इंडिगो एअरलाईन्सच्या कामगारांचे काम बंद आंदोलन

मुंबई : इंडिगो एअरलाईन्सच्या सगळ्या कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून काम बंद आंदोलन पुकारलं आहे. जवळजवळ २,२०० कामगारांचा यात समावेश आहे. अतिरिक्त काम करुन घेणं, कामगारांची कमतरता असणं, सुट्ट्या न मिळणं, बढती न मिळणं अशा विविध कारणांसाठी कामगार वर्गाने काम बंद आंदोलन सुरु केलं आहे.


जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका कर्मचा-यांनी घेतली आहे. अनेकदा व्यवस्थापनाशी बोलूनही ते लक्ष देत नाहीत, आम्हांला कुठल्याही चर्चेत सहभागी करुन घेत नाहीत. आम्ही सहभागी होण्याचा प्रयत्न केला तर आमचे पास काढून घेतले जातात व परत दिले जात नाहीत, अशा प्रतिक्रिया कामगारांनी व्यक्त केल्या. मार्च-एप्रिलपर्यंत होणारी पगारातील बढती अजूनही न झाल्याबद्द्ल कामगारांनी नाराजी व्यक्त केली.


याआधी अशा प्रकारांमुळे एकाने आत्महत्या केली व दुस-याने आत्महत्या करत असताना त्याच्या पत्नीने त्याला रोखले, असं एक कामगार प्रतिनिधी म्हणाले. याबाबत कामगारांनी थेट इंडिगोचे सहाय्यक उपाध्यक्ष चार्नेल डिसूझा यांच्यावर आरोप केला आहे. त्यांच्या हातात सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यांच्यामुळेच हा त्रास सहन करावा लागतोय, असं कामगारांचं म्हणणं आहे. या आंदोलनात ड्रायव्हर, लोडर, क्लीनर, कार्गोमधले इतर कर्मचारी यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

न्हावा शेवा बंदरावर आले पाकिस्तानी कंटेनर! DRI ची सर्वात मोठी कारवाई

न्हावा शेवा बंदरातून १२ कोटी रुपयांचे पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने आणि सुके खजूर जप्त नवी मुंबई:  न्हावा शेवा

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे