आकाशच्या गोलंदाजीची पुनरावृत्ती करणे अशक्य

Share

वीरेंद्र सेहवागने केला कौतुकाचा वर्षाव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज आकाश मधवालने लखनऊविरुद्धच्या सामन्यात विक्रमी गोलंदाजी केली. आकाशवर अभिनंदनाचा वर्षाव होत असताना भारताचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागनेही त्याचे कौतुक केले. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा गोलंदाज आकाश मधवालच्या गोलंदाजीची पुनरावृत्ती करणे कोणालाही शक्य होणार नाही, असा विश्वास भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने व्यक्त केला. क्रीडा वृत्तसंस्थेशी बोलताना सेहवागने हे वक्तव्य केले.

सेहवाग म्हणाला की, मला देता आले असते, तर मी मधवालला १० पैकी ११ गुण दिले असते. ज्या पद्धतीने त्याने बदोनीला बाद केले, ते अतिशय शानदार होते. मधवालने अवघ्या पाच धावांत पाच बळी घेत अशी आकडेवारी नोंदवली आहे, ज्याची पुनरावृत्ती इतर कोणी करू शकणार नाही, असे मला वाटते. मधवाल हा विचार करणारा गोलंदाज आहे आणि त्याला आयपीएलमध्ये निश्चितच भविष्य आहे. मधवालने आयपीएल २०२३ मध्ये सात सामन्यांत १३ विकेट घेतल्या आहेत. मधवालच्या वेगवान गतीमुळे बदोनीची विकेट मिळाली. कारण बॅकवर्ड लेन्थ बॉल मारण्याचा विचार करत असताना मधवालच्या गतीने मात दिली.

Recent Posts

Suraj Chavan: ‘या’ दिवशी पाहता येणार,फक्त ९९ रुपयांत; सूरज चव्हाणचा ‘झापुक झुपूक’

मुंबई: रीलस्टार सूरज चव्हाणची मुख्य भूमिका असलेला ‘झापुक झुपूक‘ चित्रपट तीन दिवसांपूर्वी लोकांच्या भेटीला आला…

13 seconds ago

‘त्या’ पाकिस्तानी नागरिकांना देश सोडावा लागणार नाही…, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची माहिती

पुणे: पहलगाम (Pahalgam Terror Attack) हल्ल्यानंतर भारतातील पाकिस्तानी नागरिकांना ताबडतोब देश सोडण्याचे निर्दश सरकारने दिले…

6 minutes ago

मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा, मच्छीमार बांधवांना किसान कार्डचे वाटप

मुंबई : महाराष्ट्र शासनाने मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिला आहे. फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला…

11 minutes ago

भारताचा ‘जलप्रहार’?, झेलमच्या रौद्र पाण्याने पाकिस्तानात हाहाकार

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत सिंधू जल करार स्थगित केला.…

1 hour ago

Breaking News : आधार, पॅन, वाहन परवाना एकाच ठिकाणी होणार अपडेट

नवी दिल्ली : आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक मतदान ओळखपत्र, वाहन परवाना अन् पासपोर्ट एकाच…

2 hours ago

पाकिस्तानच्या सैन्यात पसरली अस्वस्थता, लष्करप्रमुखांच्या राजीनाम्याची मागणी

इस्लामाबाद : पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे.…

3 hours ago