्वात मोठे कन्फुझन असते, कि काय केले

निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग

राहुरी : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत आयोजित तालुकास्तरीय वरिष्ठ श्रेणी व निवड

भटके-विमुक्त आदिवासींचे आंदोलन स्थगित

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथील जोशी वस्ती वरील आदिवासी भटके विमुक्तांचे अतिक्रमित घरे

पंढरपूर वारीसाठी ड्रोन, एआयचा वापर

सोलापूर : पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी लाखो वारकरी दरवर्षी पंढरीत गर्दी करतात. या गर्दीच्या नियंत्रणासाठी ड्रोन,