मुंबई - गोवा सुस्साट; केवळ ७ तासांत कोकणात

मुंबई (प्रतिनिधी): मुंबई-गोवा रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढविण्याच्या उद्देशाने मध्य आणि कोकण रेल्वेवरून मुंबई - गोवा ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ची चाचणी घेण्यात आली. या चाचणीत सीएसएमटी ते मडगाव हे अंतर ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ने अवघ्या ७ तासांत पार केले. या मार्गावर सर्वात वेगवान एक्स्प्रेस म्हणून ओळखली जाणारी तेजस एक्स्प्रेस आठ तासांहून अधिक वेळ घेते. मात्र ‘वंदे भारत एक्स्प्रेस’च्या चाचणीतच विक्रमी प्रवासाची वेळ नोंदवण्यात आली. त्यामुळे रेल्वेने मुंबई - गोवा प्रवास करताना कमीत कमी एक तासाची बचत होण्याची शक्यता आहे. चेन्नईस्थित इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) मधील भारतीय बनावटीची सेमी-हायस्पीड ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ आहे. देशातील सर्वात पहिली ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ फेब्रुवारी २०१९ मध्ये नवी दिल्ली ते वाराणसीदरम्यान धावली.


पर्यटनाला चालना
मुंबई - गोवा वंदे भारत एक्स्प्रेसने मुंबईकर आणि पर्यटकांचा प्रवासाचा अनुभव आणखी बदलण्याची अपेक्षा आहे. चाचण्यांनी एक्स्प्रेसची कार्यक्षमता, सुरक्षितता आणि प्रवासी सुविधांची कठोर चाचणी घेतली जात आहे. मुंबई आणि गोवा या दोन्ही ठिकाणी पर्यटनाला चालना देण्याची आणि आर्थिक वाढ होणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुंबई विभागाचे विभागीय व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांनी दिली.

Comments

Veena javkar    May 24, 2023 11:00 PM

कोकणच्या लोकांना परवडणारी आहे का ?

Veena javkar    May 24, 2023 10:58 PM

Marathi mansachya khishala parwdnari aahe ka ?

Arvindjavkar    May 24, 2023 10:57 PM

Marathi mansachya khishala parwdnari aahe ka ?

Anonymous    May 24, 2023 12:51 PM

कणकवलीमध्ये थांबा मिळालाच पाहिजे फक्त

Anonymous    May 24, 2023 12:49 PM

कणकवली मध्ये थांबा मिळाला पाहिजे...

सागर केळजी    May 22, 2023 02:18 PM

कोकणात थांबणार कुठे ते पण सांगा..

NARESH Dattatray Shinde    May 20, 2023 08:30 PM

वंदे भारत ट्रेन केंव्हा पासून चालू होणार आहे

Add Comment

Rahul Narvekar : शिक्षक केवळ वाचायला शिकवत नाही, तर समाज घडवतो आणि वाचवतो" - राहुल नार्वेकर यांचे गौरवोद्गार

मुंबई : "शिक्षक हा केवळ अक्षरांची ओळख करून देणारा घटक नाही, तर तो खऱ्या अर्थाने समाज घडवणारा आणि संकटाच्या काळात

Mohan Bhagwat : अस्थिर जगाचा आधार केवळ भारतच; पण त्यासाठी शेवटच्या घटकाचा विकास हवा" – डॉ. मोहन भागवत

आदिवासी अस्मिता हीच देशाची ओळख"; कर्मयोगी एकल शिक्षक मेळाव्यात डॉ. मोहन भागवत यांचे प्रेरक उद्गार सत्ता नव्हे, तर

First Tribal University : विदर्भात साकारणार देशातील पहिले आदिवासी विद्यापीठ

५०० कोटींच्या प्रकल्पातून शैक्षणिक क्रांतीचे नवे पर्व मुंबई : गेल्या तीन दशकांपासून आदिवासी आणि दुर्गम भागात

BMC News : मुंबईच्या महापौर रस्ते आणि नालेसफाईच्या पाहणी मोहिमेवर

रस्ते कामांचा वेग वाढवताना बांधकामात आणि दर्जा राखण्यात हयगय नको; प्रशासनाला दिले निर्देश मुंबई : रस्त्यांची

HSC Result : बारावीचा निकाल जाहीर झाला पण टक्क्यांना लागलेली गळती कायम राहिली

मुंबई : महाराष्ट्र उच्च माध्यमिक आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीची

Mumbai Crime : आधी विटेने वार, मग गळा आवळला...वांद्र्यातील ७८ वर्षीय वृद्धेची निर्घृण हत्या

मुंबई : मुंबईतील वांद्रे (पूर्व) भागात उघडकीस आलेल्या एका खळबळजनक हत्याकांडाचा छडा लावण्यात खेरवाडी पोलिसांना