मंदिराला धूप दाखवण्याची कोणतीही परंपरा नाही : नितेश राणे

नितेश राणेंनी केली त्र्यंबकेश्वर मंदिरात महाआरती


नाशिक : भाजप आमदार नितेश राणे यांनी आज नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिराला भेट दिली. त्यांच्या उपस्थितीत आज मंदिरात महाआरती झाली. त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखवण्याच्या परंपरेवरुन वाद निर्माण झाला होता. याबद्दल पत्रकार परिषद घेत नितेश राणे यांनी आज आपली भूमिका मांडली.


त्र्यंबकेश्वर मंदिरात १३ मे रोजी घडलेल्या घटनेवरुन उलट हिंदू समाजाचीच बदनामी केली जात असल्याचं नितेश राणे म्हणाले. उरूस निघतो तेव्हा मंदिराला धूप दाखवण्याची वर्षानुवर्षांची परंपरा आहे, असा केला जाणारा दावा साफ चुकीचा आहे. अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. मंदिराला धूप दाखवण्याची अशी कोणतीही परंपरा नाही. मी मंदिराच्या विश्वस्त मंडळाशी व तज्ज्ञांशी बोललो आहे. त्यांनीही अशी कोणतीही परंपरा नसल्याचे सांगितले आहे. येथे जो काही उरुस निघतो तो मंदिराच्या बाहेरच्या परिसरात निघतो व बाहेरच्या परिसरातूनच तो उरुस जातो. तेथे ते कोणाला धूप दाखवतात, याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही. मी तर म्हणेन १३ मे रोजी मंदिर बंद असताना जिहादी विचारांच्या युवकांनी मंदिरात शिरण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हेतू काय होता, हे हळूहळू तपासात समोर येईलच, असं नितेश राणे यावेळी म्हणाले.


मंदिरात कोणाच्या येण्यावर आमचा आक्षेप नाही. तसा आक्षेप कोणाचाही नाही. मंदिरात तुम्हाला दर्शन घ्यायचे असेल तर हिंदु बांधवांप्रमाणे तुम्हीही रांगेत यावे, दर्शनाचे जे काही सामान आहे ते खरेदी करावे, रांगेत उभे राहून दर्शन घ्यावे व नंतर इतरांप्रमाणे निघून जावे. याला आमचा काहीच आक्षेप नाही. मात्र, १३ मे रोजी जे युवक आले, त्यांच्या हातात हिरवे झेंडे होते. हिरवे झेंडे हातात घेऊन मंदिरात जाण्याचा हट्ट ते का करीत होते? आतमध्ये जाऊन त्या युवकांना चादर चढवायची होती का?, असा सवाल नितेश राणेंनी केला.


महाविकास आघाडी सत्तेत असतानाही अशीच घटना घडली होती, असा दावाही नितेश राणेंनी केला. नितेश राणे म्हणाले, मविआ असताना युवकांनी असाच प्रयोग करून पाहिला होता. आता कर्नाटक निकालामुळे त्यांच्या डोक्यात हवा भरली आहे. मविआ असताना ते चार पावले मंदिरात गेले होते. मात्र, ते वेळीच लक्षात आल्याने त्यांना अडवले. आता त्यांची हिंमत वाढली होती. त्यामुळे पूर्ण मंदिरात जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र त्यांना वेळीच अडवण्यात आले, अन्यथा अनर्थ झाला असता, असे नितेश राणे म्हणाले.

Comments
Add Comment

राज्यातील 'त्रिभाषा सूत्रा'साठी समितीला मुदतवाढ

मुंबई: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये 'त्रिभाषा धोरण' निश्चित करण्यासाठी

आताची सर्वात मोठी बातमी: सरकारची कर्मचाऱ्यांचे पगार दणदणीत वाढणार वेतन आयोगाकडे 'या' मोठ्या शिफारशी

प्रतिनिधी: आठवे वेतन आयोगाबात आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट

आयडब्ल्यूडीसी ३.०' अंतर्देशीय जलमार्ग विकासाला नवी दिशा देणार

कोची : अंतर्देशीय जल वाहतूक (आयडब्ल्युटी) क्षेत्रातील यशावर प्रकाश टाकण्यासाठी आणि भविष्यातील दृष्टिकोन

Shocking Case in Lucknow : पत्नीला तलाक पाहिजे होता म्हणून पतीला...लखनऊमधील विचित्र घटना

लखनऊ : उतर प्रदेशची राजधानी लखनऊमधून एक फसवणुकीचे प्रकरण उघड झाले आहे. एका महिलेने पतीकडून घटस्फोट मिळवता यावा

मराठी मनोरंजनाचा समृद्ध खजिना घेऊन 'नाफा स्ट्रीम'ची नॉर्थ अमेरिकेत धडाकेबाज एंट्री!

सॅन होजे (मनोरंजन प्रतिनिधी) : राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘देऊळ’ आणि ‘भारतीय’ या गाजलेल्या चित्रपटांचे

सारांश नंतरचा दुसरा चित्रपट; अनुपम खेर यांचा 'तन्वी द ग्रेट' चित्रपट ऑस्करसाठी ठरला पात्र

मुंबई : अनुपम खेर यांनी दिग्दर्शित केलेल्या 'तन्वी द ग्रेट' या चित्रपटाला प्रेक्षकवर्गाचा प्रतिसाद मिळाला आहे,