प्रवाशांमध्ये होणारा गोंधळ टाळण्यासाठी 'हा' निर्णय

मुंबई : दादर रेल्वे स्थानकात १५ प्लॅटफॉर्म्स आहेत. त्यामध्ये ७ प्लॅटफॉर्म्स पश्चिम रेल्वेसाठी आहेत. या ७ पैकी दोन प्लॅटफॉर्म्स धीम्या उपनगरीय गाड्यांसाठी तर तीन प्लॅटफॉर्म्स जलद उपनगरीय गाड्यांसाठी आणि शेवटचे दोन प्लॅटफॉर्म्स हे उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचे टर्मिनस आहेत. उर्वरित ८ प्लॅटफॉर्म्स मध्य रेल्वेसाठी आहेत.


अनेक नियमित प्रवाशांना या गोष्टीची सवय झालेली असली तरी नव्या प्रवाशांचा मात्र सारख्या क्रमांकांमुळे मध्य व पश्चिम रेल्वेचे फलाट ओळखण्यात गोंधळ होतो. बर्‍याचदा ठाणे किंवा तत्सम बाजूला जायचं प्रयोजन असलेले प्रवासी गोंधळून पश्चिम रेल्वेच्या फलाट क्रमांक १ वर गाडीची वाट पाहत राहतात. तशीच परिस्थिती मध्य रेल्वेच्या बाजूसही पाहायला मिळते.


हा गोंधळ टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. याअंतर्गत आता सर्व फलाटांना वेगवेगळे क्रमांक देण्याचा निर्णय घेतला आहे. दादरच्या मध्य व पश्चिम रेल्वेच्या फलाटांना आता सलग १ ते १५ असे क्रमांक देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. प्रवाशांमध्ये होणारा गोंधळ टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Comments
Add Comment

गोरेगाव मुलुंड पश्चिमेतील उड्डाणपूल प्रकल्पाला गती, मुंबई मेट्रो ४च्या खालून जाणार पूल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : तानसा जलवाहिनी ते नाहूर रेल्वे पूल येथपर्यंतचा १.८९ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल

महापालिकेच्या आपला दवाखान्यामध्येही मुख कर्करोगाची तपासणी

गर्भाशय मुख आणि स्तन कर्करोगाचे दवाखान्यांसह प्रसुतीगृहांमध्ये तपासणी शिबीर मुंबई (विशेष प्रतिनिधी)

गोरेगावात लिफ्टमध्ये हायड्रोजन फुग्यांचा स्फोट; तीन जण थोडक्यात बचावले

मुंबई : मुंबईतील गोरेगाव परिसरात हायड्रोजन गॅस भरलेल्या फुग्यांमुळे मोठा धोका निर्माण झाल्याची घटना समोर आली

भारतीय कृषी क्षेत्रावर तसा विपरीत परिणाम होऊ नये

अंदाजपत्रकातून विकासाला गती येण्यासाठी आणखी काही ठोस पावलांची अपेक्षा बारामती : केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत

शक्तीपीठ महामार्गाच्या आराखड्यात बदल

राज्य सरकारचा निर्णय; कागल आणि हातकणंगलेचा भाग वगळला मुंबई : राज्यातील साडेतीन शक्तीपीठांना जोडणाऱ्या

Pune Mumbai Expressway News : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस गळतीमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला, पहाटेपर्यंत बचावकार्य सुरू

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेपासून सुरू झालेला वाहतुकीचा खोळंबा तब्बल १२