मंदिराला धूप दाखवण्याची कोणतीही परंपरा नाही : नितेश राणे

नितेश राणेंनी केली त्र्यंबकेश्वर मंदिरात महाआरती


नाशिक : भाजप आमदार नितेश राणे यांनी आज नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिराला भेट दिली. त्यांच्या उपस्थितीत आज मंदिरात महाआरती झाली. त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखवण्याच्या परंपरेवरुन वाद निर्माण झाला होता. याबद्दल पत्रकार परिषद घेत नितेश राणे यांनी आज आपली भूमिका मांडली.


त्र्यंबकेश्वर मंदिरात १३ मे रोजी घडलेल्या घटनेवरुन उलट हिंदू समाजाचीच बदनामी केली जात असल्याचं नितेश राणे म्हणाले. उरूस निघतो तेव्हा मंदिराला धूप दाखवण्याची वर्षानुवर्षांची परंपरा आहे, असा केला जाणारा दावा साफ चुकीचा आहे. अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. मंदिराला धूप दाखवण्याची अशी कोणतीही परंपरा नाही. मी मंदिराच्या विश्वस्त मंडळाशी व तज्ज्ञांशी बोललो आहे. त्यांनीही अशी कोणतीही परंपरा नसल्याचे सांगितले आहे. येथे जो काही उरुस निघतो तो मंदिराच्या बाहेरच्या परिसरात निघतो व बाहेरच्या परिसरातूनच तो उरुस जातो. तेथे ते कोणाला धूप दाखवतात, याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही. मी तर म्हणेन १३ मे रोजी मंदिर बंद असताना जिहादी विचारांच्या युवकांनी मंदिरात शिरण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हेतू काय होता, हे हळूहळू तपासात समोर येईलच, असं नितेश राणे यावेळी म्हणाले.


मंदिरात कोणाच्या येण्यावर आमचा आक्षेप नाही. तसा आक्षेप कोणाचाही नाही. मंदिरात तुम्हाला दर्शन घ्यायचे असेल तर हिंदु बांधवांप्रमाणे तुम्हीही रांगेत यावे, दर्शनाचे जे काही सामान आहे ते खरेदी करावे, रांगेत उभे राहून दर्शन घ्यावे व नंतर इतरांप्रमाणे निघून जावे. याला आमचा काहीच आक्षेप नाही. मात्र, १३ मे रोजी जे युवक आले, त्यांच्या हातात हिरवे झेंडे होते. हिरवे झेंडे हातात घेऊन मंदिरात जाण्याचा हट्ट ते का करीत होते? आतमध्ये जाऊन त्या युवकांना चादर चढवायची होती का?, असा सवाल नितेश राणेंनी केला.


महाविकास आघाडी सत्तेत असतानाही अशीच घटना घडली होती, असा दावाही नितेश राणेंनी केला. नितेश राणे म्हणाले, मविआ असताना युवकांनी असाच प्रयोग करून पाहिला होता. आता कर्नाटक निकालामुळे त्यांच्या डोक्यात हवा भरली आहे. मविआ असताना ते चार पावले मंदिरात गेले होते. मात्र, ते वेळीच लक्षात आल्याने त्यांना अडवले. आता त्यांची हिंमत वाढली होती. त्यामुळे पूर्ण मंदिरात जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र त्यांना वेळीच अडवण्यात आले, अन्यथा अनर्थ झाला असता, असे नितेश राणे म्हणाले.

Comments
Add Comment

उस्मान तारीकची गोलंदाजी भारतीय संघासाठी धोक्याची घंटा!

कोलंबो : पाकिस्तानचा संघ गेल्या दोन आठवड्यांपासून श्रीलंकेत आहे आणि तिथल्या वातावरणाशी जुळवून घेतले आहे. तर

Valentines Day: अभिनेत्री नम्रता गायकवाड 'काहीतरी वेगळे' करणार? चर्चांना उधाण

मुंबई: काही दिवसांपूर्वी अभिनेत्री नम्रता गायकवाड हीने अभिनेता तुषार कावळे यांच्यासोबतचे काही फोटो शेअर करून

Valentine's Day: व्हॅलेंटाइन्स डेला द बॉडी शॉपकडून वैयक्तिक आणि आकर्षक गिफ्टिंग पर्याय

मुंबई: यंदाच्या व्हॅलेंटाइन्स डेला पारंपरिक भेटवस्तूंना बाजूला ठेवत वैयक्तिक, विचारपूर्वक आणि आकर्षक पद्धतीने

The Lalla Anthem: अनिल कपूर आणि हरभजन सिंह यांचा दमदार संदेश – इंडियन क्रिकेट टीमशी भिडलात तर परिणाम भोगावे लागतील!

अनिल कपूर आणि राधिका मदान अभिनित ‘लल्ला अँथम – अ वॉर्निंग फ्रॉम सूबेदार’ या गाण्यात भारताचे माजी क्रिकेटपटू

Bihar: एका दाम्पत्याला रोझ डे सेलिब्रेशन पडलं महागात; पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा

बिहार: बिहारमधील मुंगेर जिल्ह्यात 'रोझ डे'चे सेलिब्रेशन एका दाम्पत्याला चांगलेच महागात पडले आहे. दारूबंदी

विमानात मोठ्या आवाजात गाणी ऐकणार तर......; विमान वाहतूक मंत्रालयाने जारी केले नवे नियम

मुंबई : लांबच्या ठिकाणी जलद पोहोचण्यासाठी आजकाल सर्रास विमानांचा वापर केला जातो. ट्रेन किंवा बसने प्रवास करताना