भाकरी फिरवण्याची सुरुवात माझ्यापासूनच होणार

  138

कोल्हापूर : शरद पवारांनी चेंबूर येथील युवा मंथन शिबिरात लवकरच आपण भाकरी फिरवणार असल्याचं म्हटल्यानंतर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरवण्यावरुन अनेक राजकीय चर्चा सुरु आहेत. त्यातच काल विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी कोल्हापूर येथे भाकरीचा पुन्हा उल्लेख केल्याने चर्चांना जोर आला आहे.


कोणत्याही मतदारसंघावर कुणाचीही मक्तेदारी नाही. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेत भाकरी फिरवण्यात येणार आहे. त्याची सुरुवात आमच्यापासूनच करण्यात येणार आहे, असं अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलंय. शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी बोलवलेल्या मिटींगमध्येदेखील आपण हे वक्तव्य केल्याचं अजित पवार म्हणाले. बारामती, पुणे, पिंपरी-चिंचवड तसंच ग्रामीण भागात नवीन लोकांना संधी देणार असल्याचं पवार म्हणाले.


नवीन नेतृत्व तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. रोहित पवारला कर्जत जामखेडमध्ये मी सांगितल्याप्रमाणे काम करायला लावल्याने काँग्रेसकडे जाणारा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आला. त्यामुळे कुठल्याही मतदारसंघात कुणाचीही मक्तेदारी नसते, असं अजित पवार यावेळी म्हणाले.


मविआच्या जागावाटपासंदर्भात बोलताना काँग्रेस आणि उद्धव गट लहान भाऊ व राष्ट्रवादी मोठा भाऊ असल्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलं. "काँग्रेसला जास्त जागा मिळत असल्याने आम्हाला लहान भावाची भूमिका घ्यावी लागायची, मात्र आता आम्ही काँग्रेसपेक्षा मोठे भाऊ झालो आहोत", असं ते म्हणाले.


पवारांच्या राजीनाम्याच्या निर्णयानंतर पक्षाच्या आग्रहाखातर ते अध्यक्षपदावर राहिल्याने राष्ट्रवादीचा मरगळ आलेला कार्यकर्ता कामाला लागला असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. दरम्यान मुख्यमंत्री कधी काय बोलतात हे कळत नाही, नुसतं सर्वसामान्यांचं सरकार म्हणायचं पण त्यांच्यासाठी काय केलं हे सांगा, असा टोला पवारांनी लगावला.

Comments
Add Comment

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती