तुळजाभवानीला भाविकांनी अर्पण केलेल्या सोने-चांदीची मोजमाप सुरू; अंदाजे २०० किलो सोने तर ४ हजार किलो चांदी

आरबीआयकडून वितळून दिले जाणार सोने


तुळजापूर : दरवर्षी लाखो पर्यटक धार्मिक स्थळांना भेटी देत असतात. त्यात तुळजापूर म्हणजे भाविकांचे श्रद्धास्थान. देश-विदेशातून भाविक तुळजाभवानीच्या दर्शनासाठी मंदिराला भेट देतात. देवीवरची श्रद्धा म्हणून भाविक आपापल्या परीने देवीला देणगी देखील देतात. यंदा १० वर्षांनंतर प्रथमच या देणगीचे मोजमाप केले जात आहे. आतापर्यंत अंदाजे २०० किलो सोने तर ४ हजार किलो चांदी जमा झाल्याचे बोलले जात आहे. हे सोने आरबीआयकडून वितळून दिले जाणार आहे.


रोज सकाळी १० सायंकाळी ६ वेळेत ही मोजमाप केली जाणार आहे. यात कोणत्याही प्रकारे लबाडी किंवा गैरवर्तन होऊ नये यासाठी पुरेपूर खबरदारी घेण्यात आली आहे. मंदिराच्या दर्शन मंडपातील चौथ्या मजल्यावरील हॉलमध्ये कडक सुरक्षेत हे काम सुरू करण्यात आलं आहे. सोने मोजदाद प्रक्रिया ही व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि सीसीटीव्ही कॅमेराच्या निगराणीत करण्यात येत आहे. या सोने मोजदादसाठी शासकीय परवाना धारक मुंबईचे सिध्दीविनायक मंदिराचे सोने मोजदाद करणारे पुरुषोत्तम काळे खास उपस्थितीत होते. या प्रक्रियेदरम्यान मोजदाद करणाऱ्या मंडळीना खास वेश वापरण्यास दिला होता, ज्यात टी शर्ट, पँटला एकही खिसा नव्हता.

Comments
Add Comment

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी