राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केला सवाल, 'ती' खंत अखेर बोलून दाखवलीच

नाशिक: राज ठाकरेंच्या भाषणांना होणाऱ्या गर्दीचं मतांमध्ये रुपांतर होत नाही. आज नाशिक दौऱ्यादरम्यान त्यांनी ही खंत सवाल विचारत व्यक्त केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. ते तेथील मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकांसह विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. त्यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी ही खंत व्यक्त केली.


दौऱ्यादरम्यान राज ठाकरे यांनी आज सकाळी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी सुरत-चेन्नई महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी आपलं गाऱ्हाण राज ठाकरेंसमोर मांडलं. जमीन अधिग्रहित करताना आपल्याला विचारलं नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी राज ठाकरे यांनी केली. यावेळी शेतकऱ्यांनी राज्यात अवकाळी पावसामुळं शेतीचं झालेलं नुकसान, बॅंकेची वसुली, कांद्याचं भाव पाडणं याविषयावरही आपलं गाऱ्हाणं मांडत राज ठाकरे यांनी यावर तोडगा काढवा, अशी मागणी केली.


यावेळी राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना, तुम्ही अडचणीच्या काळात माझ्याकडे येता, मग मतदानाच्या वेळी काय होतं? असा सवाल केला. राज ठाकरे पुढे म्हणाले, दरम्यानच्या काळात शेतकरी संपावर गेले होते. तेव्हा काही शेतकरी बांधव मला भेटायला आले. मी त्यांना सांगितले की, अडचणीच्या वेळी माझ्याकडे येता आणि निवडणुकीत मतदान त्यांना करता. त्यावेळी शेतकरी मला म्हणाले, साहेब, समस्या वेगळी आणि मतदान वेगळे.


राज ठाकरे पुढे म्हणाले, जे तुम्हाला मदत करत नाहीत त्यांना तुम्ही मतं देत असाल तर मग अडचणीच्या वेळी माझ्याकडे का येता? महाराष्ट्र टोलमुक्त करू असे म्हणणाऱ्यांना तुम्ही मतदान केलं की नाही? जे तुमची पिळवणूक करतात, त्यांनाच तुम्ही मतदान करता. आपण काय करत आहात याची जाणीव ठेवा, असा रोखठोक शब्दांत सल्लाही राज ठाकरे यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला.

Comments
Add Comment

नाशिकच्या ‘कॉर्पोरेट जिहाद’नंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर

‘पॉश’ कायद्याची अंमलबजावणी अनिवार्य; कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले मुंबई : नाशिक येथील

Defamation on social media :सोशल मीडियावर बदनामी करणे महागात पडणार, कायद्यात बदल करण्यासाठी राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा (Social media platforms) वापर करून पुराव्यांविना केली जाणारी बदनामी (Defamation) आणि त्यातून

Nashik TCS Case : “धर्मांतरासाठी दबाव, बुरखा-नमाजचे प्रशिक्षण”, सरकारी वकिलांनी केले अनेक धक्कादायक दावे

- निदा खानला ११ मेपर्यंत पोलिस कोठडी नाशिक : नाशिकमधील TCS कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात अटक करण्यात

Nashik TCS Case : निदा खानच्या आजच्या पहिल्या सुनावणीत न्यायालयात घडलं ?

Nashik TCS Case : टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान हिला अखेर छत्रपती संभाजी नगरमधून अटक करण्यात आली. गेले 25 दिवस निदा खान

Bengaluru-Nagpur Flight : नागपुरातील मुसळधार पावसाचा विमानसेवेवर परिणाम; इंडिगोचे बेंगळुरू-नागपूर विमान रायपूरला वळवले

नागपूर : नागपूर शहरात गुरुवारी (७ मे) दुपारनंतर अचानक झालेल्या मुसळधार पावसाने आणि वेगवान वादळी वाऱ्यांनी जनजीवन

Sanjay Shirsat Criticized Imtiaz Jaleel : “निदा खानला इम्तियाज जलील यांचा आश्रय”; मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर हल्लाबोल

मुंबई : नाशिकमधील टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक शोषण आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणातील