पुण्यात ट्रॅव्हल्स बसने दिली ५ ते ६ गाड्यांना धडक, विचित्र अपघातात २ जणांचा जागीच मृत्यू

पुणे : पुण्यातील उंड्री चौकात एनआयबीएम ते कडनगर रस्त्यावर रविवारी रात्री सव्वासात वाजता विचित्र भीषण अपघात झाला. ट्रॅव्हल्स बसची पाच ते सहा गाड्यांना धडक बसली आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर चौघे जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.


पुण्यातील कोंढवा भाघात बस पुढे निघाली होती. अचानक या बसचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे समोर पाच ते सहा गाड्यांना धडक बसली. काही गाड्या पलटी झाल्या आहेत.


या अपघातात प्रशांत भानुदास घेमुड (वय ३७, रा. बधेनगर, कोंढवा खुर्द) आणि एका दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. तर, रिक्षाचालक मधू कुवर, रिक्षातील प्रवासी अलिस्टर मर्चंट, मालवाहतूक टेम्पोमधील इस्माईल सय्यद, रफिक देशमुख (रा. लेन क्रमांक ३, सय्यदनगर, हडपसर) हे चौघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ससून आणि खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.


कोंढवा पोलिसांनी बसचालक आरोपी मैनुद्दीन मेहबूब शेख (वय ४२, रा. नाना पेठ, कॅम्प चौक, पुणे) याला ताब्यात घेतले आहे. ही मिनी बस द टाइम ट्रॅव्हल कंपनीच्या मालकीची आहे.


वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयबीएम ते कडनगर रस्त्यावर ऑर्किड पॅलेससमोरील उतारावर वाय जंक्शनजवळ बसचा (क्रमांक एमएच १२- एचबी ०२४२) ब्रेक फेल झाला. त्यामुळे ही बस उतारावरून भरधाव सुटली. बसने समोरून येणाऱ्या सहा वाहनांना धडक दिली, त्यात एका वाहनचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर, अन्य एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Comments
Add Comment

ऐन उन्हाळ्यात पुण्याला पावसाने झोपडले; आयटी पार्कमध्ये साचला बर्फ

पुणे : ऐन उन्हाळयात भर दुपारी पावसाने पुण्यात हजेरी लावली. मुसळधार पाऊस, सोसाट्याचा पाऊस आणि गारपिटीने

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला मिळणार 'टेक ऑफ'

मुंबई-सिंधुदुर्ग विमान प्रवासासाठी १०० टक्के 'व्हिजिएफ' मंजूर; फ्लाय ९१ कंपनीची निवड, प्रति आसन २ हजार ९९१ रुपये

बिकट परिस्थिती, घरची जबाबदारी, अन पोलीस भरतीच स्वप्न; नेमकं भरतीवेळी शरीर थकलं अन्...

पुणे : अनेक होतकरू तरुण सरकारी नोकरीचा पाठलाग करत असतात. नोकरी मिळवून कुटुंबाला गरीबीतून बाहेर काढण्याचं स्वप्न

येत्या तीन महिन्यांत 'पीएनजी' साठी अर्ज न केल्यास 'एलपीजी' सिलिंडर बंद

मंत्री छगन भुजबळ यांचा इशारा; व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस पुरवठ्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ मुंबई : राज्यातील

शेतकरी केवळ ‘उत्पादक’ नव्हे तर यशस्वी ‘उद्योजक’ व्हावा पणन मंत्री जयकुमार रावल

वाढवणजवळ उभारणार जगातील सर्वोत्तम बाजार व्यवस्था मुंबई : बदलत्या परिस्थितीत शेतकरी हा केवळ उत्पादक राहून

Pandharpur News : पंढरपुरात पोलिसांची मोठी कारवाई; ५ लाखांच्या कारसह ४ किलो गांजा जप्त

पंढरपूर : पंढरपूर शहरात पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली आहे. शहराच्या मध्यवर्ती