भंडारदरा : अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा येथे काजवा महोत्सवाला गेलेले ५०० पर्यटक अचानक आलेल्या पावसामुळे ‘सांधण व्हॅली’ म्हणजे सांधण दरीत अडकले होते. परंतु वेळीच मदत मिळाल्याने सर्व पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा येथील कळसुबाई – हरिश्चंद्रगड अभयारण्यातील निसर्गाच्या कुशीत असलेल्या साम्रद गावाच्या शिवारात ही जगप्रसिद्ध दरी आहे. पर्यटक मोठ्या संख्येन येथे ट्रॅकिंगसाठी येत असतात.
सध्या भंडाऱ्यामध्ये काजवा महोत्स सुरु आहे. त्यामुळे हा महोत्सव पाहण्यासाठी आणि काल रविवार असल्याने येथे पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. त्यातील जवळपास ५०० पर्यटक दरीत अडकले होते. परंतु त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
जवा महोत्सव त्यातच शनिवार आणि रविवार दोन दिवस सलग सुट्या आल्याने महोत्सवासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. सर्वत्र लोकच दिसत होते. काही पर्यटकांनी शनिवारी रात्री काजवा महोत्सवाचा आनंद घेतला होता. तर काही पर्यटक रविवारी रात्री महोत्सव पाहण्यासाठी तेथे थांबले होते. हे पर्यटक रविवारी सायंकाळी आशिया खंडातील सर्वात मोठी सांधण दरी पाहण्यासाठी गेले आणि अचानक सोसाट्याचा वारा आणि पाऊस आल्याने हे सर्व पर्यटक त्या दरीत अडकले. परंतु वेळीच मदत मिळाल्याने सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…