नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना आणले वठणीवर!

बावनकुळेंकडून नितेश राणे यांचे जाहीर कौतुक


पुणे : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्या दररोज होणाऱ्या पत्रकार परिषदेला भाजप आमदार नितेश राणे हे सडेतोडपणे प्रत्युत्तर देत आहेत. संजय राऊत आणि त्यांचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना नितेश राणे यांनी वठणीवर आणले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अरे-तुरे करणारे उद्धव ठाकरे आता मोदीजी-मोदीजी म्हणताहेत. हे नितेश राणे यांचे यश असल्याचे सांगत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राणेंचे तोंडभरुन कौतुक केले.


तसेच या पुढच्या काळातही राणे हे काम अत्यंत तडफदारपणे पार पाडतील, असा विश्वास पुण्यात भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बावनकुळे यांनी व्यक्त केला.


"रोज सकाळी सुरू असलेला संजय राऊत यांचा भोंगा नितेश राणे यांनी आवरण्याचा चांगला प्रयत्न सुरू ठेवला आहे. ते केवळ संजय राऊतांच्या आरोपांना तोडीस तोड उत्तरच देत नाहीत तर अत्यंत अभ्यासूपणे मुद्दा मांडण्याचे काम करीत आहेत," अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी राणे यांचे कौतुक केले.


नागपुरच्या सभेत पंतप्रधान मोदी यांचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात 'अरे- तुरे' असा केला होता, मात्र राणे यांनी तो मुद्दा पत्रकार परिषदेत उपस्थित करत ठाकरे यांना योग्य भाषेत उत्तर दिले. त्याचा परिणाम म्हणून ठाकरेंना मुंबईच्या सभेत मोदी यांचा उल्लेख "मोदीजी, 'मोदीजी," असाच करावा लागला, हे राणे याचे यश असल्याची आठवण बावनकुळे यांनी यावेळी सांगितली.

Comments
Add Comment

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या