अखेर मान्सून केरळात दाखल

पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मान्सून) तब्बल सात दिवस उशिराने, पण केरळात आगमन झाले आहे. मान्सूनने दक्षिण तामिळनाडू आणि केरळचा बराचसा भाग गुरुवारी (ता. ८) व्यापला आहे. अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने गुरुवारी जाहीर केले.


देशात मान्सूनच्या पुढील वाटचालीस आता सुरुवात झाली आहे. सध्या मान्सूनने केरळचा बहुतांश भाग, दक्षिण तामिळनाडू, दक्षिण अरबी समुद्राचा उर्वरित भाग, लक्षद्वीप बेटे, ईशान्य आणि मध्य बंगालच्या उपसागराचा भाग व्यापले आहे.


दरम्यान पुढील ४८ तासात संपूर्ण केरळसह तामिळनाडू, कर्नाटक, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या आणखीन काही भागात मान्सून प्रगती करेल. असे हवामानशास्त्र विभागाने नमूद केले आहे.


साधारणपणे मान्सून १ जूनपर्यंत (दीर्घकालीन आगमनाच्या वेळेनुसार) केरळमध्ये दाखल होतो. मात्र त्यास विलंब झाला असून प्रत्यक्षात गुरुवारी (ता. ८) केरळमध्ये मान्सूनने आगमन केले आहे. त्यामुळे यंदा मान्सूनने ७ दिवस उशिराने देशाच्या भूभागात केरळमध्ये प्रगती केली. या आधी २०१९ मध्ये ही ८ जूनला मान्सून केरळात पोहोचले होते.


पुढील दोन दिवसात संपूर्ण केरळ व्यापण्याची शक्यता असून मध्य अरबी समुद्र, तामिळनाडूचा आणखी काही भाग, कर्नाटक आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागात तसेच ईशान्येकडील राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Barabanki Road Accident : वेगमर्यादेचा बळी! बाराबंकीत ट्रक-अर्टिगाच्या धडकेत ६ ठार, ८ गंभीर जखमी; कारचा अक्षरशः चक्काचूर!

बाराबंकी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बाराबंकी (Barabanki) जिल्ह्यात सोमवारी रात्री भीषण रस्ते अपघात झाल्याची घटना समोर

Bengaluru News : क्रूरतेचा कळस! मोलकरणीनं लिफ्टमध्ये कुत्र्याच्या पिल्लाला आपटून संपवलं; मोलकरणीचं खोटं नाटक CCTV फूटेजमुळे उघड

बंगळुरु : कर्नाटकची राजधानी बंगळुरु (Bengaluru) येथील बागलूर (Bagaluru) मधील एका अपार्टमेंटमध्ये मुक्या जनावरासोबत अतिशय

Naxalite Surrender : 'सुनीता'चा माओवादी संघटनेला रामराम! १४ लाखांचे इनाम असलेली महिला नक्षलवादी अखेर शरण

बालाघाट : नक्षलग्रस्त भागातून एक मोठी आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) बालाघाट

राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला, तर कंत्राटदाराला दंड; केंद्र सरकारचा निर्णय

निर्धारित कालावधीत एकापेक्षा जास्त अपघात झाल्यास होणार कारवाई नवी दिल्ली  : रस्ते अपघात आणि मृत्यू रोखण्यासाठी,

'पप्पू, टप्पू आणि अप्पू' - महाआघाडी म्हणजे गांधीजींची तीन माकडं!

योगी आदित्यनाथ यांचा बिहारमधून राहुल, तेजस्वी, अखिलेशवर हल्लाबोल दरभंगा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या

राहुल गांधींनी केला छठी मैय्याचा अपमान; बिहारमध्ये प्रचंड बहुमताने एनडीए सरकार स्थापन होईल - अमित शाह

पाटणा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी शेओहर आणि सीतामढी जिल्ह्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)