दहावीचा निकाल जाहीर, कोकण अव्वल!

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत बोर्डाचा यंदा ९३.८३ टक्के निकाल लागला आहे. या निकालात कोकण विभागाचा निकाल ९८.११ सर्वाधिक टक्के, तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ९२.०५ टक्के जाहीर झाला आहे.


माध्यमिक बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी देखील निकालात मुलींनी बाजी मारली आहे. दहावीत ९५.८७ टक्के मुली पास झाल्या आहेत. तर यंदाही कोकण विभागाचा सर्वाधिक ९८.११ टक्के निकाल लागला असून नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे.


राज्यातून एकूण १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. यावर्षी २३ हजार शाळांमधून जवळपास ६ हजार ८४४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.



विभागीय निकाल



  • कोकण: ९८.११ टक्के

  • कोल्हापूर: ९६.७३ टक्के

  • पुणे: ९५.६४ टक्के

  • मुंबई: ९३.६६ टक्के

  • छत्रपती संभाजीनगर : ९३.२३ टक्के

  • लातूर: ९२.६७ टक्के

  • अमरावती: ९३.२२ टक्के

  • नाशिक: ९२.२२ टक्के

  • नागपूर: ९२.०५ टक्के

Comments
Add Comment

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी

ग्रामीण भागातील घरबांधणी आता होणार सुलभ; बांधकाम परवानगीचे अधिकार तालुका स्तरावर देण्याचे संकेत!

- मंत्री उदय सामंत यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या घराच्या

Jalna: गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडले अन् ११० सिलिंडर चोरले, जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जालना: जालना तालुक्यातील रामनगर परिसरात गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये चक्क गॅस सिलिंडरची मोठी चोरी झाल्याचा

Weather Update: महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना अलर्ट, ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार

मुंबई: महाराष्ट्रावर ऐन उन्हाळ्यात अस्मानी संकट घोंघावत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला उष्णतेच्या लाटेने

लालपरीचा कायापालट, २२ हजार बसेस पूर्णपणे बदलणार; मंत्री सरनाईकांची माहिती

मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राची लाईफलाईन मानली जाणारी लालपरी आता मोठ्या बदलाच्या दिशेने वाटचाल करत आहे. राज्य

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, गॅस बुकींगनंतर ९६ तासांत सिलेंडर घरपोच होणार; जिल्हाधिकाऱ्यांचे एजन्सींना आदेश

पुणे: मराठी नववर्षारंभ म्हणजेच गुढी पाडव्याचा सण अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना गॅस टंचाईमुळे