जुहू बीचवरील 'मेगा बीच-क्लीन अप इव्हेंट'मध्ये मुख्यमंत्र्यांचा सक्रिय सहभाग

मुंबई : मुंबईत तिसऱ्या पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाच्या जी-२० बैठकीत ठरवण्यात आलेल्या जुहू बीचवरील 'मेगा बीच-क्लीन अप इव्हेंट'मध्ये आज सकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले. समुद्र किनारा स्वच्छतेच्या या उपक्रमामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग दर्शवला. या इव्हेंटमध्ये जी-२० च्या सर्व २० देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपल्या महत्त्वपू्र्ण सहभागाबद्दल नागरिकांना संवेदनशील करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. "पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. दररोज एक मिनीट जर प्रत्येक नागरिकाने दिला तर पर्यावरणाचा -हास होणार नाही व समतोल राखला जाईल. तसंच आपण आज ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज असे दुष्परिणाम अनुभवतोय त्यातून थोडासा दिलासा मिळेल", असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

बीच क्लीन-अप मध्ये सहभागी झाल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिनिधींचे आभार मानले आणि या परिषदेने आपल्या पृथ्वीच्या संवर्धनासाठी आपल्या सर्वांना एकत्र आणले आहे, असं ते म्हणाले. पुढे अभिमानाने संत ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द आठवून आपली पृथ्वी मानवी जीवनासाठी वरदान असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. आपण दररोज करत असलेलं प्रत्येक काम हे पर्यावरणपूरक असल्याची खात्री आपण स्वतःला दिली पाहिजे, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.



मुख्यमंत्र्यांनी २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत मिशनवरही प्रकाशझोत टाकला आणि या मिशनमुळे देशभरातील बहुतेक गावे आणि शहरे स्वच्छतेकडे एक पाऊल पुढे टाकत आहेत, असं ते म्हणाले. त्यानंतर राज्य सरकारने पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी काही कार्यक्रम आधीच सुरू केले असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं.

Comments
Add Comment

माजी लोकसभाध्यक्षांना 'ब्रह्मभूषण' पुरस्कार जाहीर

मुंबई : माजी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांना 'ब्रह्मभूषण’ २०२५ पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा

महापरिनिर्वाण दिनी नामांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; सत्ताधाऱ्यांची सकारात्मक प्रतिक्रिया

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा

नियोजित कामं सुरळीत पार पडली तर पुढील महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे आपण लोकार्पण करु- मुख्यमंत्री

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम नियोजित

गोरेगाव-सांताक्रूझ दरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

वांद्रे-वर्सोवा सी लिंकवरील जोड मार्गाच्या कामाला गती

आतापर्यंत २२ टक्के काम पू्र्ण मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य

Mahaparinirvan Din: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले - राज्यपाल आचार्य देवव्रत

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था -- मुख्यमंत्री