इंडिगो एअरलाईन्सच्या कामगारांचे काम बंद आंदोलन

मुंबई : इंडिगो एअरलाईन्सच्या सगळ्या कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून काम बंद आंदोलन पुकारलं आहे. जवळजवळ २,२०० कामगारांचा यात समावेश आहे. अतिरिक्त काम करुन घेणं, कामगारांची कमतरता असणं, सुट्ट्या न मिळणं, बढती न मिळणं अशा विविध कारणांसाठी कामगार वर्गाने काम बंद आंदोलन सुरु केलं आहे.


जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका कर्मचा-यांनी घेतली आहे. अनेकदा व्यवस्थापनाशी बोलूनही ते लक्ष देत नाहीत, आम्हांला कुठल्याही चर्चेत सहभागी करुन घेत नाहीत. आम्ही सहभागी होण्याचा प्रयत्न केला तर आमचे पास काढून घेतले जातात व परत दिले जात नाहीत, अशा प्रतिक्रिया कामगारांनी व्यक्त केल्या. मार्च-एप्रिलपर्यंत होणारी पगारातील बढती अजूनही न झाल्याबद्द्ल कामगारांनी नाराजी व्यक्त केली.


याआधी अशा प्रकारांमुळे एकाने आत्महत्या केली व दुस-याने आत्महत्या करत असताना त्याच्या पत्नीने त्याला रोखले, असं एक कामगार प्रतिनिधी म्हणाले. याबाबत कामगारांनी थेट इंडिगोचे सहाय्यक उपाध्यक्ष चार्नेल डिसूझा यांच्यावर आरोप केला आहे. त्यांच्या हातात सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यांच्यामुळेच हा त्रास सहन करावा लागतोय, असं कामगारांचं म्हणणं आहे. या आंदोलनात ड्रायव्हर, लोडर, क्लीनर, कार्गोमधले इतर कर्मचारी यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane on Nashik Tree Cutting : 'वृक्षतोडीवर आक्षेप, मग बकरी कापताना गप्प का?' पर्यावरणाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांना मंत्री नितेश राणेंचा तिखट सवाल!

मुंबई : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा २०२७ (Kumbh Mela 2027) च्या भव्य तयारीला सुरुवात झाली असताना, साधूग्राम उभारणीसाठी

हनुमान रोड मेट्रो स्टेशनला डॉ. रमेश प्रभू यांचे नाव देणार

मुंबई : शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विलेपार्ल्याचे माजी आमदार व

गोरेगावमधील मलनिस्सारण वाहिनीच्या खोदकामामुळे नागरिक हैराण

भाजपच्या माजी नगरसेविकेने अधिकाऱ्यांना घेतले फैलावर मुंबई  : गोरेगाव पूर्व येथील आरे भास्कर मार्गावर मल जल

आज-उद्या-परवा समुद्रकिनाऱ्यावर काळजी घ्या!

४ ते ७ डिसेंबर दरम्यान सलग तीन दिवस मोठी भरती मुंबई : मुंबईमधील समुद्रकिनाऱ्यांवर फेरफटका कारण्यासाठी जाणारे

निकाल लागून ४५ दिवसांनंतरही भरती प्रक्रिया मंदावलेलीच!

वैद्यकीय आरोग्य अधिकारी भरती प्रक्रियेत गोंधळ निकालानंतर ‘अतिरिक्त गुण’ नियम बदलाचा निर्णय वैद्यकीय आरोग्य

‘राजगृह’सह चैत्यभूमीवर नागरी सेवा-सुविधा उपलब्ध

सुमारे ८ हजारांहून अधिक अधिकारी - कर्मचारी तैनात मुंबई  : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण