अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २५ मे पासून सुरु

मुंबई : राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे राबविल्या जाणाऱ्या इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. एसएससी बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर होण्याआधीच अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. २५ मेपासून ही प्रवेश प्रक्रिया सुरु होईल तर निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.



२५ मे पासून सकाळी ११ वाजल्यापासून ते दहावी बोर्ड परिक्षेचा निकाल जाहीर होईपर्यंत अकरावी प्रवेश अर्जाचा भाग एक ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे. तर निकालानंतर अर्जाचा भाग दोन भरण्यास वेळ दिला जाणार आहे. यात विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर जाऊन ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्या कॉलेजचे पसंती क्रमांक देऊन इतर माहिती भरावी लागणार आहे.


सीबीएसई बोर्डाचा निकाल १२ मे रोजी तर आयसीएसई बोर्डाचा निकाल १४ मे रोजी जाहीर झाला. एसएससी बोर्डाचा दहावीचा निकाल मात्र अजून प्रतिक्षेत आहे आणि त्याआधीच विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची तयारी करावी लागणार आहे. राज्याच्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवसात पहिली प्रवेश फेरी पूर्ण करून विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया केली जाईल. त्यानंतर अकरावी प्रवेश प्रक्रियेची दुसरी आणि तिसरी फेरी व त्यासोबतच विशेष फेरीचे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात येईल.

Comments
Add Comment

बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात ३१ ऑक्टोबरपर्यंत भव्य ग्रंथ प्रदर्शन

मुंबई : अभिजात मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने व मॅजेस्टिक ग्रंथ दालनाच्या

महापालिका आयुक्तांनी घेतला मुंबईतील दोन प्रमुख रस्ते प्रकल्प कामांचा आढावा, दिले असे निर्देश

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई किनारी रस्ता (उत्तर) अंतर्गत वेसावे ते भाईंदर प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक

मुंबई २०३० पर्यंत रेबीजमुक्त करणार, महापालिकेचा निर्धार

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य संस्थांमधील रेबीज प्रतिबंधक लसीकरण केंद्रे, लसीकरण आणि

थरारक! मेट्रो स्टेशनखालील खड्ड्यात अडकला तरूणाचा पाय, मोठ्या प्रयत्नाने केली सुटका

मुंबई: मुंबईत शुक्रवारी रात्री थरारक सुटकेची घटना घडली. जोगेश्वरी मेट्रो स्टेशनखाली असलेल्या खड्ड्यात तरूणाचा

गिरगावात आगीच्या दुर्घटनेत फूड स्टॉल जळून खाक

मुंबई: दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे एका फूड स्टॉलला मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या दुर्घटनेत हा फूड स्टॉल

भूखंड पालिकेचा की, खासगी विकासकांचा ?

पालिकेच्या नावाचे फलक बसवण्याची मागणी मुंबई (प्रतिनिधी) : उपनगरात बहुतांश ठिकाणी मनपा प्रशासनाचे मोकळे भूखंड,