निवडणूक आयोगाची शिक्षकांवर ‘छडी’

मुंबई : राज्यातील शाळांना मे महिन्याची सुट्टी लागली असल्यामुळे अनेक शिक्षक आपल्या हक्काच्या सुट्टीत गावी गेले आहेत. मात्र दुसरीकडे शिक्षकांना सुट्टी मिळाली तर निवडणुकीचे काम कोण करणार? असा सवाल उपस्थित करत प्रशासनाने शिक्षकांना मतदार नोंदणीच्या कामासाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अनेक शिक्षक गावी असल्यामुळे निवडणूक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी समतानगर पोलीस ठाण्याला अर्ज देऊन फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांच्या या हालचालीमुळे राज्यभरातील शिक्षकांमध्ये भीतीचे आणि नाराजीचे वातावरण पसरले आहे.


शाळा सुरु असल्यामुळे शिक्षकांना वर्षभर सुट्ट्या घेणे शक्य होत नसते. मात्र मे महिन्यात शाळांना सुट्टी असल्यामुळे शिक्षक सुट्टी लागल्यावर लगेच आपापल्या गावी किंवा बाहेर कुठेतरी फिरवयास जाण्याची योजना बनवितात. अशी सर्व परिस्थिती असतांना पुढील काही दिवसांत लोकसभा, विधानसभा आणि पालिकेच्या निवडणुका येणार असल्यामुळे निवडणूक आयोगाच्या कार्यालयात हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे मतदार नोंदणीबाबतची कामे करण्यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची गरज भासते आणि म्हणूनच शिक्षकांना ही मतदार नोंदणीची कामे सोपविण्यात येणार आहेत.

Comments
Add Comment

संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची संविधानाच्या डिजिटल चित्ररथाद्वारे मानवंदना

संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त डिजिटल संविधान चित्ररथाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन  मुंबई: राज्य

प्रभादेवीतील साई सुंदर नगर आणि कामगार नगर दाेनमधील नाल्याच्या बांधकामाचा खर्च वाढला

नाल्याच्या रुंदीकरण कामासाठी विकासकाची केली नियुक्ती मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील प्रभादेवी येथील साई

पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्ग प्रवेश नियंत्रण प्रकल्पाचा पैसा वळवला रस्ते सिमेंट काँक्रिट कामांसाठी

रस्त्याचा निधी कमी पडल्याने तब्बल २५० कोटी रुपये करावे लागले वळते मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई

अतिरिक्त आयुक्त डॉ ढाकणे यांच्याकडे मालमत्ता विभागासह पर्यावरणाचीही जबाबदारी

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी डॉ अविनाश ढाकणे यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. डॉ

ज्ञानाच्या अथांग महासागरास महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन... भाषणाची सुरुवात करताना लक्षात ठेवा 'हे' मुद्दे

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६९वा महापरिनिर्वाण दिन आहे. या

इंदू मिलच्या जागेत महामानवाचे स्मारक प्रगतिपथावर

प्रवेशद्वार इमारत, संशोधन केंद्राची संरचनात्मक कामे पूर्ण मुंबई : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे