निवडणूक आयोगाची शिक्षकांवर ‘छडी’

मुंबई : राज्यातील शाळांना मे महिन्याची सुट्टी लागली असल्यामुळे अनेक शिक्षक आपल्या हक्काच्या सुट्टीत गावी गेले आहेत. मात्र दुसरीकडे शिक्षकांना सुट्टी मिळाली तर निवडणुकीचे काम कोण करणार? असा सवाल उपस्थित करत प्रशासनाने शिक्षकांना मतदार नोंदणीच्या कामासाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अनेक शिक्षक गावी असल्यामुळे निवडणूक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी समतानगर पोलीस ठाण्याला अर्ज देऊन फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांच्या या हालचालीमुळे राज्यभरातील शिक्षकांमध्ये भीतीचे आणि नाराजीचे वातावरण पसरले आहे.


शाळा सुरु असल्यामुळे शिक्षकांना वर्षभर सुट्ट्या घेणे शक्य होत नसते. मात्र मे महिन्यात शाळांना सुट्टी असल्यामुळे शिक्षक सुट्टी लागल्यावर लगेच आपापल्या गावी किंवा बाहेर कुठेतरी फिरवयास जाण्याची योजना बनवितात. अशी सर्व परिस्थिती असतांना पुढील काही दिवसांत लोकसभा, विधानसभा आणि पालिकेच्या निवडणुका येणार असल्यामुळे निवडणूक आयोगाच्या कार्यालयात हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे मतदार नोंदणीबाबतची कामे करण्यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची गरज भासते आणि म्हणूनच शिक्षकांना ही मतदार नोंदणीची कामे सोपविण्यात येणार आहेत.

Comments
Add Comment

भांडुप स्टेशनजवळ बेस्टच्या बसने १३ जणांना चिरडले

मुंबई : भांडुप स्टेशनजवळ बेस्टच्या बसने रात्री दहाच्या सुमारास १३ जणांना चिरडले. या अपघातात तीन महिला आणि एक

मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकाऱ्यांनी घेतली मतदान नियमावलीची माहिती अन् अनुभवले ईव्हीएम यंत्राचे प्रात्यक्षिक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार

एमपीएससी परीक्षेत प्रत्येक प्रश्नासाठी उत्तर देणे बंधनकारक

मुंबई : राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांच्या उत्तरपत्रिकेत बदल करण्यात आले

लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील दीड कोटी महिलांना ई-केवायसी करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो 'ॲक्वालाईन' रात्रभर धावणार

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो 'ॲक्वालाईन' रात्रभर धावणार ▪️मुंबई मेट्रो रेल

उबाठा गटाने ४२ जणांना दिले एबी फॉर्म

मुंबई: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता दुसऱ्या आणि