पिंपरी : बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पिंपरी चिंचवड येथील दापोडी परिसरात काल गुरुवारी दुपारी घडली. साक्षी राम कांबळे (वय १८, रा. गुलाबनगर, दापोडी. मूळगाव उमरगा), असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती दापोडी येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी तिने कुटुंबासोबत जेवण केले. त्यानंतर बारावीचा निकाल पाहण्यासाठी जाते असे सांगून घराबाहेर पडली. मात्र, दुपारी दोन वाजताच्या सुमारास ती पुन्हा घरी आली. नापास झाल्याचे तिने वडिलांना सांगितले. मात्र, वडिलांनी काही हरकत नाही पुढच्या वर्षी पुन्हा परीक्षा दे, असे सांगितले. पण हे अपयश सहन न झाल्याने साक्षी वरच्या मजल्यावरील आपल्या खोलीत गेली आणि छताच्या लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला.
१५-२० मिनिटांनंतर तिची आई वरच्या खोलीत गेली असता साक्षीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर आईने आरडाओरडा केल्यावर घरातील व शेजारी धावून आले. त्यांनी साक्षीला खाली उतरवत जवळच्या दवाखान्यात नेले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…