आता पिंपरी-चिंचवडचे नावही बदलण्याची मागणी

  109

भक्ती शक्ती प्रतिष्ठानकडून शहरात शंभरहून अधिक पोस्टर्स


पिंपरी-चिंचवड : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून शहरे, महामार्गांना महान व्यक्तिमत्त्वांची नावे दिली जात आहेत. काही दिवसांपूर्वीच अहमदनगरचे नामकरण अहिल्यानगर करण्यात आले. तसेच औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर, मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव तर वांद्रे-वरळी सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्यात आले. यातच आता पिंपरी - चिंचवड शहराचं नाव बदलून 'जिजाऊनगर' ठेवण्यात यावं, अशी मागणी करण्यात आली आहे.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून भक्ती शक्ती प्रतिष्ठानने ही मागणी केली आहे. शहरातील विविध भागात पिंपरी-चिंचवड शहराचे जिजाऊ नगर नाव करण्यात यावे अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे. तशा आशयाचे शंभरहून अधिक पोस्टर्स पिंपरी-चिंचवड शहरात सर्वत्र लावण्यात आले आहेत. यामध्ये सहभागी होण्यासाठी लाईक करा आणि मिस कॉल द्या अशी मोहिम राबवण्यात आली आहे.


पिंपरी- चिंचवड शहराचं नाव बदलण्याची चर्चा या अगोदर २००६ -०७ ला झाली होती. तशा बातम्या देखील छापून आल्या होत्या. पण स्थानिकांनी पिंपरी- चिंचवड शहराचे नाव बदलण्यास विरोध केला होता. आता पुन्हा एकदा शहराचे नाव बदलण्याची मागणी होत आहे. त्यामुळे शहरात नामकरणाची चर्चा रंगू लागली आहे.

Comments
Add Comment

अशोक नगरमधील पालिकेच्या मैदानाला तलावाचे स्वरूप

नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही पालिकेचे दुर्लक्ष कांदिवली : कांदिवली पूर्वेला अशोक नगरमधील एकमेव असलेल्या

पुण्यात भिडे पूल दीड महिना बंद

पुणे : सदाशिवपेठेतून डेक्कन मेट्रो स्थानकात जाण्यासाठी महामेट्रोकडून भिडे पुलावरून लोखंडी पादचारी पूल

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची

आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकलसह शालेय साहित्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली