यापुढे तुळजाभवानी मंदिरात 'यांना' सक्त मनाई!

मंदिरात लावण्यात आले फलक


तुळजापूर : तुळजाभवानी मंदिराला दरवर्षी लाखोंच्या संख्येने भेट देणा-या भाविकांसाठी तुळजाभवानी मंदिर ट्रस्टने एक विशेष सूचना जारी केली आहे. असभ्य आणि अशोभनीय वस्त्र धारण करणा-यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, अशी ती सूचना आहे. या सूचनेचे फलक तुळजाभवानी मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत.


महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात असलेल्या तुळजाभवानी मंदिरात 'अंग प्रदर्शन, उत्तेजक, असभ्य व अशोभनीय वस्त्रधारी तसेच हाफ पँट, बर्मुडा आदि तोकडे वस्त्र परिधान करणा-या भाविकांना मंदिरात प्रवेश नाही' या सूचनेसोबतच 'कृपया भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे भान ठेवा' असा सल्ला फलकांतून देण्यात आला आहे.


काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या अनेक मंदिरांमध्ये अशा प्रकारचे फलक लागले होते. पूर्वीच्या नियमांची योग्य प्रकारे अंमलबजावणी होत नसल्याच्या काही तक्रारी मंदिर संस्थांकडे आल्या म्हणून मंदिराच्या परिसरात हे फलक लावण्यात आले आहेत. भारतीय संस्कृती जपण्यासाठी मंदिर ट्रस्टने हे महत्त्वाचे पाऊल उचलले असून तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जाताना आता भाविकांना हा नियम बंधनकारक राहणार आहे.

Comments
Add Comment

सोसाट्याचा वाऱ्यासह गाराचा पाऊस पडणार, हवामान विभागाकडून पाच जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका सोसणाऱ्या महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने महत्त्वाची अपडेट दिली

पेपर सुरु असताना विद्यार्थिंनीसोबत घडला लाजिरवाणा प्रकार, नेमकं घडलं काय?

नाशिक: नाशिकमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. १३ मार्च रोजी दहावीचा पेपर सुरू असताना एका

सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचे रेखाचित्र जारी; पोलिसांनी केलं आवाहन

संगमनेर: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ॲसिड हल्ला प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. एका सहा

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे