यापुढे तुळजाभवानी मंदिरात 'यांना' सक्त मनाई!

मंदिरात लावण्यात आले फलक


तुळजापूर : तुळजाभवानी मंदिराला दरवर्षी लाखोंच्या संख्येने भेट देणा-या भाविकांसाठी तुळजाभवानी मंदिर ट्रस्टने एक विशेष सूचना जारी केली आहे. असभ्य आणि अशोभनीय वस्त्र धारण करणा-यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, अशी ती सूचना आहे. या सूचनेचे फलक तुळजाभवानी मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत.


महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात असलेल्या तुळजाभवानी मंदिरात 'अंग प्रदर्शन, उत्तेजक, असभ्य व अशोभनीय वस्त्रधारी तसेच हाफ पँट, बर्मुडा आदि तोकडे वस्त्र परिधान करणा-या भाविकांना मंदिरात प्रवेश नाही' या सूचनेसोबतच 'कृपया भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे भान ठेवा' असा सल्ला फलकांतून देण्यात आला आहे.


काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या अनेक मंदिरांमध्ये अशा प्रकारचे फलक लागले होते. पूर्वीच्या नियमांची योग्य प्रकारे अंमलबजावणी होत नसल्याच्या काही तक्रारी मंदिर संस्थांकडे आल्या म्हणून मंदिराच्या परिसरात हे फलक लावण्यात आले आहेत. भारतीय संस्कृती जपण्यासाठी मंदिर ट्रस्टने हे महत्त्वाचे पाऊल उचलले असून तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जाताना आता भाविकांना हा नियम बंधनकारक राहणार आहे.

Comments
Add Comment

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर

Congress: काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर, नगरसेवक थेट दिल्लीत पोहोचले, बैठकीत नेमकं घडलं काय?

दिल्ली: चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमध्ये गटातील राजकारणामुळे सत्ता गमावण्याची वेळ