भाकरी फिरवण्याची सुरुवात माझ्यापासूनच होणार

कोल्हापूर : शरद पवारांनी चेंबूर येथील युवा मंथन शिबिरात लवकरच आपण भाकरी फिरवणार असल्याचं म्हटल्यानंतर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरवण्यावरुन अनेक राजकीय चर्चा सुरु आहेत. त्यातच काल विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी कोल्हापूर येथे भाकरीचा पुन्हा उल्लेख केल्याने चर्चांना जोर आला आहे.


कोणत्याही मतदारसंघावर कुणाचीही मक्तेदारी नाही. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेत भाकरी फिरवण्यात येणार आहे. त्याची सुरुवात आमच्यापासूनच करण्यात येणार आहे, असं अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलंय. शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी बोलवलेल्या मिटींगमध्येदेखील आपण हे वक्तव्य केल्याचं अजित पवार म्हणाले. बारामती, पुणे, पिंपरी-चिंचवड तसंच ग्रामीण भागात नवीन लोकांना संधी देणार असल्याचं पवार म्हणाले.


नवीन नेतृत्व तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. रोहित पवारला कर्जत जामखेडमध्ये मी सांगितल्याप्रमाणे काम करायला लावल्याने काँग्रेसकडे जाणारा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आला. त्यामुळे कुठल्याही मतदारसंघात कुणाचीही मक्तेदारी नसते, असं अजित पवार यावेळी म्हणाले.


मविआच्या जागावाटपासंदर्भात बोलताना काँग्रेस आणि उद्धव गट लहान भाऊ व राष्ट्रवादी मोठा भाऊ असल्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलं. "काँग्रेसला जास्त जागा मिळत असल्याने आम्हाला लहान भावाची भूमिका घ्यावी लागायची, मात्र आता आम्ही काँग्रेसपेक्षा मोठे भाऊ झालो आहोत", असं ते म्हणाले.


पवारांच्या राजीनाम्याच्या निर्णयानंतर पक्षाच्या आग्रहाखातर ते अध्यक्षपदावर राहिल्याने राष्ट्रवादीचा मरगळ आलेला कार्यकर्ता कामाला लागला असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. दरम्यान मुख्यमंत्री कधी काय बोलतात हे कळत नाही, नुसतं सर्वसामान्यांचं सरकार म्हणायचं पण त्यांच्यासाठी काय केलं हे सांगा, असा टोला पवारांनी लगावला.

Comments
Add Comment

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या

Ketan Agrawal Murder Case : "सिया दोषी असेल तर तिलाही त्याच दरीत ढकला!"; आई-वडिलांचा संताप, पोलिसांकडून ९ प्रश्नांची सरबत्ती

पुणे : पुण्याला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन