तुळजाभवानीला भाविकांनी अर्पण केलेल्या सोने-चांदीची मोजमाप सुरू; अंदाजे २०० किलो सोने तर ४ हजार किलो चांदी

आरबीआयकडून वितळून दिले जाणार सोने


तुळजापूर : दरवर्षी लाखो पर्यटक धार्मिक स्थळांना भेटी देत असतात. त्यात तुळजापूर म्हणजे भाविकांचे श्रद्धास्थान. देश-विदेशातून भाविक तुळजाभवानीच्या दर्शनासाठी मंदिराला भेट देतात. देवीवरची श्रद्धा म्हणून भाविक आपापल्या परीने देवीला देणगी देखील देतात. यंदा १० वर्षांनंतर प्रथमच या देणगीचे मोजमाप केले जात आहे. आतापर्यंत अंदाजे २०० किलो सोने तर ४ हजार किलो चांदी जमा झाल्याचे बोलले जात आहे. हे सोने आरबीआयकडून वितळून दिले जाणार आहे.


रोज सकाळी १० सायंकाळी ६ वेळेत ही मोजमाप केली जाणार आहे. यात कोणत्याही प्रकारे लबाडी किंवा गैरवर्तन होऊ नये यासाठी पुरेपूर खबरदारी घेण्यात आली आहे. मंदिराच्या दर्शन मंडपातील चौथ्या मजल्यावरील हॉलमध्ये कडक सुरक्षेत हे काम सुरू करण्यात आलं आहे. सोने मोजदाद प्रक्रिया ही व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि सीसीटीव्ही कॅमेराच्या निगराणीत करण्यात येत आहे. या सोने मोजदादसाठी शासकीय परवाना धारक मुंबईचे सिध्दीविनायक मंदिराचे सोने मोजदाद करणारे पुरुषोत्तम काळे खास उपस्थितीत होते. या प्रक्रियेदरम्यान मोजदाद करणाऱ्या मंडळीना खास वेश वापरण्यास दिला होता, ज्यात टी शर्ट, पँटला एकही खिसा नव्हता.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे