पदांवरुन भांडलात तर कानाखाली आवाज काढेन; अजित पवारांनी कार्यकर्त्यांना भरला दम

  123

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. पुण्यामध्ये आज राष्ट्रवादीची आठ मतदारसंघांबाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पदाधिकार्‍यांशी संवाद साधला. यानंतर तिकीटांवरुन भांडणा-या कार्यकर्त्यांची अजित पवारांनी हजेरी घेतली.


पदांवरुन वाद घालणार्‍या कार्यकर्त्यांना अजित पवारांनी त्यांच्या शैलीत चांगलंच खडसावलं. ते म्हणाले, "पदांवरुन कोणीही भांडायचं नाही, नाहीतर एकेकाच्या कानाखाली आवाज काढेन. हा कुठला फाजीलपणा आहे? यातून तुमची नाही तर आमची आणि पवारसाहेबांची बदनामी होते." याचवेळी जर असं वागलात तर मी अत्यंत टोकाची भूमिका घेऊन पदाचा राजीनामा देईन असा अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दम भरला.


लोकसभानिहाय मतदारसंघांचा आढावा घेण्याचं काम राष्ट्रवादीने सुरु केलं आहे. प्रत्येक मतदारसंघात कोणत्या उमेदवाराची किती ताकद आहे हे विचारात घेऊनच महाविकास आघाडीत जागावाटप केलं जाईल, असं सध्या या आघाडीचं सूत्र आहे. या चाचपणीसाठीच आजची आढावा बैठक घेण्यात आली व त्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांना अजित पवारांनी चांगलीच समज दिली.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या