आकाशच्या गोलंदाजीची पुनरावृत्ती करणे अशक्य

वीरेंद्र सेहवागने केला कौतुकाचा वर्षाव


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज आकाश मधवालने लखनऊविरुद्धच्या सामन्यात विक्रमी गोलंदाजी केली. आकाशवर अभिनंदनाचा वर्षाव होत असताना भारताचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागनेही त्याचे कौतुक केले. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा गोलंदाज आकाश मधवालच्या गोलंदाजीची पुनरावृत्ती करणे कोणालाही शक्य होणार नाही, असा विश्वास भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने व्यक्त केला. क्रीडा वृत्तसंस्थेशी बोलताना सेहवागने हे वक्तव्य केले.


सेहवाग म्हणाला की, मला देता आले असते, तर मी मधवालला १० पैकी ११ गुण दिले असते. ज्या पद्धतीने त्याने बदोनीला बाद केले, ते अतिशय शानदार होते. मधवालने अवघ्या पाच धावांत पाच बळी घेत अशी आकडेवारी नोंदवली आहे, ज्याची पुनरावृत्ती इतर कोणी करू शकणार नाही, असे मला वाटते. मधवाल हा विचार करणारा गोलंदाज आहे आणि त्याला आयपीएलमध्ये निश्चितच भविष्य आहे. मधवालने आयपीएल २०२३ मध्ये सात सामन्यांत १३ विकेट घेतल्या आहेत. मधवालच्या वेगवान गतीमुळे बदोनीची विकेट मिळाली. कारण बॅकवर्ड लेन्थ बॉल मारण्याचा विचार करत असताना मधवालच्या गतीने मात दिली.

Comments
Add Comment

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत

U19 Asia Cup Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रेसह प्रशिक्षकांवरही कारवाई होणार; पाकविरुद्ध फायनलमध्ये दारुण पराभव होताच BCCI अ‍ॅक्शन मोडवर!

मुंबई : पाकिस्तानविरुद्ध अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक