राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केला सवाल, 'ती' खंत अखेर बोलून दाखवलीच

नाशिक: राज ठाकरेंच्या भाषणांना होणाऱ्या गर्दीचं मतांमध्ये रुपांतर होत नाही. आज नाशिक दौऱ्यादरम्यान त्यांनी ही खंत सवाल विचारत व्यक्त केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. ते तेथील मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकांसह विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. त्यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी ही खंत व्यक्त केली.


दौऱ्यादरम्यान राज ठाकरे यांनी आज सकाळी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी सुरत-चेन्नई महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी आपलं गाऱ्हाण राज ठाकरेंसमोर मांडलं. जमीन अधिग्रहित करताना आपल्याला विचारलं नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी राज ठाकरे यांनी केली. यावेळी शेतकऱ्यांनी राज्यात अवकाळी पावसामुळं शेतीचं झालेलं नुकसान, बॅंकेची वसुली, कांद्याचं भाव पाडणं याविषयावरही आपलं गाऱ्हाणं मांडत राज ठाकरे यांनी यावर तोडगा काढवा, अशी मागणी केली.


यावेळी राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना, तुम्ही अडचणीच्या काळात माझ्याकडे येता, मग मतदानाच्या वेळी काय होतं? असा सवाल केला. राज ठाकरे पुढे म्हणाले, दरम्यानच्या काळात शेतकरी संपावर गेले होते. तेव्हा काही शेतकरी बांधव मला भेटायला आले. मी त्यांना सांगितले की, अडचणीच्या वेळी माझ्याकडे येता आणि निवडणुकीत मतदान त्यांना करता. त्यावेळी शेतकरी मला म्हणाले, साहेब, समस्या वेगळी आणि मतदान वेगळे.


राज ठाकरे पुढे म्हणाले, जे तुम्हाला मदत करत नाहीत त्यांना तुम्ही मतं देत असाल तर मग अडचणीच्या वेळी माझ्याकडे का येता? महाराष्ट्र टोलमुक्त करू असे म्हणणाऱ्यांना तुम्ही मतदान केलं की नाही? जे तुमची पिळवणूक करतात, त्यांनाच तुम्ही मतदान करता. आपण काय करत आहात याची जाणीव ठेवा, असा रोखठोक शब्दांत सल्लाही राज ठाकरे यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला.

Comments
Add Comment

Fighter Jet Emergency Landing Pune : पुण्यात लढाऊ विमानाचे अचानक लँडिंग; करावे लागले चक्क विमानतळ बंद; नेमकं काय घडलं त्या रात्री?

पुणे : विमानाचा अपघात आता रस्ते अपघातासारखा सर्वसाधारण झालाय. काल पुण्याच्या धावपट्टीवर रात्री एक लढाऊ विमानाचे

Thane : मेट्रो, टनेल, पॉड टॅक्सी ते परवडणारी घरे; ठाणे बनतंय सुपर सिटी

ठाणे : “पूर्वी ‘पुणे तिथे काय उणे’ म्हटले जायचे; आता ‘ठाणे तिथे काय उणे’ असे आत्मविश्वासाने म्हणण्याची वेळ आली

Jitendra Shelke Death : अशोक खरात यांचे निकटवर्तीयाचा ट्रकखाली चिरडून मृत्यू, पत्नी आणि मुलगा गंभीर

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, शुक्रवारी झालेल्या एका भीषण अपघातात

Heat wave : १३ राज्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा, काळजी घेण्याचे आवाहन

- अकोला देशातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक उष्ण शहर मुंबई : सध्या देशभरातील हवामानात मोठे बदल होत आहेत. काही

Corporate Jihad : कॉर्पोरेट जिहादवर काय म्हणाले मंत्री नितेश राणे ?

पिंपळगाव बसवंत : जबरदस्तीने नमाज पढायला लावणे आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याच्या अधिकृत तक्रारी प्राप्त

Transfer : जी. श्रीकांत छत्रपती संभाजीनगरचे नवे विभागीय आयुक्त

चार वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; जितेंद्र पापळकर यांची जीएसटी विभागात नियुक्ती मुंबई : राज्य शासनाने