तुळजाभवानीला भाविकांनी अर्पण केलेल्या सोने-चांदीची मोजमाप सुरू; अंदाजे २०० किलो सोने तर ४ हजार किलो चांदी

आरबीआयकडून वितळून दिले जाणार सोने


तुळजापूर : दरवर्षी लाखो पर्यटक धार्मिक स्थळांना भेटी देत असतात. त्यात तुळजापूर म्हणजे भाविकांचे श्रद्धास्थान. देश-विदेशातून भाविक तुळजाभवानीच्या दर्शनासाठी मंदिराला भेट देतात. देवीवरची श्रद्धा म्हणून भाविक आपापल्या परीने देवीला देणगी देखील देतात. यंदा १० वर्षांनंतर प्रथमच या देणगीचे मोजमाप केले जात आहे. आतापर्यंत अंदाजे २०० किलो सोने तर ४ हजार किलो चांदी जमा झाल्याचे बोलले जात आहे. हे सोने आरबीआयकडून वितळून दिले जाणार आहे.


रोज सकाळी १० सायंकाळी ६ वेळेत ही मोजमाप केली जाणार आहे. यात कोणत्याही प्रकारे लबाडी किंवा गैरवर्तन होऊ नये यासाठी पुरेपूर खबरदारी घेण्यात आली आहे. मंदिराच्या दर्शन मंडपातील चौथ्या मजल्यावरील हॉलमध्ये कडक सुरक्षेत हे काम सुरू करण्यात आलं आहे. सोने मोजदाद प्रक्रिया ही व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि सीसीटीव्ही कॅमेराच्या निगराणीत करण्यात येत आहे. या सोने मोजदादसाठी शासकीय परवाना धारक मुंबईचे सिध्दीविनायक मंदिराचे सोने मोजदाद करणारे पुरुषोत्तम काळे खास उपस्थितीत होते. या प्रक्रियेदरम्यान मोजदाद करणाऱ्या मंडळीना खास वेश वापरण्यास दिला होता, ज्यात टी शर्ट, पँटला एकही खिसा नव्हता.

Comments
Add Comment

राज्यात टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबरला

पुणे : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात अध्यापनासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार डरकाळी

 ताडोबा आणि पेंचमधून आठ वाघांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर सातारा : देशातील प्रमुख पाच व्याघ्र अभयारण्यांपैकी

अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी