आता पिंपरी-चिंचवडचे नावही बदलण्याची मागणी

  112

भक्ती शक्ती प्रतिष्ठानकडून शहरात शंभरहून अधिक पोस्टर्स


पिंपरी-चिंचवड : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून शहरे, महामार्गांना महान व्यक्तिमत्त्वांची नावे दिली जात आहेत. काही दिवसांपूर्वीच अहमदनगरचे नामकरण अहिल्यानगर करण्यात आले. तसेच औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर, मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव तर वांद्रे-वरळी सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्यात आले. यातच आता पिंपरी - चिंचवड शहराचं नाव बदलून 'जिजाऊनगर' ठेवण्यात यावं, अशी मागणी करण्यात आली आहे.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून भक्ती शक्ती प्रतिष्ठानने ही मागणी केली आहे. शहरातील विविध भागात पिंपरी-चिंचवड शहराचे जिजाऊ नगर नाव करण्यात यावे अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे. तशा आशयाचे शंभरहून अधिक पोस्टर्स पिंपरी-चिंचवड शहरात सर्वत्र लावण्यात आले आहेत. यामध्ये सहभागी होण्यासाठी लाईक करा आणि मिस कॉल द्या अशी मोहिम राबवण्यात आली आहे.


पिंपरी- चिंचवड शहराचं नाव बदलण्याची चर्चा या अगोदर २००६ -०७ ला झाली होती. तशा बातम्या देखील छापून आल्या होत्या. पण स्थानिकांनी पिंपरी- चिंचवड शहराचे नाव बदलण्यास विरोध केला होता. आता पुन्हा एकदा शहराचे नाव बदलण्याची मागणी होत आहे. त्यामुळे शहरात नामकरणाची चर्चा रंगू लागली आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या