यापुढे तुळजाभवानी मंदिरात 'यांना' सक्त मनाई!

  303

मंदिरात लावण्यात आले फलक


तुळजापूर : तुळजाभवानी मंदिराला दरवर्षी लाखोंच्या संख्येने भेट देणा-या भाविकांसाठी तुळजाभवानी मंदिर ट्रस्टने एक विशेष सूचना जारी केली आहे. असभ्य आणि अशोभनीय वस्त्र धारण करणा-यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, अशी ती सूचना आहे. या सूचनेचे फलक तुळजाभवानी मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत.


महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात असलेल्या तुळजाभवानी मंदिरात 'अंग प्रदर्शन, उत्तेजक, असभ्य व अशोभनीय वस्त्रधारी तसेच हाफ पँट, बर्मुडा आदि तोकडे वस्त्र परिधान करणा-या भाविकांना मंदिरात प्रवेश नाही' या सूचनेसोबतच 'कृपया भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे भान ठेवा' असा सल्ला फलकांतून देण्यात आला आहे.


काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या अनेक मंदिरांमध्ये अशा प्रकारचे फलक लागले होते. पूर्वीच्या नियमांची योग्य प्रकारे अंमलबजावणी होत नसल्याच्या काही तक्रारी मंदिर संस्थांकडे आल्या म्हणून मंदिराच्या परिसरात हे फलक लावण्यात आले आहेत. भारतीय संस्कृती जपण्यासाठी मंदिर ट्रस्टने हे महत्त्वाचे पाऊल उचलले असून तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जाताना आता भाविकांना हा नियम बंधनकारक राहणार आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या