मुंबई पोलीस अलर्ट मोडवर! २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी

मुंबई: मुंबई पोलिसांना दहशतवादी हल्ल्याच्या धमकीचा फोन आला असून धमकी देणाऱ्याने त्यात २६/११ चा उल्लेख केला आहे. संबंधित व्यक्तीने फोन अचानक कट केला तसेच त्यात २६/११ चा उल्लेख केल्याने पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.


गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई पोलिसांना धमकीचे फोन सुरू आहेत. त्यातच रविवारी रात्री एका अनोखळी क्रमांकावरून फोन आला. त्यात संबंधिताने मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा उल्लेख केला आणि अचानक फोन कट केला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण राजस्थानमधून बोलत असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे या व्यक्तीने यापूर्वीही फोन केल्याचे समोर आले आहे.


मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवादी हल्ला करण्याची धमकीही काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांना मिळाली होती. याबाबत एका संशयिताला पोलिसांनी चेंबूर परिसरातून अटक केली होती. इरफान अहमद शेख (वय २७) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वत:ला इंडियन मुजाहिदीन संघटनेचा दहशतवादी असल्याचे सांगितले होते.


तसेच मुंबई पोलिसांना फेब्रुवारी महिन्यातही एक फोन आला होता. त्यात आता प्रमाणेच २६/११ चा उल्लेख करत मुंबईतल्या कुर्ला भागात स्फोट करू, असा इशारा देण्यात आला होता. पण तपासाअंती पोलिसांना याबाबत काहीही सापडलेले नव्हते.


या अशा धमक्यांच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळांसह मुंबई विमानतळ, मंत्रालय, बीएसई या महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा कडक करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेची प्रभाग रचना अंतिम, राज्य निवडणूक आयोगाची मान्यता

मुंबई  खास प्रतिनिधी : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक-२०२५ करिता प्रभाग रचनेस राज्य निवडणूक

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ड्रोन, फ्लाइंग कंदील उडविण्यास बंदी

मुंबई (वार्ताहर): दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि शांतताभंग होऊ नये यासाठी पोलिसांनी

मेट्रो-५ साठी एमएमआरडीए २२ गाड्या खरेदी करणार

२ हजार ६४० कोटी रुपये खर्च मुंबई (प्रतिनिधी): 'ठाणे-कल्याण-भिवंडी मेट्रो ५' मार्गिकेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास

मेट्रो-१ चा प्रवास घाट्याचा! उत्पन्न वाढीचा एमएमआरडीएचा मास्टर प्लॅन तयार

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील पहिली मेट्रो असलेली अंधेरी-घाटकोपर ही मेट्रो-१ मार्गिका घाट्यात चालत आहे. त्यातून

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.