जेलमधून लढवणार निवडणुक, बंडू आंदेकरचा नवा राजकीय प्रवेश

पुणे : पुण्यातील गँगवॉरला कारणीभूत ठरलेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बंडू आंदेकरने आता राजकीय मैदानात नवा डाव आखल्याची चर्चा आहे. आपल्या नातवाच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या आंदेकरने पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी न्यायालयाकडून विशेष परवानगी घेतली होती. या परवानगीनंतर शनिवारी तो पोलिस बंदोबस्तात क्षेत्रीय कार्यालयात दाखल झाला आणि समर्थकांसमोर जोरदार घोषणाबाजी करत आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला.


विशेष न्यायालयाच्या आदेशानंतर आंदेकर कुटुंबातील बंडू आंदेकर, लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर हे तिघे भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचले होते. मात्र अर्ज अर्धवट भरलेले असल्याचे निदर्शनास आल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी हे अर्ज स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे हे तिघे पुन्हा अर्ज दाखल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


दरम्यान, बंडू आंदेकरसह तिघांचे अर्ज बाद झाल्यानंतर आता जेलमधून बाहेर येण्यासाठी हा संपूर्ण प्रकार मास्टरप्लॅनचा भाग असल्याची चर्चा रंगू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर वनराजच्या पत्नीनेही आंदेकरांच्या पावलावर पाऊल टाकत निवडणूक प्रक्रियेचा मार्ग अवलंबल्याचे बोलले जात आहे. आंदेकर कुटुंबातील बंडू आंदेकर, लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सोनाली वनराज आंदेकर हे प्रभाग क्रमांक २२, २३ आणि २४ मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे.


‘नेकी का काम, आंदेकर का नाम’ आणि ‘आंदेकरांना मत म्हणजे विकासाला मत’ अशा घोषणा देत आंदेकरने आपली राजकीय उपस्थिती दाखवून दिली. विशेष न्यायालयाने सशर्त परवानगी दिल्यानुसार काल दुपारी पोलिस बंदोबस्तात हे अर्ज दाखल करण्यात आले होते. बंडू आंदेकरने प्रभाग क्रमांक २४ कसबा पेठ-कमला नेहरू रुग्णालय-केएमई येथून तर लक्ष्मी आणि सोनाली आंदेकर यांनी प्रभाग क्रमांक २३ रविवार पेठ-नाना पेठ येथून अर्ज भरल्याची चर्चा होती. मात्र अर्ज अपूर्ण असल्याने ते स्वीकारण्यात आले नसल्याचे भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Heavy Rain : राज्यात पावसाचा कहर! १७ NDRF आणि 6 SDRF पथके तैनात; लोणावळ्यात तब्बल ६७० मिमी पावसाची नोंद

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीस ८ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात

इंद्रायणीच्या पुरामुळे आळंदीत वारकऱ्यांची गैरसोय; मुंबई डबेवाले करणार भोजन व निवासाची व्यवस्था

Mumbai  : खेड, मावळ, पिंपरी-चिंचवड आणि लोणावळा परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे

Heavy Rain in Mumbai Pune : पावसाचा कहर! मुंबई-ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट तर पुण्यात १२ जुलैपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी उद्या

Flood in Indrayani : इंद्रायणीला पूर; वारकऱ्यांसाठी सरकारचे महत्त्वाचे आवाहन! आळंदीत न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त आळंदीकडे निघालेल्या वारकरी आणि भाविकांसाठी राज्य

TET Exam Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! चारही आरोपींना १८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

भिवंडी : राज्यभरात गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात मोठी घडामोड झाली