इंडिगो एअरलाईन्सच्या कामगारांचे काम बंद आंदोलन

  179

मुंबई : इंडिगो एअरलाईन्सच्या सगळ्या कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून काम बंद आंदोलन पुकारलं आहे. जवळजवळ २,२०० कामगारांचा यात समावेश आहे. अतिरिक्त काम करुन घेणं, कामगारांची कमतरता असणं, सुट्ट्या न मिळणं, बढती न मिळणं अशा विविध कारणांसाठी कामगार वर्गाने काम बंद आंदोलन सुरु केलं आहे.


जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका कर्मचा-यांनी घेतली आहे. अनेकदा व्यवस्थापनाशी बोलूनही ते लक्ष देत नाहीत, आम्हांला कुठल्याही चर्चेत सहभागी करुन घेत नाहीत. आम्ही सहभागी होण्याचा प्रयत्न केला तर आमचे पास काढून घेतले जातात व परत दिले जात नाहीत, अशा प्रतिक्रिया कामगारांनी व्यक्त केल्या. मार्च-एप्रिलपर्यंत होणारी पगारातील बढती अजूनही न झाल्याबद्द्ल कामगारांनी नाराजी व्यक्त केली.


याआधी अशा प्रकारांमुळे एकाने आत्महत्या केली व दुस-याने आत्महत्या करत असताना त्याच्या पत्नीने त्याला रोखले, असं एक कामगार प्रतिनिधी म्हणाले. याबाबत कामगारांनी थेट इंडिगोचे सहाय्यक उपाध्यक्ष चार्नेल डिसूझा यांच्यावर आरोप केला आहे. त्यांच्या हातात सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यांच्यामुळेच हा त्रास सहन करावा लागतोय, असं कामगारांचं म्हणणं आहे. या आंदोलनात ड्रायव्हर, लोडर, क्लीनर, कार्गोमधले इतर कर्मचारी यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.