मंदिराला धूप दाखवण्याची कोणतीही परंपरा नाही : नितेश राणे

  201

नितेश राणेंनी केली त्र्यंबकेश्वर मंदिरात महाआरती


नाशिक : भाजप आमदार नितेश राणे यांनी आज नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिराला भेट दिली. त्यांच्या उपस्थितीत आज मंदिरात महाआरती झाली. त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखवण्याच्या परंपरेवरुन वाद निर्माण झाला होता. याबद्दल पत्रकार परिषद घेत नितेश राणे यांनी आज आपली भूमिका मांडली.


त्र्यंबकेश्वर मंदिरात १३ मे रोजी घडलेल्या घटनेवरुन उलट हिंदू समाजाचीच बदनामी केली जात असल्याचं नितेश राणे म्हणाले. उरूस निघतो तेव्हा मंदिराला धूप दाखवण्याची वर्षानुवर्षांची परंपरा आहे, असा केला जाणारा दावा साफ चुकीचा आहे. अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. मंदिराला धूप दाखवण्याची अशी कोणतीही परंपरा नाही. मी मंदिराच्या विश्वस्त मंडळाशी व तज्ज्ञांशी बोललो आहे. त्यांनीही अशी कोणतीही परंपरा नसल्याचे सांगितले आहे. येथे जो काही उरुस निघतो तो मंदिराच्या बाहेरच्या परिसरात निघतो व बाहेरच्या परिसरातूनच तो उरुस जातो. तेथे ते कोणाला धूप दाखवतात, याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही. मी तर म्हणेन १३ मे रोजी मंदिर बंद असताना जिहादी विचारांच्या युवकांनी मंदिरात शिरण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हेतू काय होता, हे हळूहळू तपासात समोर येईलच, असं नितेश राणे यावेळी म्हणाले.


मंदिरात कोणाच्या येण्यावर आमचा आक्षेप नाही. तसा आक्षेप कोणाचाही नाही. मंदिरात तुम्हाला दर्शन घ्यायचे असेल तर हिंदु बांधवांप्रमाणे तुम्हीही रांगेत यावे, दर्शनाचे जे काही सामान आहे ते खरेदी करावे, रांगेत उभे राहून दर्शन घ्यावे व नंतर इतरांप्रमाणे निघून जावे. याला आमचा काहीच आक्षेप नाही. मात्र, १३ मे रोजी जे युवक आले, त्यांच्या हातात हिरवे झेंडे होते. हिरवे झेंडे हातात घेऊन मंदिरात जाण्याचा हट्ट ते का करीत होते? आतमध्ये जाऊन त्या युवकांना चादर चढवायची होती का?, असा सवाल नितेश राणेंनी केला.


महाविकास आघाडी सत्तेत असतानाही अशीच घटना घडली होती, असा दावाही नितेश राणेंनी केला. नितेश राणे म्हणाले, मविआ असताना युवकांनी असाच प्रयोग करून पाहिला होता. आता कर्नाटक निकालामुळे त्यांच्या डोक्यात हवा भरली आहे. मविआ असताना ते चार पावले मंदिरात गेले होते. मात्र, ते वेळीच लक्षात आल्याने त्यांना अडवले. आता त्यांची हिंमत वाढली होती. त्यामुळे पूर्ण मंदिरात जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र त्यांना वेळीच अडवण्यात आले, अन्यथा अनर्थ झाला असता, असे नितेश राणे म्हणाले.

Comments
Add Comment

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी: मंत्री मंगलप्रभात लोढा

जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार मुंबई: महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने जोडप्यावर हल्ला : आई आणि भावाने केले मुलीचे अपहरण

पुणे : खेड तालुक्यातील खरपुडी गावात आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यावर हल्ला करत पत्नीचे अपहरण करण्यात आले आहे.

OBC reservation : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार!

२७ टक्के ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका फेटाळली नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात गेल्या अनेक

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर विक्रीत जुलैत 'इतकी' वाढ

मागील महिन्याच्या तुलनेत कंपनीच्या एकूण विक्रीत २०% वाढ झाली मुंबई: होंडा मोटरसायकल अँड स्कूटर विक्रीत मागील

अदानी समुहाने 'या' अहवालावर व्यक्त केली नाराजी

प्रतिनिधी: अदानी समुहाने ब्ल्यूमबर्गच्या अहवालाला सपशेल नाकारल्याने ही अफवा होती का हा प्रश्न निर्माण होणे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील