तुळजाभवानीला भाविकांनी अर्पण केलेल्या सोने-चांदीची मोजमाप सुरू; अंदाजे २०० किलो सोने तर ४ हजार किलो चांदी

आरबीआयकडून वितळून दिले जाणार सोने


तुळजापूर : दरवर्षी लाखो पर्यटक धार्मिक स्थळांना भेटी देत असतात. त्यात तुळजापूर म्हणजे भाविकांचे श्रद्धास्थान. देश-विदेशातून भाविक तुळजाभवानीच्या दर्शनासाठी मंदिराला भेट देतात. देवीवरची श्रद्धा म्हणून भाविक आपापल्या परीने देवीला देणगी देखील देतात. यंदा १० वर्षांनंतर प्रथमच या देणगीचे मोजमाप केले जात आहे. आतापर्यंत अंदाजे २०० किलो सोने तर ४ हजार किलो चांदी जमा झाल्याचे बोलले जात आहे. हे सोने आरबीआयकडून वितळून दिले जाणार आहे.


रोज सकाळी १० सायंकाळी ६ वेळेत ही मोजमाप केली जाणार आहे. यात कोणत्याही प्रकारे लबाडी किंवा गैरवर्तन होऊ नये यासाठी पुरेपूर खबरदारी घेण्यात आली आहे. मंदिराच्या दर्शन मंडपातील चौथ्या मजल्यावरील हॉलमध्ये कडक सुरक्षेत हे काम सुरू करण्यात आलं आहे. सोने मोजदाद प्रक्रिया ही व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि सीसीटीव्ही कॅमेराच्या निगराणीत करण्यात येत आहे. या सोने मोजदादसाठी शासकीय परवाना धारक मुंबईचे सिध्दीविनायक मंदिराचे सोने मोजदाद करणारे पुरुषोत्तम काळे खास उपस्थितीत होते. या प्रक्रियेदरम्यान मोजदाद करणाऱ्या मंडळीना खास वेश वापरण्यास दिला होता, ज्यात टी शर्ट, पँटला एकही खिसा नव्हता.

Comments
Add Comment

बल्लारपूर येथे टिंबर म्युझियम व झायलरियम उभारणार; सुधीर मुनगंटीवारांच्या मागणीला वनमंत्र्यांचे ठाम आश्वासन

मुंबई: राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी

Parth Pawar: पार्थ पवारांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी घोषणा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय

महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेसह एकूण पाच बँकांना आर्थिक दंड; रिझर्व्ह बँकेचा निर्णय

मुंबई: आरबीआयनं महाराष्ट्रातील विटा मर्चंटस को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, विटा या बँकेला दंड केला आहे. या बँकेला ३.१०

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.