ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंना मारहाण करणा-या ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाची पक्षातून हकालपट्टी

बीड : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंना दोन चापटा मारल्याचा दावा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केला होता. तसा त्यांनी व्हिडीओ देखील बनवला होता. मात्र त्यानंतर सुषमा अंधारेंना मारहाण केल्याचा दावा करणाऱ्या आप्पासाहेब जाधव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.


पक्षविरोधी कारवाया केल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच सुषमा अंधारे यांनी देखील शिंदे गटाची ही स्क्रिप्ट असल्याचा आरोप केला आहे. विशेश म्हणजे या जिल्हाप्रमुखाने सुषमा अंधारे दादागिरी करत पैसे मागतात म्हणून आपण त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला होता.



जाधव यांनी एका व्हिडीओमध्ये सांगितले आहे की, ‘बीडमध्ये ठाकरे गटाच्या प्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत देखील उपस्थित राहणार आहेत. शनिवारी ही सभा होणार आहे. या सभेची पाहणी करण्यासाठी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह उपनेत्या सुषमा अंधारे देखील तेथे आल्या होत्या. त्या सध्या जिल्ह्यात दादागिरी करत आहेत. आमच्या पदाधिकाऱ्यांकडे पैसे मागत आहेत. एसी, सोफ्यासाठी हे पैसे त्या मागत आहेत.’


त्या माझे पदही विकायला लागल्या आहेत. मी पक्ष वाढीसाठी अत्यंत प्रयत्न करत आहे. मी पक्ष वाढीसाठी रात्र अन् दिवस मेहनत करत आहे, रक्ताचं पाणी करत आहे, हाडाची काडं करत आहे. माझ्या लेका-बाळाच्या मुखातील पैसे खर्च करुन पक्ष वाढवत आहे. पण त्यावर त्यांचं लक्ष नाही. यातूनच सुषमाताई अंधारे आणि माझ्यात बाचाबाची झाली. याच वादातून मी त्यांना दोन चापटा मारल्या, अशी कबुली बीडमध्ये ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी दिली.





दरम्यान, सुषमा अंधारे यांनी ही शिंदे गटाची स्क्रिप्ट असल्याचा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या, मी सुखरुप आहे. पण घटनाक्रम सांगणे गरजेचे आहे. बीड शहरातील माने कॉम्प्लेक्समध्ये २० मे रोजी आपली सभा होणार आहे. यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी सभेच्या ठिकाणी पाहणीसाठी गेलो होतो. यावेळी सभेच्या स्टेजची पाहणी करताना ठाकरे गटाचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्यात कुठल्यातरी कारणावरून शिवीगाळ आणि धक्काबुक्कीचा प्रकार घडला. आप्पासाहेबांची भाषा उर्मट आणि अत्यंत खालच्या पातळीवरील होती. त्यानंतर जाधव तेथून निघून गेले.


मात्र जाधव यांनी केलेले सर्व आरोप खोटे असून, यात्रेला गालबोट लागावे म्हणून शिंदे गटाने ही स्क्रिप्ट रचली आहे. तसेच आप्पासाहेब जाधव हे निष्क्रिय कार्यकर्ते आहेत. तसेच त्यांना या अगोदरच्या सभेला लोकांची गर्दी जमवता आली नव्हती. मात्र मी एक महिला असूनही एक प्रबोधन यात्रा यशस्वी करून दाखवली याची सल त्यांना असेल. आता त्यांना काय उत्तर द्यायचं या उद्विगणतेतून त्यांनी मला मारहाण झाल्याचा दावा केला असल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या.

Comments
Add Comment

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या

'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई: इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर