भांडुपच्या जापनीस गार्डनची दुर्दशा

भांडुप : भांडुप पश्चिमेच्या गावदेवी मार्गावरील जापनीस उद्यानात गेले दोन महिने पाणी नाही. सर्व लाईट बंद आहेत. साफसफाई करण्यासाठी माळी नसल्यामुळे संपूर्ण उद्यानाची दैनावस्था झालेली आहे. या समस्यांबाबत नागरिकांकडून पालिकेकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र असे असूनही त्याकडे पालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.



उद्यानातील झाडे-पाने सुकू नये म्हणून मुंबई महानगरपालिकेने स्प्रिंकलर बसविले. हे स्प्रिंकलर उद्यानाच्या उद्घाटन दिवशी बसविण्यात आले. त्यासाठी मुंबई महापालिकेने लाखो रुपये खर्च केले. यानंतर दोन- तीन महिने झाडांना पाणी मिळाले. सद्यस्थितीत हे स्प्रिंकलर बंद आहेत.



माजी आमदार व ईशान्य मुंबई विभाग प्रमुख अशोक पाटील व ईशान्य मुंबई विभाग प्रमुख राजश्री मांदविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली भांडुप विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे सर्व पुरुष आणि महिला पदाधिकारी यांनी मुंबई महानगरपालिका एस विभागाच्या उद्यान विभागाला पत्रव्यवहार करूनही अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही.



काही स्प्रिंकलर उद्यानातील जमिनीवर आलेले दिसत आहेत. त्यामुळे लहान मुले खेळताना पडतात. त्यांना दुखापत होते. महानगरपालिकेने मोठा गाजावाजा करत या उद्यानाचा लोकार्पण सोहळा पार पाडला. मात्र लगेचच त्याची दुरवस्था झाली. उद्यानात बसविण्यात आलेली पिण्याच्या पाण्याची टाकी स्वच्छ केली जात नाही. एकीकडे अशुद्ध पाणी आढळल्यास महानगरपालिका दंड आकारत आहे व दुसरीकडे अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करत असल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली.



त्याचप्रकारे उद्यानात सुरक्षारक्षक नाही. या परिस्थितीची लवकरात लवकर दखल घेण्यात यावी, अशी मागणी भांडुप विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त महादेव शिंदे व उद्यान विभागाचे मोहिते व वाजे यांच्याकडे केली आहे.

Comments
Add Comment

BMC News : उपनगरातील महापालिकेच्या ५ रुग्णालयांमध्ये रक्तपेढ्या

- खासगी सहभाग तत्वावर रुग्णालयांमध्ये ब्लड बँककरता संस्थांची निवड मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई

Seven Hills Hospital : सेव्हनहिल्स रुग्णालय पुन्हा खासगी संस्थेचाच ताब्यात

- भाडेकरार करण्याचा प्रस्ताव सुधार समितीत सादर मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्यावतीने खासगी सहभाग

Prabhakar Shinde : मुंबई पूरमुक्त करण्यासाठी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामधील समन्वय आवश्यक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रेल्वे कल्वर्टच्या भिंतींची दुरुस्ती करून कल्वर्टचे पातमुख विस्तारण्यावर भर द्यावा.

Mayor Ritu Tawde : सुधा पार्क मार्गावरील समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी, महापौरांची Action मोहीम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर मधील सुधा पार्क रस्त्यावर दुतर्फा अनधिकृतरित्या उभी केली जाणारी वाहने आणि

Maharashtra : राज्यात पेट्रोल, डिझेल, LPG टंचाई नाही

मुंबई : पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

Air India : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडिया व्यवस्थापनाला दणका

मुंबई : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व