अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २५ मे पासून सुरु

मुंबई : राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे राबविल्या जाणाऱ्या इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. एसएससी बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर होण्याआधीच अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. २५ मेपासून ही प्रवेश प्रक्रिया सुरु होईल तर निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.



२५ मे पासून सकाळी ११ वाजल्यापासून ते दहावी बोर्ड परिक्षेचा निकाल जाहीर होईपर्यंत अकरावी प्रवेश अर्जाचा भाग एक ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे. तर निकालानंतर अर्जाचा भाग दोन भरण्यास वेळ दिला जाणार आहे. यात विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर जाऊन ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्या कॉलेजचे पसंती क्रमांक देऊन इतर माहिती भरावी लागणार आहे.


सीबीएसई बोर्डाचा निकाल १२ मे रोजी तर आयसीएसई बोर्डाचा निकाल १४ मे रोजी जाहीर झाला. एसएससी बोर्डाचा दहावीचा निकाल मात्र अजून प्रतिक्षेत आहे आणि त्याआधीच विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची तयारी करावी लागणार आहे. राज्याच्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवसात पहिली प्रवेश फेरी पूर्ण करून विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया केली जाईल. त्यानंतर अकरावी प्रवेश प्रक्रियेची दुसरी आणि तिसरी फेरी व त्यासोबतच विशेष फेरीचे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात येईल.

Comments
Add Comment

पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकमुळे २४० लोकल फेऱ्या रद्द

काही लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या थांब्यात बदल मुंबई : पश्चिम रेल्वेवरील कांदिवली ते बोरिवली दरम्यान

मुंबईत काही अपवाद वगळता शांततेत मतदान

तब्बल १ हजार ७०० उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार मुंबई : मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ