बारावीच्या तब्बल ३७२ उत्तरपत्रिका एकाच व्यक्तीने कशा लिहिल्या?

उत्तरपत्रिका हस्ताक्षर घोटाळ्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बुचकळ्यात

हिंगोली : बारावीची पेपर तपासणी सुरु असताना यातील एक दोन नव्हे तर चक्क ३७२ विद्यार्थ्यांच्या भौतिकशास्त्र विषयाच्या उत्तर पत्रिकेमध्ये दोन वेगवेगळे हस्ताक्षर असल्याचे उघडकीस आले आहे. या अनोख्या कॉपीने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बुचकळ्यात पडले आहे. प्रथमदर्शनी अर्धवट राहिलेली उत्तरे एकाच व्यक्तीने लिहिली असल्याचे समोर आले आहे. पण हे हस्ताक्षर नेमके कोणाचे? हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.


एकाच उत्तर पत्रिकेमध्ये दोन वेगवेगळे हस्ताक्षर असल्याचे लक्षात आल्याने व हा प्रकार संशयास्पद असल्याने परिक्षकांनी याची माहिती शिक्षण मंडळाला दिली. त्यानंतर शिक्षण मंडळाने यासाठी एक चौकशी समिती गठित केली. या समितीने सर्व विद्यार्थ्यांची यादी तयार करून त्यांना नोटीस पाठवत चौकशीसाठी बोलावले. तसेच विद्यार्थ्यांसोबतच केंद्रप्रमुख यांची देखील या प्रकरणी चौकशी करण्यात आली. यानंतर या चौकशी समितीने आपला अहवाल सादर केला. या अहवालामुळे एकच खळबळ उडालेली आहे.


विशेष म्हणजे बीड आणि हिंगोली या दोनच जिल्ह्यांमधील या उत्तर पत्रिका असल्याचेही समोर आले आहे.


दरम्यान, विद्यार्थ्यांनी हे हस्ताक्षर आपले नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे हा प्रकार कसा घडला? ती व्यक्ती कोण? उत्तरपत्रिका जमा कधी केल्या? त्या कस्टडियनकडे कधी पाठवल्या? अशा अनेक प्रश्नांसह पर्यवेक्षक, कस्टडियन, मॉडरेटर, केंद्रप्रमूख हे सर्व जण आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहेत. याशिवाय सेंटर मॅनेज झाले होते का? उत्तरपत्रिकाच बाहेर देण्यात आल्या होत्या का? हा प्रकार बीड आणि हिंगोली या दोनच जिल्ह्यांत कसा घडला? असेही अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहेत.

Comments
Add Comment

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या

'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई: इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर

'एआय' तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार; मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई: राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू